Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

ग्रामीण भागातील 10 कोटी कुटुंबांना मिळाले नळाद्वारे पिण्याचे पाणी

Date:

मुंबई-भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, जल जीवन अभियान (जेजेएम) ने ग्रामीण भागातील 10 कोटी कुटुंबांना नळाद्वारे सुरक्षित आणि स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून एक नवा टप्पा गाठला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 ऑगस्ट 2019 रोजी लाल किल्ल्याच्या तटावरून जेव्हा जल जीवन अभियानाची घोषणा केली, तेव्हा ग्रामीण भागातील केवळ 3.23 कोटी (16.90%) कुटुंबाना नळ-जोडणी द्वारे पाणी उपलब्ध होते. देशाने 19 ऑगस्ट 2022 रोजी कार्यान्वित असलेल्या 10 कोटी घरगुती नळ-जोडणीचा टप्पा गाठला. 

आतापर्यंत, 3 राज्ये (गोवा, तेलंगण आणि हरियाणा) आणि 3 केंद्रशासित प्रदेश (पुडुचेरी, दीव आणि दमण, दादरा आणि नगरहवेली, अंदमान आणि निकोबार बेट समुह) यांनी 100% घरगुती नळ-जोडणी नोंदवली आहे. पंजाब 99.93%, त्या पाठोपाठ गुजरात 97.03%, बिहार 95.51% आणिहिमाचल प्रदेश 94.88% ही राज्ये लवकरच 100 टक्के उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ आहेत.

17 ऑगस्ट 2022 रोजी गोवा हे देशातील पहिले ‘हर घर जल’ प्रमाणित राज्य तर  दादरा आणि नगर हवेली आणि दमण आणि दीव हा पहिला  केंद्रशासित प्रदेश ठरला, जेथे सर्व गावांमधील लोकांनी ग्राम सभा घेऊन आपल्या गावातील प्रत्येक कुटुंबाला पुरेसा, सुरक्षित आणि नियमित पाणी पुरवठा उपलब्ध असल्याची पुष्टी दिली. 

ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबाला विहित गुणवत्तेचे आणि पुरेशा प्रमाणातील पाणी नियमितपणे दीर्घ काळासाठी उपलब्ध करून देणे हे या अभियानाचे उद्दिष्ट आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांच्या अथक प्रयत्नांमुळे देशातील 8.67 लाख (84.35%) शाळा आणि 8.96  लाख (80.34%)  अंगणवाडी केंद्रांना नळाद्वारे पाणी पुरवठा सुनिश्चित झाला आहे. हे अभियान सुरु झाले, त्यावेळी देशातील 117 आकांक्षित जिल्ह्यांमधील केवळ 24.32 लाख (7.57%) कुटुंबाना नळ-जोडणी द्वारे पाणी उपलब्ध होते, जी संख्या आता वाढून 1.54 कोटी (48.00%) इतकी झाली आहे. तेलंगणा मधील तीन तर पंजाब हरयाणा आणि हिमाचल प्रदेश मधील प्रत्येकी 1 आकांक्षित जिल्ह्यात  100% पाण्याची नळाद्वारे पाणीपुरवठा नोंदवण्यात आला आहे.

जेजेएम ने ग्रामीण जनतेला मोठा सामाजिक-आर्थिक लाभ मिळवून दिला आहे. नळाद्वारे नियमित पाणी पुरवठ्यामुळे जनतेला, विशेषतः महिला आणि लहान मुलींना आपल्या दैनंदिन वापराच्या गरजेसाठी पाण्याच्या जड बादल्या वाहून नेण्यापासून मुक्तता मिळाली आहे, ज्याने दीर्घ काळापासूनचे त्यांचे कष्ट कमी झाले आहेत. हा वाचलेला वेळ रोजगार देणाऱ्या उपक्रमांसाठी, नवी कौशल्ये शिकण्यासाठी आणि मुलांच्या शिक्षणाला आधार देण्यासाठी वापरता येऊ शकतो.

योजनांच्या दीर्घ कालीन शाश्वतेसाठी, ग्रामीण भागातील नळाद्वारे पाणीपुरवठा योजनांचे नियोजन, अंमलबजावणी, संचालन आणि देखभाल यामध्ये सुरुवातीपासूनच जन सहभाग महत्वाचा राहिला आहे. देशात एकूण 5.08 लाख ग्रामीण पाणी आणि स्वच्छता समित्या (VWSC)/पाणी समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. 

या अभियानामध्ये पाण्याची गुणवत्ता हा अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. अभियानाच्या कालावधीत देशात एकूण 2,070 पाण्याची चाचणी करणाऱ्या प्रयोगशाळा विकसित, बळकट आणि निर्धारित करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत 10.8 लाख ग्रामीण महिलांना फील्ड टेस्टिंग किट्स (FTKs), म्हणजेच,  जल-चाचणी संच वापरण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहेत, प्रशिक्षित महिलांनी 1.7 लाख गावांमध्ये पाण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी फील्ड टेस्टिंग किट्सच्या मदतीने 58 लाखापेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत.        

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

एक कोटी शेळ्या सोडण्याचा निर्णय हास्यास्पद:अजित पवारांनी फेटाळला वनमंत्र्यांचा प्रस्ताव

नागपूर-राज्यात बिबट्यांचा हैदोस दिवसेंदिवस तीव्र होत चालला असून मानवी...

मुंबईत 36 दिवसांत 80 हून अधिक मुलं-मुली बेपत्ता:सरकार आकडे लपवत आहे- सचिन अहिर यांचा आरोप

नागपूर -मुंबईमधून गेल्या 36 दिवसांमध्ये 80 हून अधिक मुलं-मुली...

एकनाथ शिंदे दोन महिन्यांत पुन्हा मुख्यमंत्री होणार:प्रकाश आंबेडकर यांनी वर्तवली शक्यता

मुंबई-राज्यातील महायुतीमध्ये झालेल्या अंतर्गत कलहाच्या आणि नाराजीच्या नाट्यानंतर वंचित...

यंदाचा रविकिरण फिरता सुवर्णचषक कल्याण – वरपच्या ‘सेक्रेड हार्ट स्कुल’ शाळेकडे!

'दिव्या खाली दौलत'ला द्वितीय तर 'रंग जाणिवांचे' तृतीय क्रमांकाने...