सिंधुदुर्ग : प्रतिनिधी
रेल्वेच्या विकासात देशाचे रूप बदलण्याची क्षमता रेल्वेमध्ये आहे. रेल्वेभरतीमध्ये मोठय़ा प्रमाणात भ्रष्टाचार होत असून होणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी आता रेल्वेभरती ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे. तसेच सर्वसामान्य माणसाला अपेक्षित असा रेल्वेचा विकास करणार आहे, असे केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी नागरी सत्कार सोहळ्यात बोलताना सांगितले. देवगड येथे सुरेश प्रभू यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी नागरी सत्कार समिती अध्यक्ष विद्याधर माळगावकर, माजी आमदार प्रमोद जठार, राजन तेली आदी मान्यवर उपस्थित होते.
मंत्री प्रभू म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांना भेडसावणार्या गोष्टींसाठी आम्ही प्रय▪करीत आहोत तसेच नागरिकांसाठी ई-पोस्टल, नॅशनल हेल्पलाईनच्या माध्यमातून प्रत्येक प्रवाशाला आपली तक्रार नोंदवता येऊन त्याचे उत्तरदेखील देण्याचा आमचा या माध्यमातून प्रय▪असणार आहे. रेल्वे घडवू शकलो तर भारत घडवू शकू, असा विश्वास प्रभू यांनी व्यक्त केला. रेल्वेकडून काढण्यात येणार्या कोठल्याही कामाचे टेंडर रेल्वे मंत्र्याकडे सहीसाठी जाणार नसून त्याचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होऊन त्यापासून त्याच्या खिशातून जाणारा पैसा हा त्याच्याकडेच राहील. तसेच एखाद्या मंत्र्याची अपॉइंटमेंट घेण्यासाठी घेतले जाणारे पैसे यामध्ये पूर्णत: पारदर्शक करून मंत्री झालेल्या दीड महिन्यांच्या कालवधीत कोणत्याही गोष्टीचा भ्रष्टाचार केला जाणार नाही, यासाठी अनेक निर्णय घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले.
देवगडचा जगप्रसिध्द हापूस आंबा हा फक्त देवगड तालुक्यातच मिळत असल्याचे सांगितले. फळभाज्यांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक लागत असला तरी ३४ ते ४0 टक्के फळे फुकट जातात. ही फ ळे ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वाहतूक यंत्रणा सक्षम क रणे आवश्यक आहे, असे मंत्री प्रभूंनी सांगितले. महिलांना खर्या अर्थाने समाज सेवेत वाटा द्यायचा असेल तर तो आर्थिकदृष्ट्या वाटा दिला पाहिजे. महिलांना घरात राहून कसे उत्पन्न वाढले पाहिजे. यासाठी प्रत्येक गावात स्वयंसहाय्यता गट स्थापन करण्याची गरज आहे. कोकण रेल्वेमध्ये महिलांना बचत गट निर्माण करून दिल्यास बचतगटांनी बनविलेल्या पदार्थांना चांगल्या प्रकारची बाजारपेठ निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आतापर्यंत आपण पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक केली नाही. त्यामुळे आपल्या प्रगतीचा आलेख खाली आला आहे.