आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सतर्फे एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी योजना सादर

Date:

        एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग वैयक्तिक बचत जीवन विमा योजना जी तुम्हाला  देते मुदतठेवीपेक्षा जास्त परतावा

मुंबई, July, २०२२: आदित्य बिर्ला कॅपिटल लिमिटेड (ABCL) ची जीवन विमा उपकंपनी असलेल्या आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्स (ABSLI) ने मुदत पूर्ण झाल्यावर एकरकमी म्हणून संपूर्ण हमी लाभ देणारी एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग एंडोमेंट ही नव्या युगातली  बचत सुविधा एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन (UIN 109N135V01) सादर करत असल्याची घोषणा केली आहे. विमाधारकांना मुदतठेवीपेक्षा जास्त परतावा आणि सुरक्षा यांचा मेळ घालत अल्प आणि दीर्घकालीन आर्थिक सुरक्षा प्रदान करण्यासाठी डिझाइन केलेली ही योजना आहे.

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी योजनेची ठळक वैशिष्ट्ये 
•	सरलीकृत डिझाइन वन-टाइम सिंगल पे (सिंगल प्रीमियम पेमेंट टर्म) कमीत कमी योजनेची मुदत ५ वर्षे, जास्तीत जास्त १० वर्षांपर्यंत 
•	कोणत्याही खर्चाशिवाय पूर्ण तरलता- पॉलिसी लवकर सरेंडर केल्यावर कोणताही दंड नाही
•	एफडी बीटिंग रिटर्न- ६.४१ % पर्यंत 
•	खात्रीशीर मॅच्युरिटी लाभ- संपूर्ण हमी लाभ देणारे एक नॉन-लिंक्ड, नॉन-पार्टिसिपेटिंग एंडोमेंट उत्पादन 
•	सम अॅशुअर्ड विविध पर्याय - 1.25X to 1.77X किंवा 10X to 10.42X 
एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी योजना उद्योगातील सर्वोत्तम म्हणजे जीवन विम्यासह ६.४१% पर्यंत परतावा देते. हे व्याजदर देशातील बहुतांश प्रमुख बँकांद्वारे मुदत ठेवीवर दिल्या जाणाऱ्या दरांपेक्षा जास्त आहेत.

आपल्या नवीन सरलीकृत बचत सोल्यूशनद्वारे एबीएसएलआय आपल्या विमाधारकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी त्रास-मुक्त आर्थिक हमी मिळण्‍यात मदत करते.

ही योजना मुदत ठेवीप्रमाणे एकल पे प्रस्ताव (प्रिमियम पेमेंट टर्म) आहे आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी पॉलिसीधारकांना योजनेच्या मुदतीच्या (५ ते १० वर्षे) विस्तृत श्रेणीतून निवड करण्याची अनुमती देते. पॉलिसीधारकांना जर योजना सरेंडर करायची असेल तर त्यांचा पैसा वाया जाणार नाही याची खात्री करत शिवाय १००% नी सुरुवात करत सरेंडर बेनीफिट दरवर्षी १% ने वाढेल. आपल्या या नव्या

सादरीकरणातून एबीएसएलआय मुदत ठेवी सारख्या सरलीकृत उत्पादनांना पसंती देत असलेल्या गुंतवणूकदारांना सेवा देतात.

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन सादर करताना त्याबद्दल आदित्य बिर्ला सन लाइफ इन्शुरन्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कमलेश राव म्हणाले, “या अनिश्चिततेच्या युगात आम्ही आमच्या विमाधारकांना आवश्यक आर्थिक हमी आणि कोणत्याही प्रसंगात त्यांना योग्यरित्या संरक्षण सुविधा प्रदान करण्यासाठी सतत मदत करण्यास उत्सुक आहोत. एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन त्यांच्या सर्व स्वप्नांसाठी आवश्यक आर्थिक हमी देते आणि उद्योगातील सर्वोत्कृष्ट परताव्यासह त्यांना त्यांच्या गुंतवणुकीचे नियोजन करण्याची मुभा देते. यामध्ये त्यांना सर्वसमावेशक जीवन विमा संरक्षण देखील मिळते. त्यामुळे आकस्मिक घटना घडल्यास त्यातून त्यांच्या कुटुंबाचे संरक्षण होते. मुदत ठेवी पेक्षा जास्त परतावा देत ही योजना विमाधारकांना जीवन विमा बचत योजनेच्या सर्व पारंपरिक वैशिष्ट्यांचा लाभ घेण्यास सक्षम करते.”

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटी प्लॅन विविध सम अॅश्युअर्ड रकमेतून निवड करण्याचा लाभ देते. पॉलिसीधारक एकतर पर्याय ए (1.25X ते 1.77X सम अॅश्युअर्ड) किंवा पर्याय बी (10X ते 10.42X सम अॅश्युअर्ड) निवडू शकतात. परतावा विमा रकमेच्या निवडीवर अवलंबून असेल; अशा प्रकारे, पर्याय ए पर्याय बी च्या तुलनेत जास्त परतावा आकर्षित करेल.

एबीएसएलआय फिक्स्ड मॅच्युरिटीच्या मुख्य वैशिष्ट्यांमध्ये हे समाविष्ट आहे:

·         गॅरंटीड मॅच्युरिटी: बाजारपेठेची परिस्थिती कशीही असली तरी ग्राहकांना पूर्णपणे खात्रीशीर हमी फायदे मिळतील

·         आर्थिक सुरक्षा: विमा उतरविलेल्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास ग्राहकांना सर्वसमावेशक जोखीम संरक्षण मिळेल

·         लवचिकता: ग्राहकांना पॉलिसीच्या मुदत (५-१० वर्षे) आणि सम अॅश्युअर्ड पर्यायात निवड करता येणार

·         पॉलिसी कर्ज: लागू सरेंडर व्हॅल्यूच्या त्या तारखेपर्यंत कोणतीही थकबाकी पॉलिसी कर्ज शिल्लक कमी असताना किमान पॉलिसी कर्ज ५००० रुपये असू शकते आणि प्लॅन ऑप्शन ए साठी कमाल ८०% आणि प्लॅन ऑप्शन बी साठी ६५%.

·         कर लाभ: कर लाभ प्रीमियम भरताना किंवा लाभ मिळाल्याच्या वेळी प्रचलित कर कायद्यांच्या अधीन असतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी कमाल प्रवेश वय ६० वर्षे (पर्याय अ) आणि ५० वर्षे (पर्याय ब), तर किमान वय ८ वर्षे आहे. शिवाय, किमान वार्षिक प्रिमियम १२००० रु. आणि किमान विमा रक्कम १५००० रु.आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.