Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

व्यंगातून पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करणारा चित्रपट – ‘बबलू बेबीलॉन से’

Date:

पणजी, 23 नोव्‍हेंबर 2021 (शरद लोणकर )

कुछ लोग आये है  पेड काटने मेरे गांव में

अभी धूप है तो बैठे है उसके छांव में

‘बबलू बेबीलॉन से’या चित्रपटाच्या माध्यमातून हाच संदेश आम्हाला द्यायचा आहे. असे मनोगत या चित्रपटाचे दिग्दर्शक अभिजीत सारथी यांनी आज पणजी, गोवा इथे 52 व्या इफ्फीमध्ये व्यक्त केले. इंडियन पॅनोरमाच्या नॉन -फीचर फिल्म विभागात त्यांच्या या चित्रपटाचे आज प्रदर्शन झाले, यावेळी त्यांनी प्रसार माध्यमातील प्रतिनिधींबरोबर संवाद साधला.

या चित्रपटाच्या निर्मितीमागच्या प्रेरणेविषयी बोलताना अभिजीत सारथी यांनी नमूद केले की, ‘‘ आपण जर कोणत्याही एका बाजूचे नसलो आणि तटस्थपणे जे काही होतेय ते पहात उभे असलो, तरीही त्याचे परिणाम होत असतात, ही गोष्ट मी चित्रपटाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.’’

ते पुढे म्हणाले की, लोक संदेश घ्यायला तयार असतात, परंतु त्यांना त्या दिशेने मार्गदर्शन करावे लागते. प्रेक्षकांनी थोडा वेळ थांबून, आपण नेमके कुठे जात आहोत, याचा जरूर विचार करावा.

चित्रीकरणानंतर या चित्रपटाला अंतीम स्वरूप कसे प्राप्त झाले, याविषयी बोलताना अभिजीत सारथी यांनी सांगितले की, आपण एकूण 22 पानांची पटकथा लिहिली होती. परंतु चित्रीकरणानंतर लक्षात आले की, हा चित्रपट ‘स्लो-बर्न’ व्यंग्यात्मकरितीने आपल्याला चांगला, प्रभावीपणाने दाखवता येऊ शकतो. चित्रपटामध्ये अशी अनेक दृश्ये आहेत, त्यांचा कथेच्या प्रवाहीपणावर कोणताही परिणाम न होता काढता आली असती. मात्र हे विराम, श्वासोच्छवासाच्या जागा मला चित्रपटामध्ये ठेवायच्या होत्या. त्यामुळे चित्रपटाचा स्वतःचा मूड तयार होऊन ती कथा प्रेक्षकांना पुढे घेऊन जाईल. हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनामध्ये काही काळ रेंगाळला पाहिजे आणि त्याचा आनंददायी अनुभव त्यांना घेता आला पाहिजे, अशी माझी इच्छा आहे.’’नायकाविषयी बोलताना दिग्दर्शक म्हणाले, ‘‘ चित्रपट म्हणजे एक सहयोगी प्रयत्न होता. मनोज पाहवा जी यांनी माझ्याकडून या चित्रपटात अभिनय करण्यासाठी कोणतेही पैसे घेतले नाहीत. इतकी वर्षे ते सिनेमा व्यवसायामध्ये काम करीत असूनही त्यांना कामाच्या तालमी करण्याची आवड आहे. चित्रीकरणाच्याआधी ते अतिशय विस्तृत टिपणे तयार करून यायचे. आमच्यासाठी ही गोष्ट म्हणजे नवीन शिकण्याचा अनुभव होता.’’

चित्रपटाबद्दल:

चित्रपटाची कथा  समांतर जगात घडत आहे. बबलू हा एकटा  राहत असलेला म्हातारा माणूस आहे जो ‘बेबीलॉन ’ या कंपनीसाठी काम करतो, जिच्या मालकीची  सर्व झाडे आणि रोपे  आहेत. जेव्हा बबलूला त्याचा  मालक त्याच्या शेवटच्या कामासाठी  पाठवतो, तेव्हा त्याची गाठ चुकून एका बंडखोर गटाशी पडते. हा गट   ‘बेबिलॉन ‘ विरुद्ध गुप्त मोहिमेची योजना आखत असतो.

दिग्दर्शकाबद्दल:

कोलकाता येथील सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटचे माजी विद्यार्थी अभिजीत सारथी यांचा दिग्दर्शन आणि पटकथा लेखनात हातखंडा आहे. त्यांनी  काही लघुपट बनवले   आहेत आणि एका लघुपटासाठी सहाय्यक लेखन देखील केले आहे ज्यात पंकज त्रिपाठी यांनी अभिनय केला आहे.  ऑन द रॉक्स या एकल पडदा  चित्रपटगृहावरील लघुपटाचेही ते  लेखक आणि दिग्दर्शक आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएमआरडीए प्रकल्पातून २७ गावांना मिळणार प्रगत सांडपाणी व्यवस्थापन!

१६ क्लस्टर्समध्ये ₹१,२०९ कोटींचा खर्च; पर्यावरण रक्षणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान...

संस्कृती, परंपरा जपत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या संकेतस्थळाचा शुभारंभ सातारा :...

‘नवा भारत समजून घ्यायला हवा’

पुणे, १६ डिसेंबरभारत महाशक्ती म्हणून पहिल्यांदाच सिद्ध होत असल्यामुळे...