Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

मंत्री बापट आणि शिवतारेंवर आरोप करून शेतकऱ्याची आत्महत्या

Date:

पुणे –  जलसंपदा विभागाकडून शेतीसाठी वेळेवर पाणी मिळत नसल्याच्या कारणावरून इंदापूर अर्बन बँकेचे विद्यामन संचालक व शेतकरी वसंत सोपाना पवार (वय ४८, रा. बेलवाडी) यांनी  विहिरीमध्ये उडी मारुन आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्यापूर्वी पवार यांनी दोन चिठ्या लिहून ठेवल्या असून आत्महत्येस  जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे व पालकमंत्री गिरीष बापट हे जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखलकरावेत असे या चिठ्ठीत लिहून ठेवले आहे

वालचंदनगर पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनूसार वसंत पवार यांचे लासुर्णेमध्ये हार्डवेअर व शेतीसाठी लागणाऱ्या  रासायनिक खतांचे दुकान आहे. लासुर्णे व बेलवाडी परिसरामध्ये त्यांची शेती आहे. शनिवारी (दि. २१) रोजी लासुर्णे येथील दुकानबंद केल्यानंतर घरी गेलेच नव्हते. घरातील नागरिकांनी रात्रभर शोध घेतला. मात्र, त्यांचा शोध लागला नव्हता. रविवारी (दि. २२)रोजी सकाळी त्यांचा मृतदेह बेलवाडी गावच्या हद्दीतील जामदारवस्ती जवळील विहिरीमध्ये पाण्यावरती तरंगत असल्याचा आढळून आला. वालचंदनगर पोलिसांनी तातडीने मृतदेह पाण्यातुन बाहेर काढल्यानंतर त्यांच्या खिशामध्ये दोन चिठ्ठया आढळल्या आहेत. यामध्ये गेल्या दोन वर्षांपासून उन्हाळ्यामध्ये शेतीसाठी कालव्याचे पाणी मिळाले नसल्यामुळे पिके जळाल्यामुळे आर्थिक अडचणीमध्ये वाढ झाल्याने कर्जबाजारी पणामुळे आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहय्यक फौजदार शिवाजी होले,महेंद्र फणसे करीत आहेत. 

नीरा डाव्या कालव्यातून गेल्या वर्षी व य वर्षी उन्हाळी हंगामचे पाणी वेळेत न मिळाल्यामुळे आत्महत्येस जबाबदार असणारे जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री विजय शिवतारे व पुणे जिल्हाचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली आहे.माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील, पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. हेमंतराव नरुटे, कर्मयोगीचे संचालक वसंत मोहोळकर,मार्केट कमिटीचे माजी संचालक अनिल पवार,  दुधगंगाचे माजी अध्यक्ष शहाजी शिंदे, उपसरपंच प्रकाश चव्हाण यांनी शेतीसाठी पाणी प्रश्नावरून सरकारच्या विरोधात आवाज उठवून कुंटूबाला न्याय मिळवून देण्याची प्रयत्न करावा असे वसंत पवार यांनी मृत्यूपूर्वी चिठ्ठीमध्ये लिहून ठेवले आहे.जलसंपदा विभागाच्या भोंगळ कारभरामुळे निरा डाव्या कालव्यातुन उन्हाळी पाण्याचे आवर्तन मिळण्यास विलंब होत असल्यामुळे वसंत पवार व परिसरातील शेतक-यांनी १३ एप्रिल रोजी लासुर्णे जवळील चिखली फाटा येथे ४२ व ४३ क्रमांकाच्या वितरिकेस पाणी सोडण्यासाठी रास्तारोको आंदोलनाचा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी ४२ व ४३ क्रमांकांच्या वितरिकेस १७ व १९ एप्रिल रोजी पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते.परंतु अद्याप या दोन्हीही वितरिकेस पाणी सोडण्यात आलेले नाही. यामुळे या परीसरातील सात हजार एकरातील पिके जळण्याच्या  मार्गावर आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुंबई विमानतळावर तुफान राडा..प्रवाशांचा सयंम सुटला

घराची चावी, पासपोर्ट बॅगेत… आता आम्ही काय करायचे?:बॅगा गहाळ...

चैत्यभूमीकडे जाणाऱ्या अनुयायांना अडवल्याने तणाव:चुनाभट्टी-सायन मार्गावर मोठा गोंधळ, अखेर पोलिसांनी नमते घेत रिक्षा सोडल्या

मुंबई- महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी...

बावधनमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना  69 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन

 पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले), विकास प्रतिष्ठान...

संवैधानिक मुल्ये पायदळी तुडवणाऱ्या शक्तींविरोधात संघर्ष करण्याची वेळ: हर्षवर्धन सपकाळ.

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी गुलामगिरीचे बंधन तोडून सामाजिक न्याय,...