टायटन रागाचे नवीन कॉकटेल कलेक्शन

Date:

बंगलोर-अभिजात सौंदर्य व संतुलन या स्त्रीत्वाच्या खास गुणांचा सन्मान करण्यासाठी टायटन रागाने खास कॉकटेल कलेक्शनसादर केले आहे.  ही नवीन श्रेणी कॉकटेल पेहराव व मूडला अतिशय साजेशी आहे.  मदर ऑफ पर्ल डायल, उठावदार स्वारोस्की क्रिस्टल्स यांनी सजलेली सहा घड्याळे फॅशनेबल व्यक्तिमत्वाची शान वाढवतात.  यापैकी प्रत्येक मास्टरपीस म्हणजे एक खास संकल्पना आहे, कॉकटेल लूकसाठी हे प्रत्येक घड्याळ अतिशय आदर्श ऍक्सेसरी आहे.  नवीन मॅग्नेटिक बकल असलेल्या या घड्याळांसोबत आकर्षक, स्टायलिश कॉकटेल रिंग दिली जाते व याचे पॅकेजिंग देखील एका खास बॉक्समध्ये करण्यात येते.

टायटन कंपनी लिमिटेडच्या मार्केटिंग हेड श्रीमती कंवलप्रीत वालिया यांनी सांगितले, टायटन रागा हा एकमेव असा ब्रँड आहे जो फक्त महिलांसाठी घड्याळे बनवतो.  आजच्या काळात प्रत्येक व्यक्ती आपल्या पेहरावाबद्दल विशेष चोखंदळ असते.  आपल्या व्यक्तिमत्वातील अनोखी वैशिष्ट्ये प्रदर्शित करण्यासाठी स्त्रिया समारंभ, प्रसंगांसाठी अतिशय विचारपूर्वक तयार होतात.  अशा स्त्रियांसाठी टायटन रागा कॉकटेल कलेक्शन हे सर्वार्थाने योग्य ठरेल.”   

 या नवीन कलेक्शनमध्ये तीन स्टाईल्स व सहा घड्याळे  आहेत. एनिग्मा या डिझाईनमध्ये स्ट्रॅपवर तीन मोठे व इतर अनेक छोटे स्वारोवस्की बॅगेट कट क्रिस्टल्स आहेत.  एक्स्टेसी या डिझाईनमध्ये स्वारोवस्की डान्सिंग क्रिस्टल स्ट्रॅप, बॅगेट कट क्रिस्टल, ४ स्वारोवस्की क्रिस्टल असलेली मदर ऑफ पर्ल डायल व प्रत्येक स्ट्रॅपवर छोटे, मोठे स्वारोवस्की ही खास वैशिष्ट्ये आहेत.  क्रिसेन्ट या तिसऱ्या स्टाईलमध्ये तीन रंग आहेत, यामध्ये प्रत्येक ब्रेसलेटवर स्वारोवस्की अर्धचंद्राकार क्रिस्टल स्ट्रॅप व ४ स्वारोवस्की चंद्राकार क्रिटलॉन आहेत.  ही निव्वळ घड्याळे नसून तुमच्या हातात आकर्षक ब्रेसलेट / ऍक्सेसरी घातल्याचा लुक मिळवून देतात.

 टायटन रागा कॉकटेल कलेक्शनच्या किमती १४९९५ रुपयांपासून १७९९५ रुपयांपर्यंत असून निवडक वर्ल्ड ऑफ टायटन स्टोअर्समध्ये ते खरेदीसाठी उपलब्ध आहे.

 टायटन कंपनी लिमिटेड

तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (टीआयडीसीओ) व टाटा ग्रुपने मिळून सुरु केलेली टायटन कंपनी लिमिटेड (आधीची टायटन इंडस्ट्रीज लिमिटेड) १९८७ पासून टायटन वॉचेस लिमिटेड बनली.  १९९४ साली टायटनने दागिने उद्योगात पदार्पण केले व त्यापाठोपाठ टायटन आय प्लस सुरु करून आयवेअरमध्येही प्रवेश केला.  २०१३ साली स्किन ब्रँड आणून ही कंपनी सुगंध, अत्तर व्यवसायात उतरली.  आज घड्याळे, दागिने व आयवेअर क्षेत्रात टायटन कंपनी लिमिटेड ही भारतातील अजेय अग्रेसर कंपनी म्हणून नावाजली जाते.  या सर्व उद्योगक्षेत्रांचा चेहरामोहरा बदलवण्याचे श्रेय टायटनला जाते.  २०१७-१८ आर्थिक वर्षात या कंपनीने (स्टॅन्डअलोन) २०.४% टॉपलाईन वाढ नोंदवली तर याच कालावधीत त्यांचा एकूण महसूल १५,६५६ कोटी रुपये होता.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘मी’पणाचा अहंकारच पर्यावरणासाठी घातक:आचार्य प्रशांत यांचे प्रतिपादन

पुणे : 'अहंकार आणि आंतरिक अज्ञान हेच हवामान बदलांसारख्या...

अटलजींमुळे विकसित भारताची संकल्पना – विनोद तावडे

पुणे पुस्तक महोत्सवात विनोद तावडे यांच्या हस्ते 'अटलजी एक...

व्यक्त-अभिव्यक्त होण्यातील फरक समजण्यासाठी माध्यमांच्या शाळांची गरज : प्रा. प्रवीण दवणे

रोटरी साहित्य संमेलनात रंगला प्रा. दवणे यांच्याशी संवाद पुणे : व्यक्त होणे आणि अभिव्यक्त होणे, यातील फरक समजून घेण्यासाठी, आता माध्यमांच्या शाळांची गरज आहे, असे परखड मत प्रसिद्ध लेखक, कवी आणि रोटरी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रा. प्रवीण दवणे यांनी व्यक्त केले. समाजमाध्यमांसह सर्वच माध्यमे कशी हाताळावीत, त्यावर काय बघावे, कसे, किती बघावे, हे शिकवण्याची वेळ आली आहे, असेही ते म्हणाले. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात प्रा. दवणे यांच्याशी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात ही मुलाखत रंगली. प्रा. दवणे म्हणाले, शालेय वयापासून ग्रंथालयांमुळे शब्द, कविता, भाषांचे महत्त्व आणि आवड जोपासली गेली. सुरुवातीचे लेखन साभार परत येत असे. पण तो अपमान अथवा कमीपणा न समजता, अधिक चांगले, अधिक आशयपूर्ण लिहिण्याची ती संधी आहे, हे सांगणारे वडीलधारे होते. त्यामुळे सुधारण्याची, शिकण्याची प्रक्रिया सुरू राहिली आणि लेखनाचा रियाज करता आला. कथामालेसारख्या उपक्रमांतून कुसुमाग्रज, बोरकर, वसंत बापट, वसंत देसाई आदी मान्यवर भेटत राहिले. तेव्हाची पाठ्यपुस्तके ही गुणांपुरती नव्हती, ती जीवनपुस्तके होती. कागदावरच्या उत्तीर्णतेपेक्षा काळजावर कोरलेल्या शब्दांचा, निष्ठांचा तो काळ होता. नेमून दिलेले काम पूर्ण निष्ठेने आणि समर्पित वृत्तीने करण्याची सवय होती. आताच्या काळात झालेला फरक त्यामुळे पटकन जाणवतो. आजच्या शिक्षकांनी आणि पालकांनी आपापली प्रगतीपुस्तके पुन्हा तपासण्याची वेळ आली आहे, असे ते म्हणाले रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करा बालसाहित्याविषयी भाष्य करताना दवणे यांनी रंजन, अंजन आणि सृजन या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला दिला. मुलांच्या वयानुरूप असणाऱ्या जाणिवा, संवेदना, वृत्ती, उत्सुकता, जिज्ञासा, आनंद यांचे भान ठेवून लेखन करणे आवश्यक आहे. स्वतःचे बालपण आठवून आजच्या मुलांसाठी लिहिण्यापेक्षा आजच्या मुलांचे भावविश्व आधी समजून घेऊन, मग लेखन करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. मुलांना अकाली प्रौढ करून त्यांचे बोन्साय करू नका, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले. एआयविषयी...

स्थानिकच्या निवडणुकांमध्ये सत्ताधाऱ्यांकडून पैशाचा प्रचंड वापर, आघाडीचा निर्णय स्थानिक नेतृत्व घेईल: रमेश चेन्नीथला.

राज्यात कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा, उडता महाराष्ट्र करण्याचा प्रयत्न, राज्यात...