नवी दिल्ली- शिवाजी महाराज यांचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडणाऱ्या बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे हा देशाचा अपमान आहे, असे म्हणून काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी नवीन वादाला तोंड फोडले आहे.
त्यांनी हे विचार ट्विटरहून मांडले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघानेही इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडला आहे असेही ते म्हणाले. काही दिवसांपूर्वी बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्याच्या विरोधात सांगली येथे जितेंद्र आव्हाड यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता. या हल्ल्याचाही दिग्विजय सिंह यांनी निषेध केला आहे.
बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देणे हा देशाचा अपमान -दिग्विजय सिंह
Date:

