Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शेतकऱ्यांचा पाठीराखा काळाच्या पडद्याआड – गिरीश बापट;शेतीचे वास्तव्य जाणणारा लढवय्या तज्ज्ञ हरपला-खा.वंदना चव्हाण;शेतक-यांचा आधारवड गेला – आ. दिलीप वळसे-पाटील;शेतीचा योद्धा तज्ज्ञ हरपला – रासप

Date:

शेतकऱ्यांचा पाठीराखा काळाच्या पडद्याआड – गिरीश बापट

शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष,  माजी खासदार शरद जोशी यांच्या निधनाने शेतक-यांचा पाठीराखा हरपला आहे , अशा शब्दांत अन्न, नागरी पुरवठा , अन्न व औषध प्रशासन, संसदीय कार्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

शेतक-यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी शरद जोशी हे आयुष्यभर संघर्ष करत राहिले. शेतकरी, शेतमजूरांबरोबरच त्यांनी सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठीही लढा दिला. जोशी हे जागतिक शेती
फोरमचेही सक्रीय होते. शेतक-यांनी आधुनिकतेची कास धरावी, यासाठी ते आग्रही होते. शासनाने शेतमालाला योग्य दर मिळावा यासाठी प्रयत्न करावेत, यासाठीही जोशी आग्रही होते.

खासदार म्हणूनही जोशी यांनी राज्यसभेत शेतक-यांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली होती. असा हा शेतक-यांचा पाठीराखा काळाच्या पडद्याआड गेला आहे. त्यांच्या निधनाने शेतकरी, कष्टकरी, शेतमजूरांचा लढवय्या गेला, अशा शब्दांत बापट यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

शेतीचे वास्तव्य जाणणारा लढवय्या तज्ज्ञ हरपला-खा.वंदना चव्हाण
 शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या निधनाबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार अ‍ॅड.वंदना चव्हाण यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. ‘अर्थशास्त्रावर पकड असणारा भावनिक आवाहन न करता भारतीय शेतीच्या दारीद्य्राचे नवे आणि वास्तव स्पष्टिकरण देणारा तज्ज्ञ आणि लढवय्या तसेच जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये शेतकर्‍यांना मानाचे स्थान मिळवून देणारा आपल्यातून निघून गेला आहे.’ असे मत खा.वंदना चव्हाण यांनी व्यक्त केले.
 
‘भरपूर पीक आलं की शेतकरी सोडून सगळे सुखी होतात, दुष्काळ पडला की फक्त शेतकर्‍यांना खडी फोडायला का जावे लागते? हा त्यांचा सवाल आजही सर्वांना बोचतो. शेतकर्‍यांना लढ्यातून आत्मविश्‍वास देण्याचे कार्य त्यांनी केले. शेतीला नव्या पिढीत प्रतिष्ठा, पत मिळवून देणे ही त्यांना कृतीशील श्रद्धांजली ठरेल’, असेही खा.वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.

शेतक-यांचा आधारवड गेला – आमदार दिलीप वळसे-पाटील

उच्च पदावरील सनदी अधिका-याची नोकरी सोडून शेतक-यांच्या प्रश्नांसाठी आयुष्य पणाला लावणारे शेतकरी संघटनेचे अध्यक्ष,  माजी खासदार शरद जोशी यांच्या निधनाने शेतक-यांचा आधारवड गेला, अशा शब्दांत माजी विधानसभा अध्यक्ष,  आमदार दिलीप वळसे-पाटील यांनी शोक व्यक्त केला आहे.
वक्तीस्वातंत्र्य आणि समाजाच्या कारभारात सरकारी हस्तक्षेप कमी असावा, यासाठी जोशी आग्रही होते. शेतमालाला रास्त भाव मिळाला पाहिजे, या मागणीसाठी जोशी यांचा आयुष्यभर लढा सुरू होता . महिलांच्या विविध प्रश्नांवरही त्यांनी यशस्वी आंदोलने केली. राज्य सभेचे खासदार, केंद्रीय कृषी स्थायी समितीचे अध्यक्ष , जागतिक कृषी फोरम अशा विविध व्यासपीठांवरून जोशी यांनी आपला लढा सुरूच ठेवला होता. त्यांच्या निधनाने शेतक-यांबरोबरच महाराष्ट्राचेही मोठे नुकसान झाले आहे, अशा शब्दांत वळसे-पाटील यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत.

शेतीचा योद्धा तज्ज्ञ हरपला – रासपची शरद जोशी यांना श्रद्धांजली
‘संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीनंतर तितकीच मोठी चळवळ ग्रामीण भागात शेतकर्‍यांच्या हितासाठी उभारणारा शेतीचा योद्धा तज्ज्ञ हरपला’, अशा शब्दात राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रदेश प्रवक्ते दीपक बिडकर यांनी शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
‘भारतीय शेतीच्या दु:खाची संपूर्ण नव्याने अभ्यास मांडणी आणि लढाई उभारून ऐतिहासिक योगदान शरद जोशी यांनी दिले. आजही नव्या स्वरूपात या लढाईची गरज असताना शरद जोशी यांचे निधन चटका लावून जाणारे आहे’ असे या पत्रकात दीपक बिडकर यांनी म्हटले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...