पुणे- देहूच्या कार्यक्रमात पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या कार्यक्रम पत्रिकेत द्वेंद्र फडणवीसांचे भाषण संमत केले आणि महाराष्ट्रातील उपमुख्यमंत्री , पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या भाषणाला मात्र संमती दिली नाही त्यामुळे पंतप्रधानांचे स्वागताला आणि कार्यक्रमाला महाराष्ट्राच्या वतीने गेलेल्या अजित पवारांचा पर्यायाने महाराष्ट्राचा अवमान झाल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांत पसरली असून यामुळे देहू संस्थानाच्या पदाधिकाऱ्यांकडे याबाबत पंतप्रधान कार्यालयाने संमत केलेली कार्यक्रमपत्रिकेची प्रत मागितली जाऊ लागली आहे.आज पुण्याचे माजी उपमहापौर आणि राष्ट्रवादीतील युवकांमधील लोकप्रिय नेते दीपक मानकर यांनी देहू संस्थांच्या अध्यक्षांना याबाबत फोनवरून विचारणा केली या संदर्भात त्यांचे देहू देवस्थानचे अध्यक्ष मोरे महाराज यांच्याशी झालेले फोनवर बोलणे व्हायरल झाले आहे …
