Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

दौंड, इंदापूरला पाणी -निषेधार्थ ;काँग्रेसचा मोर्चा ‘पाण्याच्या प्रश्‍नावरून राजकारण -पालकमंत्री गिरीश बापट

Date:

पुणे -शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरणातून दौंड आणि इंदापूरला जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी त्यांच्या अधिकारात घेतल्याने याचा निषेध व्यक्त करण्यासाठी महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयादरम्यान मोर्चा काँग्रेस पक्षाने काढला . या मोर्चाचे नेतृत्व माजी ग्रहराज्य मंत्री आणि काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रमेश बागवे यांनी केले.दरम्यान पाण्याच्या प्रश्‍नावरून कोणी राजकारण करू नये. पुण्यातील काही मित्रांनी आंदोलन केले. ते थांबवावे, अशी मी विनंती करतो,‘‘ असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. पुण्याला ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी असून, पुणे शहराच्या पाण्यात एक थेंबही कपात करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामीण भागाला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला गेला. त्या पार्श्वभूमीवर महात्मा फुले मंडई ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत महामोर्चाचे आयोजन केले होते. याचे नेतृत्व माजी गृह राज्यमंत्री रमेश बागवे यांनी केले. उपमहापौर मुकारी अलगुडे, महापालिकेतील गटनेते आणि विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, माजी आमदार चंद्रकांत छाजेड आणि नगरसेवक अविनाश बागवे,  नगरसेवक संजय बालगुडे तसेच मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते. पाणी प्रश्नासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र मुठे यांना निवदेन देण्यात आले.

या विषयी माजी गृहराज्यमंत्री आणि पुणे शहर अध्यक्ष रमेश बागवे म्हणाले की, मागील काही माहिन्यांपासून पुणेकर जनतेने काटकसर करून पाण्याची बचत केली आहे. त्यात ग्रामीण भागाला 1 टीएमसी पाणी देण्याचा  जिल्हाधिकारी सौरभ राव यांचा निर्णय चुकीचा आहे. त्यांना अर्धा टीएमसी पाणी देण्याची गरज होती. टँकर किंवा रेल्वेने पाणी देण्याची गरज होती. असे प्रशासनाने केले नाही. याचा तीव्र शब्दात त्यांनी निषेध व्यक्त केला.

‘पाण्याच्या प्रश्‍नावरून राजकारण’
दरम्यान ‘पाण्याच्या प्रश्‍नावरून कोणी राजकारण करू नये. पुण्यातील काही मित्रांनी आंदोलन केले. ते थांबवावे, अशी मी विनंती करतो,‘‘ असे आवाहन पालकमंत्री गिरीश बापट यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले. पुण्याला ऑगस्टपर्यंत पुरेल एवढे पाणी असून, पुणे शहराच्या पाण्यात एक थेंबही कपात करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खडकवासला प्रकल्पातून दौंड आणि इंदापूरला पाणी सोडण्याच्या निर्णयावरून गेले तीन दिवस पुण्यात विरोधी पक्षांनी बापट यांच्याविरुद्ध आंदोलनाचा पवित्रा घेतला. जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी बुधवारी प्रशासनाची भूमिका आणि पाणीवाटपाची स्थिती सांगितली. धरणांतून कालव्याद्वारे पाणी सोडण्यास कालपासून सुरवात झाली. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अतुल कपोले, भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापालिकेतील भाजपचे गटनेते गणेश बीडकर उपस्थित होते.

बापट म्हणाले, ‘महापालिकेने मुंढवा जॅकवेल येथून शेतीसाठी एक अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी दिले. धरणापासून पर्वती जलकेंद्रापर्यंतच्या जलवाहिनीमुळे कालव्याद्वारे पाणी घेणे थांबले. कालव्यातून होणारा 0.25 टीएमसी पाण्याचा पाझर थांबला. खडकवासला धरणात एक टीएमसी अचल साठा आहे. धरणात जॅकवेल बांधल्याने पंपिंग करून अचल साठ्यातील पाणी घेता येईल. कालव्यातून सोडलेल्या पाण्याची चोरी थांबविण्यासाठी पथके नेमली. विद्युत मोटारी जप्त केल्या. पाण्यावर कोणा एकाचा हक्क नाही. इंदापूरला 0.8 टीएमसी आणि दौंडला 0.5 टीएमसीची मागणी होती. त्यात कपात करून एक टीएमसी पाणी देत आहोत. तेथील तीन लाख लोकसंख्येला आणि जनावरांना पाणी दिले पाहिजे. पाणी सर्वांचे आहे .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...