शौचालय, फुटपाथ, भिंती रंगवणे म्हणजे स्मार्ट सिटी का ? आबा बागुल यांचा प्रश्न

Date:

स्मार्ट सिटीच्या मानांकनात न अडकता पुणे शहर कसे स्मार्ट करता येईल याकडे लक्ष द्या, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते आबा बागूल यांनी स्मार्ट सिटीच्या सीईओ यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

.

पुणे:- गेल्या काही वर्षांत स्मार्ट सिटीचा कारभार बघता पुणेकरांचा या योजनेवरील विश्वास उडालेला आहे. स्मार्ट म्हणजे काय हेच पुणेकरांना समजण्यास तयार नाही. शहरात मोठे फुटपाथ तयार करणे, झाडे लावणे, रस्ते बनवणे, शौचालयांना रंगरंगोटी करणे म्हणजेच स्मार्ट शहर करणे की काय? असा समज आता नागरिकांचा होऊ लागला आहे. ही कामे तर महानगरपालिकेच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सभासद आपल्या भागात करत आहेत.

मग स्मार्ट सिटी म्हणून कोणती विशेष कामे स्मार्ट सिटीने केली आहेत? असा सवालही बागूल यांनी उपस्थित केला आहे.

स्मार्टची संकल्पना अशी होती की, शहरावर त्याचा प्रभाव पडेल आणि खऱ्या अर्थाने लोकांच्या जीवाला, आरोग्याला व इतर कोणत्याही गोष्टीला धोका नसेल, हा खरा स्मार्टनेस पाहिजे. शहरामध्ये वाहतुकीचा आराखडा करणे, सार्वजनिक वाहतूक सक्षम करणे व नागरिकांचा त्याकडे कल वाढवणे म्हणजे स्मार्टनेस.

सर्व इ गव्हर्नन्स आणणे त्याचे मार्गदर्शन करणे म्हणजे स्मार्टनेस, पर्यावरणाचा समतोल राखणे म्हणजे स्मार्टनेस, 900 हेक्टर बीडीपी झोनवर कसे वृक्षारोपण करणे, बीडीपीचे कसे संरक्षण व संवर्धन करता येईल म्हणजे स्मार्टनेस, पाण्याचा पुनर्वापर करणे म्हणजे स्मार्टनेस, महानगरपालिकेचा शिक्षणाचा दर्जा खालावत असताना दर्जेदार शिक्षण देणे म्हणजे स्मार्टनेस, शहरातील कचऱ्यासाठी उपाय योजना करणे म्हणजे स्मार्टनेस.

अशा उपाययोजना स्मार्ट शहर करत असताना माझ्या व पुणेकरांच्या मनात कल्पना होत्या. परंतु, सर्व आशा फोल ठरल्या. अशाप्रकारे स्मार्ट सिटीने काम केल्यास मानांकनासाठी आपण जी धावपळ करतोय. ती करावी लागणार नाही व मानांकनामध्ये आपले शहर कायमचे एक नंबरला राहिल.

इतर 99 शहरे आपला आदर्श घेऊन कामे करतील यासाठी आपण शहराच्या शाश्वत विकासाठी प्राधान्याने लक्ष द्यावे. शहरासाठी महत्वाचे असलेल्या कामांना प्राधान्य देऊन शहर कसे स्मार्ट करता येईल, याकडे लक्ष द्यावे, असेही बागूल यांनी पत्रात म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.