Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेतकरी वाचवा देश वाचवा अन्न दाता गुढी

Date:

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या घरी
पुण्यातील युवकांनी उभारली अन्नदाता गुढी
           पुणे- दुष्काळ, अतिवृष्टी, गारपीट अशा नैसर्गिक संकटांबरोबरच सध्याच्या महाराष्ट्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्रात शेतकर्‍यांच्या मोठया प्रमाणात आत्महत्या होत आहेत. त्यांच्या घरी गुढीपाडव्याच्या दिवशी जाऊन पुण्यातील युवकांनी “अन्नदाता गुढी”उभारुन त्या कुटुंबियांचे अश्रू पुसले. तसेच शेतकर्‍यांच्या हक्कांबाबत समाज जागरणही केले.
            नगर जिल्हयातील नेवासा तालुक्यातील सोंदाळा गावातील शेतकरी सूर्यभान ज्ञानदेव अरगडे (वय – 32), तसेच उत्सव धुमाला गावातील शेतकरी दिलीप मदाजी काकडे (वय – 48) आणि शेतकरी पांडुरंग रामा कदम या व इतर शेतकर्‍यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. वरील तीन शेतकरी बांधवांच्या घरी जाऊन पुण्यातील तरुण अमित बागुल व त्यांच्या तरुण सहकार्‍यांनी या दुःखी कुटुंबियांची भेट घेऊन ‘अन्नदाता गुढी” उभारली. कुटुंबियांचे सांत्वन केले. तसेच प्रत्येकी रु. 11,000/- चेकने कुटुंबियांना दिले. तसेच या कुटुंबियांच्या घरी शेतकर्‍यांचे व्यथा मांडणारी रांगोळी देखील काढण्यात आली. या अनोख्या उपक्रमावेळी कुटुंबियांचे डोळे पाणावले. याप्रसंगी गावकरीदेखील मोठया संख्येने उपस्थित होते.
            यानिमित्त अमित बागुल म्हणाले की, “नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी संकटात आला असताना केंद्र व राज्य सरकारांनी शेतकर्‍यांच्या मदतीला धावून येणे महत्वाचे असते. बँका, सोसायटी व खाजगी कर्ज काढून शेती जगवण्याचा प्रयत्न अन्नदाता शेतकरी करीत असतो. मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे कर्जबाजारीपण येते.
             शेतीमालाला हमी भाव मिळत नाहीत. सरकार पुर्ण कर्ज माफी पण करीत नाही. सार्‍या जगाचा अन्नदाता आज उपाशी आणि हे सरकार तुपाशी अशी परिस्थिती संपूर्ण देशात झाली आहे. शेतकर्‍यांचे कोणतेही प्रश्न सरकार मार्गी लावत नसल्यामुळेे वैफल्यग्रस्त
झालेला शेतकरी आत्महत्या करतो हे महाराष्ट्राला भूषणास्पद नाही. आपला देश पूर्वी शेतीप्रधान देश म्हणून ओळखला जायचा. पण शेतकरीच टिकला नाही,शेतीही टिकली नाही तर इतर देशांकडून आपल्याला अन्नधान्य आयात करण्याची वेळ येईल. आता सरकारने शेतकर्‍यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यासाठीच  या दुःखी कुटुंबियांच्या घरी “अन्नदाता गुढी”उभारुन आम्ही त्या कुटुंबांना आधार देण्याचा  प्रयत्न केेला. तसेच अशा प्रातिनिधीक उपक्रमातून जागरण होवून सरकारचे डोळे उघडले जावेत अशीही अपेक्षा आहे असे ते म्हणाले.
            या उपक्रमाबदद्ल माहिती देताना अमित बागुल म्हणाले की, अशा या उपक्रमाचे हे 5 वे वर्ष असून यापूर्वी पुणे पत्रकार संघात ‘दर्पण गुढी त्याचबरोबर 26/11 या दहशतवादी हल्ल्यामध्ये शहीद झालेले वरिष्ठ पोलीस अधिकारी शहीद अशोक कामठे यांच्या घरी ‘शौर्य गुढी’ व सातारा येथील कर्नल शहीद संतोष महाडिक यांच्या घरी देखील गुढी उभारण्यात आली होती. धुळे येथेही आम्ही जाऊन पाकिस्तानच्या ताब्यातून 124 दिवसांनंतर सुटून आलेले शिपाई चंदू चव्हाण यांच्या धुळे येथील निवासस्थानी देखील गुढी उभारण्यात आली होती. सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून हा उपक्रम आम्ही राबवत असून  पुण्यातील नगरसेवक माजी उपमहापौर आबा बागुल यांचे मार्गदर्शनाखाली आम्ही उपक्रम राबवित आहोत. या कार्यक्रमावेळी परिसरातील ग्रामस्थ मोठया संख्येने सहभागी झाले. याबदद्लही त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
            या उपक्रमाचे आयोजन अमित बागुल,सरचिटणीस, पुणे शहर जिल्हा काँगे्रस कमिटी यांनी केले होते.
            या अभिनव उपक्रमात पुण्यातील संतोष पवार,योगेश निकाळजे, धनंजय कांबळे, संतोष गेळे, गोरख मरळ, इम्तियाज तांबोळी, अभिषेक बागुल, अ‍ॅड. चंद्रशेखर पिंगळे, विक्रांत गायकवाड, उमाकांत गायकवाड, भरत तेलंग, सुयोग धाडवे, महेश ढवळे,प्रकाश आरणे, समीर शिंदे, अ‍ॅड.प्रताप डांगे, निवृत्ती काळे, बाबालाल पोळके, बद्रीशेठ चिंधे, संजयजी सुखदान, बाळासाहेब देवखिळे, वैशाली आरगडे,रेवणनाथ पवार, माधवराव काळे, संजय दवांडे, शिवाजी आरगडे, अशोक शिंदे, महेंद्र चव्हाण, अमर ससाणे हेसहभागीझाले
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून विनम्र अभिवादन

“समानता, न्याय आणि संवैधानिक मूल्यांची जपणूक हीच बाबासाहेबांना खरी...

पुण्यात ‘पुनीत बालन क्रिकेट अकॅडमी’ची घोषणा

बीसीसीआय स्टॅंडर्डसह देशातील सर्वात मोठा प्रायव्हेट क्रिकेट सेटअप सुरू पुणे...

नगर अभियंता पदावर ..अनिरुद्ध पावसकर !

पुणे महापालिकेतील नगर अभियंता पदावर पथ विभागाचे प्रमुख अभियंता...

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...