” मी आणि माझे जीवन ” या वृत्तीमुळे समाज बदलत नाही .
क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या नामफलकाचे अनावरण जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते फीत कापून करण्यात आले . सदाशिव पेठमधील एस. पी. महाविद्यालयाच्या मागीललोकमान्यनगरमधील जॉगर्स पार्कमध्ये हा कार्यक्रम झाला . यावेळी पुण्यनगरीचे महापौर दत्तात्रय धनकवडे , पर्यावरण तज्ञ विश्वंबर चौधरी , अड. मिलिंद पवार , क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोहनी ज्ञानेश डांगे , वासन केअरचे विभागप्रमुख अजय पवार , बाळासाहेब मालुसरे , सुप्रिया कणसे , उद्योजक संजय धनकवडे , सुवर्णस्पर्श ज्वेलर्सचे निलेश वावरे , शंकर मारणे , मराठे ज्वेलर्सच्या नीना मराठे आदी मान्यवर व महिला भगिनी उपस्थित होत्या .
यावेळी जाणीव सामाजिक संघटनेस सन्मान चिन्ह देऊन जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याहस्ते अखिल भारतीय जाणीव संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. मधुकर बिबवे यांचा विशेष सन्मान करण्यात आला . तसेच समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या २५ महिलांचा सन्मान मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले . कार्यक्रमाच्या शेवटी महिलांसाठी विविध खेळांच्या स्पर्धा पार पडल्या , तसेच लकी ड्राद्वारे बक्षिसांचे वाटप करण्यात आले , महिलांना एक ग्रॅमच्या सोन्याच्या बांगड्या तसेच , भेटवस्तू देण्यात आल्या .
यावेळी क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोहनी ज्ञानेश डांगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात सांगितले कि , गेली सहा वर्षापासून डायमंड महिला बचत गटाच्या माध्यमातून विविध सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आले . बचत गटाच्या माध्यमातून महिलासाठी विशेष सामाजिक उपक्रम घेऊन महिलांची ताकद उभी केली . यामध्ये मोफत नेत्र तपासणी , उन्हाळी शिबीर गरजू रुग्णांना मदत , विविध सरकारी योजनाचे महिलांना मार्गदर्शन , सास्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन , दुष्काळ ग्रस्ताना मदत , आदर्श बचत गट पुरस्कार , कागदी पिशव्या प्रशिक्षण , दिवाळी पणती प्रशिक्षण , वृक्षारोपण , खाद्यमहोत्सव आदी कार्यक्रम राबविण्यात आले
यावेळी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले कि , मानवसेवा , जनसेवा हिच ईश्वर सेवा आहे , मानवतेची पूजा हे महत्वाचे आहे . जनता हि सर्वेक्षर आहे . आज स्वामी विवेकानंद जयंती आहे , माझ्या आयुष्यात स्वामी विवेकानदांची प्रेरणा आहे . प्रत्येक माणसाला मनुष्य सेवा करण्यासाठी मनुष्यजन्म मिळाला आहे ,. आपल्या आयुष्यातला प्रत्येक क्षण हा सेवेसाठी मिळाला आहे . या क्षणामधूनच आनंद प्राप्त केला पाहिजे . जीवनात सेवा नसेल तर जीवनाला काहीच अर्थ नाही . त्यामुळे क्रांतीज्योती महिला विकास संस्थेचे कार्य कौतुकास्पद आहे . जीवनात आयुष्य नैराश्य येऊ देऊ नका , शुद्ध आचार , विचार , निष्कलंक जीवन , त्याग , अपमान पचवायची ताकद असली पाहिजे , ” मी आणि माझे जीवन ” या वृत्तीमुळे समाज बदलत नाही . त्यामुळे समाज बदल्यासाठी आपण सर्वांनी पुढे आले पाहिजे .
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत क्रांतीज्योती महिला विकास संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा सोहनी ज्ञानेश डांगे यांनी केले तर सूत्रसंचालन अश्विनी जोग यांनी केले तर आभार सीमा महाजन यांनी मानले .