संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यनगरीत …

Date:

(पहा वारीतले फोटो )
पुणे- विठ्ठल विठ्ठल … माऊली माऊली… ग्यानबा -तुकाराम ‘ चा जयघोष … टाळ मृदुंग व हरी नामाच्या गजरात लाखो वारकरी व पुणेकरांच्या जनसागरात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज या दोहोंच्या पालखीचे पुण्यनगरीत आगमन झाले. मोठ्या उत्साही वातावरणात पालखीचे स्वागत करण्यात आले. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांनी आज सायंकाळी पुण्यात प्रवेश केला. पुणेकरांनी दोन्ही पालख्यांचे भव्य पद्धतीने स्वागत केले.
हजारो भाविक , अनेक राजकीय पुढारी कार्यकर्ते ,पत्रकार यांनी या पालख्यांचे वारीत सहभागी होत दर्शन घेत भक्ती भावाने स्वागत केले मात्र राज्याचे राज्यपाल के. विद्यासागर राव हे पालखी दर्शनासाठी पुण्यात आले असता सुरक्षेच्या कारणास्तव त्यांना दर्शन न घेताच मुंबईत परतावे लागले. पुणे पोलिसांनी नकारात्मक अहवाल दिल्यानंतर राज्यपाल राव यांनी दर्शन न घेता परत जाण्याचा निर्णय घेतला. दिंडी मालक संघटना आज पुण्यात आंदोलन करणार आहे. यामागे पंढरपूर शहरातील स्वच्छतेबाबत हायकोर्टाने बजावलेल्या आदेशाने दिंडी मालक संघटना व सरकार यांच्यात छुपा संघर्ष सुरु आहेअसे सांगितले जाते .
देहूहून पंढरपुरला निघालेली तुकाराम महाजारांची पालखी आपला आकुर्डी येथील दुसरा मुक्काम हलवून पुण्यामध्ये दाखल झाली.  तुकाराम महाराजांच्या पालखीपाठोपाठ आळंदीहून निघालेली संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी  पुण्यनगरीत दाखल जाली.
संत तुकाराम महाराजांची पालखी पिंपरी-चिंचवडकरांचा पाहुणचार घेऊन दापोडी-खडकीत पोहचली. त्यानंतर सायंकाळी ती पुण्यात दाखल झाली. तिकडे आळंदीहून भोसरी, दिघी विश्रांतवाडी मार्गाने संत ज्ञानेश्वरांची पालखी पुण्यात दाखल झाली. पुणे महानगरपालिकेच्या वतीने या दोन्ही पालख्याचे भव्य स्वागत करण्यात आले. दोन्ही पालख्यांचा आज व उद्या असा दोन दिवस पुण्यात मुक्काम राहील. या काळात पुणेकर वारक-यांना मोठया प्रमाणात अन्नदान करणार आहेत.

संत ज्ञानेश्‍वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात व संत तुकाराम महाराज महाराजांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिरात मुक्कामास असून, रविवारी(12 जुलै) पुढील मार्गाकडे प्रस्थान ठेवणार आहे. चांदीच्या रथात विराजमान झालेल्या संत ज्ञानेश्‍वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात करण्यात आले.
वाकडेवाडी जवळील पाटील इस्टेट येथे महानगरपालिकेच्या वतीने पालख्यांचे स्वागत करण्यात आले.ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी रथापुढे 27 व मागे 201 दिंड्या असून, तुकाराम महाराजांच्या पालखी रथापुढे 25 व मागे 304 दिंड्या आहेत.विविध राजकीय पक्ष,सामाजिक संस्था,संघटनां,सार्वजनिक गणेश मंडळांतर्फे तसेच सर्वधर्मिय नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांना पिण्याच्या पाणी आणि खाद्यपदार्थांच्या पाकिटांचे वापट करण्यात येत होते.पालखी दर्शनाकरीता रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या.माऊली व तुकोबांच्या पालखी समोरून डौलाने चालणाऱ्या अश्‍वांचेही दर्शन नागरिक मोठ्या भक्तीभावाने घेत होते.
दरम्यान संगमवाडी येथे पालखी  थांबविण्यात आली होती , ज्याप्रमाणे आळंदीतून उशिरा पालखी निघाली  – आणि वेळोवेळी आंदोलनाचा इशारा देत गेली वारकरी संघटनेने आपली भूमिका मांडली या भुमिकेबद्दलचा वाद मिटल्याने संगमवाडी येथे थांबविण्यात आलेली ज्ञानेश्वर माउलींची पालखी पुण्याकडे मार्गस्थ झाली . सरकारने वारक-यांच्या मागण्या उच्च न्यायलयासमोर योग्यरित्या मांडाव्यात. तसेच तसे निवेदन जिल्हाधिका-यांनी वारकरी-फडकरी दिंडी मालक संघटनेला आणून द्यावे. त्यानंतरच पालखीचे पुढे मार्गस्थ होईल, अशी भूमिका संघटनेने घेतली होती.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूर येथे होणा-या वारीदरम्यान मोठ्या प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरते. तसेच तेथे शौचालयांची व्यवस्था नसल्याने वारीनंतर हाताने मैला साफ करण्याची कुप्रथा कायम असल्याची बाब एका स्वयंसेवी संस्थेने याचिकेच्या माध्यमातून उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती. न्यायमूर्ती अभय ओक यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने त्याची गंभीर दखल घेत ही कुप्रथा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात सुरू असल्याबाबत राज्य सरकारला धारेवर धरले होते.
वारक-यांसाठी आवश्यक स्वच्छतागृहे तात्पुरत्या स्वरूपात उभारण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्याचबरोबर पंढरपूरच्या वाळवंटात तंबू उभारण्यासही बंदी घालण्यात आली होती. राज्य सरकारने या संदर्भात आवश्यक उपाययोजना न केल्यामुळे वारक-यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असल्यामुळे वारकरी-फडकरी दिंडी समाजामध्ये नाराजीची भावना आहे.

