साताराहून मुंबईला जाणारी बस दरीत कोसळली; 5 ठार, 25 जखमी

Date:

पुणे – पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात एक खासगी बस 60 फुट दरीत कोसळळी. भल्या पहाटे झालेल्या या बस अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्येएका चिमुकल्याचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या अपघातात इतर 25 प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

खोपोली पोलिस आणि महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासगी बस कराड येथून मुंबईकडे निघाली होती. पहाटे साडेपाचच्या सुमारास जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खंडाळा घाटात अंडा पाँइंटच्या वळणावर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि बस सुमारे साठ फूट खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 49 प्रवासी होते. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे, बचावासाठी स्थानिकांनी मदत केली. त्यांच्याच साह्याने जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आगीमुळे ४०० केव्ही टॉवर लाइनला ट्रिपिंग; चाकण,पिंपरी, भोसरी, मंचर ग्रामीणमध्ये तासभर वीज खंडित

पुणे, दि. १५ मार्च २०२५: तळेगाव येथील पीजीसीआयएल ४०० केव्ही...

धायरीच्या मध्यवस्तीतील दुर्घटनाग्रस्त कचरा विलिनीकरण प्रकल्प न हलविल्यास जन आंदोलन

आम आदमी पक्षाचा इशारा पुणे:सिंहगड रस्त्यावरील धायरी येथील मध्यवस्तीतील बेनकर...

औरंगजेबाला 27 वर्षे राहूनही इथे राज्य करता आले नाही त्याचे प्रतीक म्हणजे ही कबर -रोहित पवार

मुंबई- औरंगजेब महाराष्ट्रात 27 वर्षे राहिला. त्यानंतरही त्याला येथे...