पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारताच्या ताब्यात असणार!- परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर

Date:

नवी दिल्ली -पंतप्रधान मोदी सरकारच्या दुसऱ्या पर्वाचे शंभर दिवस नुकतेस पूर्ण झाले आहेत. याबरोबरच परराष्ट्रमंत्रलायचे देखील १०० दिवस पूर्ण झाले आहेत. यानिमित्त बोलताना परारष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाकिस्तानव्याप्त काश्मीर (पीओके) हा भारताचा अविभाज्य भाग असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्यांनी यावेळी हे देखील म्हटले की, पाकव्याप्त काश्मीरवरची आमची भूमिका नेहमीच स्पष्ट व कायम आहे. पीओके हा भारताचा भाग आहे व आम्ही एकदिवस त्यावर प्रत्यक्ष ताबा मिळवू अशी अपेक्षा आहे. याबरोबर एस जयशंकर यांनी कलम ३७० हा द्विपक्षीय मुद्दा नाही तर अंतर्गत मुद्दा असल्याचेही स्पष्ट केले.

जम्मू-काश्मीरला लागू असलेले कलम ३७० हटवण्यात आल्यापासून मोदी सरकारमधील अनेक मंत्र्यांनी पीओके बाबत वक्तव्य केले आहे. अशातच केंद्रीयमंत्री जितेंद्र सिंह यांनी म्हटले होते की, सरकारचे पुढील धोरण पीओकेला पुन्हा मिळवण्याचे आहे. तर जयशंकर यांनी कलम ३७० बाबत बोलताना म्हटले की, पाकिस्तानबरोबर कलम ३७० चा मुद्दा नाहीच असू शकत कारण हा मुद्दा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. त्यांच्याबरोबर दहशतवादाचा मुद्दा आहे. कलम ३७० बाबत आंतरराष्ट्रीय मंचाने देखील भारताची भूमिका समजून घेतलेली आहे.

पाकिस्तानवर टीका करताना परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी म्हटले की, भारत शेजार धर्म निभावण्याचे धोरण अवलंबत आहे. मात्र शेजारी देशाकडून वेगळे धोरण अवलंबवले जात आहे. त्यांना आपली वर्तवणूक सुधारण्याची व दहशतवादाविरोधात कारवाई करण्याची आवश्यकता आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकारने शंभर दिवसात केलेल्या विशेष कामांची देखील उजळणी केली. राष्ट्रीय सुरक्षा आणि परराष्ट्र धोरण अधिक बळकट करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘रिझर्व्ह बँक’ व ‘सेबी’ फक्त “दुर्वा” उपटतात काय ?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ( आरबीआय) सर्व बँकांची नियामक...

गरीबाच्या मुखी दुध जाहले महाग …आता गाईचे दूध 58 रुपये तर म्हशीचे दूध 74 रुपये लिटर

पुणे - भेसळीच्या पनीर ने राज्यात उच्छाद मांडला असताना...

संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये बेवड्यांनी लावली आग:अर्धा हेक्टर जंगल जळून खाक

मुंबई-मुंबईच्या बोरिवलीमधील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामध्ये बेवड्यांनी आग...

महाबळेश्वर पर्यटन: कार पसरणी घाटात १०० मीटर दरीत कोसळून भीषण अपघात

पुणे- लोणी काळभोर येथील तरुण महाबळेश्वर या ठिकाणी फिरण्यासाठी...