शहरी गरीब योजने अंतर्गत लाभार्थीना रुग्णालयांकडून विदेशी औषधांऐवजी जेनेरिक औषधे वापरण्यास सक्ती करावी – आबा बागुल

Date:

पुणे- शहरात शहरी गरीब योजने अंतर्गत प्रत्येक कुटुंबाकरिता २ लाख रुपये अनुदान गरजू  व  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांवर उपचाराकरिता  वर्षाखेरीज पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील पॅनेलवर असलेल्या वेगवेगळ्या  रुग्णालयांना दिले जाते. यामध्ये रुगणांना उपचार, सर्व प्रकारच्या तपासण्या व औषधे  यांवर होणारा खर्च रुपये २ लाख पर्यंत  किंवा येणाऱ्या बिलाच्या ५० % रक्कम रुग्नालयांना अदा करण्यात येते. परंतु रुग्णालयांतर्फे या बिलामध्ये औषधांची किंमत विदेशी औषधे वापरून वाढवण्यात येते परिणामी बिलावर त्याचा परिणाम होऊन बिलाची रक्कम वाढते त्याऐवजी जेनेरिक औषधे वापरल्यास बिल कमी येईल व ते रुग्णांना परवडण्यासारखे असेल. रुग्णालयाच्या बिलामध्ये उपचारापेक्षा विदेशी औषधाचेच बिल जास्त असते . याबाबत वेळोवेळी लेखी व  तोंडी तक्रारी आपल्या खात्याकडे केल्या असून त्यासंबंधात योग्यत्या उपाय योजना करण्याचे आपणांस सांगण्यात आले परंतु  या रुग्णालयांवर अद्याप जेनेरिक औषधे वापरण्याबाबत कोणतेही बंधन घातलेले दिसून येत नसून  खात्यामार्फत टाळाटाळ करत असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे हि  नागरिकांची व पुणे महानगरपालिकेची सर्रास लूट सुरु आहे.आपण याबाबत सकारात्मक पावले उचलून हि लूट थांबवावी हि कळकळीची विनंती  पुण्याचे माजी उपमहापौर  आबा बागुल यांनी प्रशासनाला केली  . 
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २०१६ साली सर्व नागरिकांना परवडणाऱ्या दरामध्ये औषधे उपलब्ध व्हावी याकरिता प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना सर्व भारतभर लागू केली. व सरकारी तसेच सरकारी अनुदानावर चालणाऱ्या व सरकारी फायदे घेणाऱ्या सर्व रुग्णालयांनी प्रथम रुग्णांना जेनेरिक औषधे देणे बंधनकारक आहे. याची अंमलबाजवणी होणे गरजेचे आहे. असेही आबा बागुल म्हणाले 
आबा बागुल म्हणाले कि , शहरी गरीब योजने अंतर्गत पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रती वर्षी महानगरपालिकेच्या अंदाजपत्रकात २० कोटी रुपयांची तरतूद केली जाते. सर्वसाधारण  १६ ते १८ हजार रुग्णांवर यामार्फत उपचार केले जातात याची संख्या वाढवण्यासाठी विदेशी औषधांचा वापर कमी करून जेनेरिक औषधांचा जास्तीत जास्त वापर केल्यास रुग्ण लाभार्थींची संख्या तिपटीने वाढेल म्हणजेच अंदाजे ५० हजार रुग्णांना हि सुविधा मिळू शकेल . जेनेरिक औषधे वापरणे कायद्याने बंधनकारक असताना त्याच्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून शहरी गरीब योजने अंतर्गत गरिबांना जाणीवपूर्वक विदेशी औषधे वापरून लूट करण्यात येत आहे. जेनेरिक औषधे व विदेशी औषधांचा गुणधर्म एकच असून फक्त पैसे मिळवण्याच्या हेतूने रुग्णालये विदेशी औषधांची मागणी करतात. रुग्णाने जेनेरिक औषधांची मागणी केल्यास त्याला अधिक घाबरवले जाते व या औषधाने काही झाल्यास आम्ही जबाबदार राहणार नाही तुम्ही आमच्या रुग्णालयाच्या मेडिकल मधून औषधे घ्या असे बंधनकारक केले जाते. हि बाबा पूर्णपणे बेकायदेशीर असून  पुणे शहरातील सर्व रुग्णालयात जेनेरिक औषधांबाबत जनजागृतीचे बोर्ड लावणे बंधनकारक करणे गरजेचे आहे. 
वरील सर्व बाबींचा विचार करून आयुक्तांनी  नागरिकांची होणारी लूट थांबवावी व रुग्णालयांना जेनेरिक औषधांचा वापर करण्याची सक्ती करावी अन्यथा या नागरिकांसाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आमच्यावर आणू नये. असा इशारा आबा बागुल यांनी प्रशासनाला दिला.   
 
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

विकास, सेवा, सुशासनला मतदारांचा कौल – भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजयभाजपावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल मतदारांचे...

पुण्यात अजीत पवारच ‘दादा’.. मविआ चा सुपडा साफ

पुणे -आज झालेल्या मतमोजणीत जिल्ह्यातील 17 पैकी 9 पालिकांमध्ये...

