शिवसेना पाठीत खंजीर खुपसत नाही, दिलेला शब्द नेहमी पाळला -संजय राऊत

Date:

मुंबई -शिवसेना कधीच पाठीत खंजीर खुपसत नाही. शिवसेनेने नेहमीच दिलेला शब्द पाळला, हीच आमची भूमिका आहे. 2014 आ णि 2019 मध्ये खूप फरक आहे. त्यावेळी भाजपने अल्प मताचे सरकार आणण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आता ते करणे त्यांना शक्यच नाही. बहुमत असेल तर सरकार स्थापित होईल अन्यथा जनतेला सामोरे जाऊ शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम असून राज्याचे नेतृत्व शिवसेनेचा मुख्यमंत्रीच करणार असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केले.

मातोश्रीवर शिवसेना आमदारांची बैठक झाली. यामध्ये शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे जी भूमिका घेतील ती सर्वांना मान्य राहील असे सर्वांनी सांगितले आहे. 24 ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. तेव्हापासूनच शिवसेनेने आपली भूमिका मांडली. उद्धव ठाकरे स्वतःहून युती तोडण्याचे पाप करणार नाहीत. मुख्यमंत्री पद आणि सरकारच्या सम-समान वाटपावरून शिवसेना माघार घेणार नाही असे संजय राऊत यांनी सांगितले आहे.

शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा होईल हे सभागृहात दाखवू

शिवसेना कधी आशेवर जगत नाही आत्मविश्वासावर जगते. लोकांचा पाठिंब्यावर शिवसेनेने प्रवास केला. भाजपने जाहीर करावे की ते सत्ता स्थापित करू शकत नाही. त्यानंतर शिवसेना पुढील पावले उचलणार आहे. सोबतच, शिवसेनेचा मुख्यमंत्री कसा आणि कधी होणार, कोण पाठिंबा देणार हे सभागृहातच दाखवू असे संजय राउत म्हणाले आहेत.

यामुळे हॉटेलात थांबले शिवसेना आमदार

शिवसेना आमदार महाराष्ट्रातील विविध भागातून येतात. मुंबईतील मनोरा आमदार निवास तोडण्यात आले आहे. त्यांना राहण्यासाठी नवीन आमदार निवास नाही. त्यामुळेच, शिवसेनेचे नवीन आमदार मुंबईतील एका हॉटेलात थांबले आहेत असे संजय राउत म्हणाले. आमदारांची खरेदी किंवा विक्री होत असल्याच्या भीतीने त्यांना हॉटेलात ठेवण्यात आलेले नाही. आम्हाला कुणाचीही भीती नाही. सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असताना कधीही आमदारांची गरज पडू शकते. त्यांनी एकत्रित राहावे त्यामुळेच एका ठिकाणी हॉटेलात थांबवण्यात आले आहे असेही ते पुढे म्हणाले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा जाधव कुटुंबीयांच्या डोक्यावर मायेचा हात…

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी घेतली स्वर्गीय विदीप जाधव...

बेकायदेशीर रसायनांचा वापर केल्यामुळे  ‘कॉम्फर्ट’ अगरबत्तीवर बंदी

Mumbai February 02, 2026: भारतामध्ये घरगुती कीटकनाशकांच्या सुरक्षित वापरास प्रोत्साहन देणाऱ्या ना-नफा तत्वावरील उद्योग मंडळ होम इन्सेक्ट कंट्रोल असोसिएशन (HICA) तर्फे बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्ती ‘कॉम्फर्ट’ विरोधात महाराष्ट्र सरकारने केलेल्या कारवाईचे स्वागत करण्यात आले आहे. ‘कॉम्फर्ट’ ही डास प्रतिबंधक अगरबत्ती महाराष्ट्र, तमिळनाडू, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथे विक्रीस उपलब्ध असून ती मेसर्स धूप छांव कंपनी यांचे उत्पादन आहे. खुल्या बाजारातून गोळा करण्यात आलेल्या नमुन्यांवरून हे उत्पादन अनभिज्ञ ग्राहकांकडून खरेदी केले जात असल्याचे स्पष्ट झाले असून, महाराष्ट्र कृषी विभागाने केलेल्या प्रयोगशाळा चाचण्यांमध्ये ‘कॉम्फर्ट’ मध्ये बेकायदेशीर आणि मान्यता नसलेले रसायन डाइमफ्लुथ्रिन आढळून आले आहे. ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्या मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक तसेच उर्वरित संपूर्ण महाराष्ट्रात विक्रीस असल्याचे सांगितले जाते. मुंबईमध्ये टाकण्यात आलेल्या छाप्यादरम्यान अधिकाऱ्यांना डाइमफ्लुथ्रिन असलेल्या ‘कॉम्फर्ट’ अगरबत्त्यांचे अनेक बॉक्स आढळून आले. धूप छांव कंपनी कडे परवाना तसेच CIBRC मान्यता या दोन्ही गोष्टी नसल्यामुळे, कीटकनाशके अधिनियम, 1968 आणि कीटकनाशके नियम, 1971 अंतर्गत या उत्पादनाचे उत्पादन व विक्री बेकायदेशीर ठरते. हर्बल असल्याचा खोटा दावा करत अनेक बेकायदेशीर अगरबत्त्या विक्रीस आणल्या जात असून, त्यामध्ये बेकायदेशीर आणि शासनमान्य नसलेली रसायने वापरली जात आहेत. ‘कॉम्फर्ट’, ‘स्लीपवेल’ आणि ‘रिलॅक्स’ या नावांनी विक्री होणारी उत्पादने यामध्ये ओळखली गेली आहेत. यामुळे भारतभर मान्यता नसलेली कीटकनाशके असलेल्या बेकायदेशीर डास प्रतिबंधक अगरबत्त्यांविरोधात अंमलबजावणी कारवाईत वाढ झाली असून, नियामक सतर्कता आणि सार्वजनिक आरोग्याबाबतची चिंता अधिक तीव्र होत असल्याचे दिसून येते. कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालय यांच्या अंतर्गत कार्यरत असलेली केंद्रीय कीटकनाशक मंडळ व नोंदणी समिती (CIBRC) ही वैधानिक संस्था असून, भारतात डास प्रतिबंधकांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रसायनांना उत्पादन, आयात किंवा विक्रीपूर्वी मंजुरी व नोंदणी देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. शासनमान्य CIBRC-मान्यताप्राप्त डास प्रतिबंधक उत्पादनांवर नोंदणी क्रमांक (CIR –...

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात,चित्रपट व सांस्कृतिक विभागाची आग्रही मागणी

पुणे-उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार याच पक्षाध्यक्ष हव्यात अशी आग्रही मागणी...

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी लाडक्या बहिणींना दिली नेतृत्वाची संधी

महिलांसाठी महापौरपद आरक्षित नसताना ‘लाडक्या बहिणीं’कडे जबाबदारी; हा शिवसेनेचा...