पानसरे हल्ला प्रकरणी ,शिवसेनेची राज्यसरकारवर टिका

Date:

मुंबई – डाव्या चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि पुरोगामी विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणानंतर शिवसेनेने पुन्हा आपणच सहभागी झालेल्या सरकारला पिंजऱ्यात उभे केले आहे. या निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची ? असा सवाल शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. सध्या भाजप आणि शिवसेनेमधील संबंध मंत्र्यांच्या अधिकारांवरून ताणले गेले आहेत. त्यात या प्रकरणानंतर गृहखाते भाजपकडे असल्याने शिवसेनेने सरकारवर हल्ला करत अप्रत्यक्षपणे भाजपवरच हल्ला चढवला आहे.
सामना वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात आलेल्या या अग्रलेखात असे म्हटले आहे की, कोल्हापूर उजळवून टाकत असतानाच हा अंधार झाला. हे सर्व आपल्या महाराष्ट्रात घडत आहे व सरकार बदलले तरी तेच घडत आहे. दाभोलकरांची हत्या झाली तेव्हा काँग्रेस-राष्ट्रवादीचे सरकार होते व दाभोलकरांच्या खुनावरून त्या सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले होते. आता दिवसाढवळ्या झालेल्या पानसरे यांच्यावरील निर्घृण हल्ल्याची जबाबदारी कोणी घ्यायची? महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेचे साफ धिंडवडे निघाले आहेत व गुन्हेगार मोकाट सुटले आहेत असे बोंबलावे तर सरकार आपलेच आहे, पण आज दुसरे एखादे सरकार असते तर त्यांना याच शब्दांनी बेदम चोपले असते. गोविंद पानसरे हे डाव्या चळवळीचे जुनेजाणते नेते आहेत.वयोवृध्द नेते . ते नि:शस्त्र होते. अशा नि:शस्त्र व्यक्तीवर व त्यांच्या वृद्ध पत्नीवर हल्ला करणे हे षंढपणाचे लक्षण
आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...