राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही: मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती

Date:

मुंबई-इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धामुळे राज्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरकसपणे फेटाळून लावला आहे. राज्यात कुठेही इंधनाचा तुटवडा नाही. माध्यमांनी काही शहरांत पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्याचे वृत्त दिले. त्यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठ्या रांगा लागल्या. प्रत्यक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात सरकार भविष्यातील स्थितीचा सामना करण्यास सक्षम आहे, असे ते म्हणालेत.

आखातातील इराण विरुद्ध इस्त्रायल – अमेरिका युद्धाचा फटका अवघ्या जगाला बसत आहे. त्याच्या झळा आता महाराष्ट्रातही पोहोचल्या आहेत. सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 60 रुपयांची वाढ केली. तसेच त्याच्या वितरणावरही काही ठराविक दिवसांची कॅप लावली. विशेषतः तेल कंपन्यांनी पुण्यातील वितरकांना पैसे दिल्याशिवाय इंधन देण्यास नकार दिल्यामुळे राज्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याचा दावा केला जात आहे. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकारांशी संवाद साधताना हा दावा जोरकसपणे फेटाळून लावला आहे.

मुख्यमंत्री म्हणाले, लोकांना चुकीची माहिती देऊन पॅनिक तयार करण्याची गरज नाही. केंद्र सरकारने यासंदर्भातील आपली भूमिका अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेसंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कशाप्रकारे पाऊले उचलली हे आपल्यासमोर आले आहे. सध्या राज्यात कुठेही इंधन टंचाई नाही. काही माध्यमांनी दोन-तीन दिवस झाले पेट्रोल – डिझेलचा तुटवडा निर्माण होणार असल्याच्या बातम्या दिल्या. यामुळे पेट्रोल पंपांवर विनाकारण मोठमोठ्या रांगा लागल्या. असा कोणताही तुटवडा नाही. केंद्र सरकारनेही हे स्पष्ट केले आहे. भविष्यात जी परिस्थिती उद्भवेल, त्याचा सामना करण्यासाठी भारत सरकार मोदींच्या नेतृत्वा सक्षमपणे भक्कम परिस्थितीत आहे.

उल्लेखनीय बाब म्हणजे इराण युद्धामुळे सध्या भारतात एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. सरकारने व्यावसायिक गॅसच्या दरात अचानक 150 ते 200 रुपयांची वाढ केली आहे. यामुळे हॉटेल व्यवसाय कसा चालवायचा? हा प्रश्न व्यावसायिकांपुढे उभा राहिला आहे. दुसरीकडे, घरगुती गॅसच्या दरातही एकरकमी 60 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्यांचेही बजेट कोलमडले आहे. त्यातच काही शहरांत गॅसचा पुरवठा कोलमडल्यामुळे स्थिती बिघडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी पुण्यातील महिलांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. देशात गॅसचे दर वाढत आहेत. तेलाचे दर वाढत आहेत. किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंचेही दर वाढले आहेत. पण आमचे पगार काही वाढत नाहीत. गॅस एजन्सीकडे गेल्यानंतर अनेक वेळा वेळेवर गॅस मिळत नाही, अशी ओरड या महिलांनी केली आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यसभा निवडणुक- 26 नेते बिनविरोध; शरद पवार, रामदास आठवले, विनोद तावडे, अभिषेक मनु सिंघवी यांचा समावेश

दहा राज्यांमधील 37 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीत सात राज्यांमधील...

विशाखा सुभेदारांचा मुलगा मुंबईत परतला:कुवेतमध्ये अडकलेल्या 30 मराठी नागरिकांची सुटका

मुंबई-अमेरिका, इस्राएल आणि इराण यांच्यात वाढलेल्या संघर्षामुळे आखाती देशांमध्ये...

कांदा चालला माॅरिशसला…

महाराष्ट्रातील 1 लाख टन कांद्याची माॅरिशसलाही निर्यात-मुंबई- राज्यातील...