 

a1
पालखी पुण्यात दाखल होताच पत्रकार अर्चना माने हिने मोबाईल वर काढलेले हे छायाचित्र

a2 a3

vari 1
पुणे महापालिकेतील वरिष्ठ अधिकारी विलास कानडे आणि अन्य मनपा अधिकारीवर्ग वारीत सहभागी झाला
vari 5
माजी मंत्री माजी आमदार चंद्रकांत छाजेड आणि त्यांचे कार्यकर्ते भुतडा आदींनी वारकऱ्यांचे स्वागत केले

vari 6

vari 7
पुणे शहर काँग्रेस चे अध्यक्ष अभय छाजेड यांनी वारकऱ्यांचे स्वागत केले

vari 11

vari2
पुण्याचे महापौर -उपमहापौर आयुक्त -सह आयुक्त आदी सर्वांनी वारकऱ्यांचे शहरात स्वागत केले

vari3 vari4 vari9

11700814_10204552631476883_1041020960477136315_n
पुण्यातील पत्रकार शैलेश काळे यांनी आळंदी ते पुणे अशी वारी सहभाग नोंदविला
vari 1
चित्रपट सृष्टीत काम करणारी भावंडे – अमोल कांगणे आणि प्रीतम कांगणे आणि त्यांचे सहकारी मित्र यांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घालून वारीचे स्वागत केले
vari 5
अभिनेत्री प्रीतम कांगणे वारीत … रांगोळ्या काढताना

vari 6vari2vari3

vari4
चित्रपट सृष्टीत विविधांगी कामे करणारा अमोल कांगणे
11223916_485038971650670_7024184685272535535_n
वारकऱ्यांच्या स्वागतासाठी आणि मदतीसाठी नगरसेविका रेखा टिंगरे
11698703_10206257849478265_6617318307359353315_n
भाजपचे सरचिटणीस संदीप खर्डेकर आणि नगरसेवक दिलीप उंबरकर यांचा वारीत सहभाग
11666160_914915691915080_6631768562768736934_n
वैभव कडलग ,विलास कानडे आदी अधिकारी , कर्मचारी काही काळ प्रत्यक्ष वारीत सहभागी झाले

vari711201821_10206257846478190_777889607891113519_n11701232_10206257846798198_4277966309510865984_nvari 1011694980_914912148582101_5881670519173408376_n

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

जर्मनीतील शिक्षणा करीता मार्गदर्शन

पुणे, १३ मार्च २५ - सिंबायोसिस स्कील्स ॲन्ड प्रोफेशनल...

एलईडी चित्ररथाच्या माध्यमातून समाज कल्याण विभागाच्या योजनांचा जागर

पुणे दि. १३: समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती...

बंदिशींद्वारे भारतीय स्त्री शक्तीचा सन्मान

भक्तिसुधा फाऊंडेशनच्या वतीने उर्जा' : सन्मान भारतीय स्त्री आदर्शांचा...