पुणे – पुण्याचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी भामा आसखेडचे पाणी आणू‘‘ अशी ग्वाही देत ज्यांनी सत्ताधाऱ्या वर सतत भ्रष्टाचाराचे आरोप करून बदनामीचे षड्यंत्र रचले त्या भाजपा सारख्या विरोधी पक्षाकडे जाहिरातबाजी साठी एवढा पैसा आला कुठून ? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी येथे केला राष्ट्रवादीचे उमेदवार बाबूराव चांदेरे यांच्यासाठी कोथरूड येथील सभेत ते बोलत होते.
खासदार वंदना चव्हाण, अंकुश काकडे, बाबूराव चांदेरे, विजय डाकले, गणेश माथवड, गोविंद थरकुडे व्यासपीठावर उपस्थित होते.
पवार म्हणाले, “जुने पुणे, नवे पुणे या सर्वांचा विचार केला पाहिजे. कोणालाही कचऱ्याचा त्रास होणार नाही, अशी जागा निवडली आहे. पुणे देशातील महत्त्वाचे शहर असा नावलौकिक वाढावा, यासाठी राष्ट्रवादी प्रयत्न करेल. भाजप नकारात्मक, चुकीच्या पद्धतीच्या जाहिराती दाखवत आहेत.
‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. “अरे… इथेच आहे महाराष्ट्र माझा.‘ जाहिराती करण्याकरिता एवढा पैसा आला कसा. टीव्हीवर दहा मिनिटांच्या बातम्यांत सहा मिनिटे जाहिराती असतात. महागाई कमी होईल. “अच्छे दिन‘ येतील असे जनतेला वाटले होते; पण सहा महिने झाले तरी आज काय परिस्थिती आहे. शंभर दिवसांत काळा पैसा आणणार होता त्याचे काय झाले.
देशाची जबाबदारी बघण्याऐवजी पंतप्रधान घसा बसेपर्यंत सभा घेत आहेत.विदर्भाच्या मुद्द्यावरून लोकांनी कोणाचे खरे मानावे. पंतप्रधानांचे, की पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाचे की त्या पक्षाच्या राष्ट्रीय नेत्यांचे. उद्धव ठाकरेंच्या विचारात सातत्याने बदल होतात. कधी म्हणतात सरकारमधून बाहेर पडणार, दुसऱ्या दिवशी म्हणतात नाही पडणार. एकदा म्हणतात मुख्यमंत्री होणार, नंतर म्हणतात नाही होणार.‘‘ असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला