दागिने खरेदी अडव्हान्स योजनेमध्ये २५ टक्के वाढीचे कल्याण ज्वेलर्सचे उद्दिष्ट

Date:

मुंबई– भारतातील सर्वात विश्वासार्ह ज्वेलर्स म्हणून प्रसिद्ध असलेल्या कल्याण ज्वेलर्सला नुकत्याच जाहीर झालेल्या दागिने खरेदी अडव्हान्स योजनेमुळे सकारात्मक परिणाम अपेक्षित आहे. भारत सरकारने दागिने खरेदीसाठी आगाऊ रक्कम गोळा करणाऱ्या व कोणत्याही नियामक प्राधिकरणास बांधील नसलेल्या घटकांसाठी नुकताच बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड डिपॉझिट स्कीम्स ऑर्डिनन्स २०१९ जारी केला आहे.

हा आदेश दागिने क्षेत्राला औपचारिक स्वरूप देण्याच्या प्रयत्नांशी सुसंगत आहे. दागिने अडव्हान्स खरेदी योजनेमध्ये असलेली दरी भरून काढण्यात आली आहे आणि भागीदारी तसेच एकल प्रोप्रायटरी संस्थांना नियामक वातावरणाअंतर्गत आणण्यात आले आहे. यामुळे उद्योगक्षेत्रात सर्वांना समान संधी उपलब्ध होईल, असे राजेश कल्याणारामन, कार्यकारी संचालक, कल्याण ज्वेलर्स म्हणाले.

पब्लिक लिमिटेड कंपनी असल्यामुळे कल्याण ज्वेलर्स इंडिया लिमिटेडवर (केजेआयएल) नुकत्याच जारी झालेल्या या अध्यादेशामुळे परिणाम होणार नाही. केजेआयएलद्वारे चालवल्या जाणाऱ्या दागिने खरेदी अडव्हान्स योजना नियामक असून त्यांना कॉर्पोरेट अफेयर्स मंत्रालयाद्वारे मंजुरी मिळालेली आहे तसेच आम्ही कायद्यानुसार बंधनकारक असलेले परतावे रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे (आरओसी) दाखल करतो. म्हणूनच आम्हाला असे वाटते, की भारतातील १०२ दालने आणि ६५० माय कल्याण स्टोअर्स यांचा धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजनेमुळे विकास होईल, असे श्री. राजेश कल्याणारामन म्हणाले.

कल्याण ज्वेलर्सने २०१४ मध्ये कंपन्यांचे अधिनियमन (ठेवी स्वीकृती) रूल्स २०१४ झाल्यानंतर पूर्वीच्या दागिने खरेदी अडव्हान्स योजना खंडित केल्या होत्या. या नियमानुसार खासगी कंपन्यांना बोनस व इतर फायदे मिळवून देणाऱ्या पारंपरिक दागिने योजना राबवण्यास बंदी घालण्यात आली होती. मात्र, हा नियम भागिदारी तसेच एकल प्रोप्रायटरशीप, एलएलपी यांच्यासाठी बंधनकारक नव्हता,त्यामुळे जून २०१६ मध्ये कंपनी पब्लिक लिमिटेड कंपनी झाली आणि तेव्हापासूनच दागिने खरेदी अडव्हान्स योजना कायदे व नियमांनुसारच राबवल्या जात आहेत.

केजेआयएल सध्या धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजना राबवत आहे. या योजनांमध्ये सहभागी होणाऱ्या ग्राहकांना दरमहा सलग ११ महिने पैसे भरावे लागतात व त्यानंतर एकूण भरलेले पैसे व फायद्यांसह कंपनी कायद्यामध्ये असलेल्या मंजुरीनुसार दागिने खरेदी करता येते. धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजना नियमांचे पालन करणाऱ्या असून ग्राहकांमध्ये लोकप्रिय आहेत. मासिक हप्ता रोख पैसे, धनादेश, डीडी आणि ऑनलाइन पेमेंटच्या स्वरुपात भरता येऊ शकतो.

कल्याण ज्वेलर्सने धनवर्षा व अक्षय खरेदी अडव्हान्स योजना ग्राहकांच्या स्वरुपात लक्षणीय विकासाचे उद्दिष्ट ठेवले आहे. नियमांचे पालन करणाऱ्या आणि विश्वासार्ह दागिने खरेदी अडव्हान्स योजनेच्या शोधात असलेल्यांसाठी पसंतीचा ब्रँड बनण्यासाठी कल्याण ज्वेलर्स प्रयत्नशील आहे. ‘ग्राहकांना अशा प्रकारच्या योजनांचे लाभ माहीत आहेत आणि दागिने खरेदी अडव्हान्स योजनांमध्ये उत्पन्न २५ टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता असल्याची आम्हाला खात्री आहे.’

कल्याण ज्वेलर्सबद्दल

केरळ राज्यातील थिसूर येथे मुख्यालय असलेले कल्याण ज्वेलर्स हे भारतातील सर्वात मोठ्या दागिने उत्पादक आणि वितरकांपैकी एक आहेत. कंपनी गेल्या शतकभरापासून देशातील वस्त्रोद्योग ट्रेडिंग, वितरण आणि हाउक व्यापार क्षेत्रात कार्यरत आहे. १९९३ मध्ये दागिन्यांचे पहिले दालन सुरू केल्यापासून कल्याण ज्वेलर्स भारतीय बाजारपेठेत गेल्या दोन दशकांपासून कार्यरत आहे. कंपनीने दर्जा, पारदर्शकता, किंमती आणि नाविन्य यांमध्ये नवे मापदंड तयार केले आहेत. कल्याण ज्वेलर्सद्वारे ग्राहकांच्या अनोख्या गरजा पूर्ण करणारे सोने, हिरे आणि प्रेशियस स्टोन्समधील पारंपरिक व अत्याधुनिक दागिने तयार करण्यात येतात. कल्याण ज्वेलर्सची भारत आणि पश्चिम आशियात मिळून १३६ दालने कार्यरत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...