चारित्र्यवान व्यक्तींची साथ-संगत अन्‌ आव्हाने स्वीकारल्याने यशाची प्राप्ती : सचिन ईटकर

रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे सचिन ईटकर यांचा जिंदादिल पुरस्काराने गौरव पुणे :...

पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही : अमोल पालेकर..

आयुष्याविषयी ठाम भूमिकेमुळे आज मी तृप्त आहे : अमोल पालेकर पुणे : भाग्य या संकल्पनेवर माझा विश्वास नाही. चित्रपट, नाट्य क्षेत्रात अभिनय करताना संवेदनशीलता, भावनात्मक मोकळेपणा जपत राहिलो. कोणत्याही एका साचेबद्ध भूमिकेत न अडकता अभिनयात वैविध्य देण्याचा माझा स्वभाव, नवेपणा स्वीकारण्याची इच्छा असल्यानेच मी खलनायकी भूमिकाही साकारल्या.  त्यामुळेच खलनायकी भूमिकेतही अभिनयातून सच्चेपणाच मांडत गेलो. आयुष्याच्या वाटेवर कुठे थांबायचे, कुठे बदल करायचे याविषयी माझ्या ठाम भूमिका असल्यामुळे आज मी जो आहे तो तृप्त आहे, अशा भावना सुप्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी व्यक्त केल्या. रोटरी मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशीच्या (दि. 21) पहिल्या सत्रात अमोल पालेकर आणि संध्या गोखले यांच्याशी उत्तरा मोने यांनी संवाद साधला. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात अमोल पालेकर यांच्या असंख्य चाहत्यांच्या प्रतिसादात ही मुलाखत रंगली. अमोल पालेकर पुढे म्हणाले, अभिनेता म्हणून रसिकांनी मला भरभरून प्रेम दिले, तसेच प्रेम माझ्या साहित्यकृतीला मिळेल हा विश्वास मला होता. ज्यांना माझे विचार पटत नाहीत त्यांना पलटवार करण्याची संधी मिळेल असे वाटले होते; परंतु ते प्रमाण खूपच कमी असल्याने त्यांची दखल घेण्याची गरज पडली नाही. माझ्या भूमिका रसिकांना आवडल्या याचे श्रेय माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शकांना द्यावे लागेल कारण त्यांनी माझे व्यक्तिमत्व फुलविण्याची संधी दिली. मी मुळचा मुंबईचा असलो तरी आजची मुंबई मला परकी वाटते. मुंबईत ओळखीच्या ठिकाणीजाताना आज मी गुगल मॅपच्या मदतीशिवाय पोहोचू शकत नाही. परंतु गेली 25 वर्षे पुण्यात स्थायिक असल्याने पुणे खूप बदलले नाही असे मला जाणवते. त्यामुळे पुण्यात रमलो. मी पुणेकर झालो असलो तरी माझ्यात पुणेरीपण नाही, अशी टिप्पणीही अमोल पालेकर यांनी केली. पालेकर पुढे म्हणाले, माझ्यातील चित्रकार कुठल्याही इझममध्ये किंवा ठराविक विचारात अडकलेला नाही. त्यामुळे मी चित्रातून प्रकटीकरण करताना अमूर्त शैलीचा वापर करतो. दिग्दर्शकाच्या भूमिकेत असताना माझ्यातील चित्रकार जागा असल्यामुळे मला दृश्यात्मक परिणामांवर विशेष लक्ष द्यावे असे वाटते. त्यामुळे माझ्या चित्रपटांमध्ये दृश्यात्मक बटबटीतपणा कधीच आला नाही. चित्रिकरणाचा विचार पटकथेपासूनच केला जातो. त्यामुळे प्रकाश योजना, नेपथ्य, ऋतु यांविषयी सखोल विचार करून चित्रपट निर्मिती केली जाते. लहानपणापासूनच घरामध्ये वाचन संस्कृती रुजलेली असल्यामुळे मला साहित्यविषयक गोडी लागली. यातूनच माझ्या हातून ऐवजसारखी साहित्यकृती निर्माण झाली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी विचार ठाम : संध्या गोखले.. आपल्या घरातील नायक अशी ओळख असलेल्या अमोल पालेकर यांनी चित्रपटात नायक साकारताना समकालीन प्रसिद्ध नायकांपेक्षा वेगळेपण दर्शविल्याने ते सामान्यांचा नायक म्हणून आपला ठसा उमटविण्यात यशस्वी झाले, असे सांगून संध्या गोखले म्हणाल्या, खऱ्या आयुष्यातही अमोल पालेकर एक शांत, समंजस, विचारी, संवेदनशील आणि सहनशील व्यक्ती आहेत. परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयी त्यांचे व माझे काही ठाम विचारही आहेत. त्यासाठी आम्ही सातत्याने लढा देत आहोत. पुण्यात कला क्षेत्रात पूरक वातावरण असल्यामुळे आमच्या हातून कला क्षेत्रात विविध उपक्रम घडले.