महात्मा गांधी जयंतीनिमित्त महात्मा गांधी यांच्या यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवाजीनगर
मतदारसंघातील काँग्रेस-आरपीआय (कवाडेगट) चेउमेदवार विनायक निम्हण यांनी आज दिवसभराच्या
प्रचाराची सुरुवात केली. बोपोडी गावठाण येथेस्वत: हातात झाडूघेऊन कार्यकर्त्यांसमवेत स्वच्छता मोहीम
राबवून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली.
गुरुवारी सकाळी येरवडा येथील लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर येथेकाढलेल्या पदयात्रेत हजारो
पुरुष व महिला कार्यकर्तेसहभागी झालेहोते. ‘काँग्रेस पक्षाचा विजय असो’, ‘येऊन येऊन येणार कोण, विनायक
निम्हण शिवाय आहेच कोण’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ढोल-ताशांच्या गजरात निघालेली ही
पदयात्रेत जागोजागी महिला औंक्षण करीत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथून सुरुझालेली ही
पदयात्रा लक्ष्मीनगर, जयजवान नगर, अमृतेश्वर गणपती, निळा झेंडा चौक, जयशक्ती चौक मित्रमंडळ,
आदर्श सोसायटी, रामनगर, घलोत चौक मार्गेपुन्हा शिवाजी महाराज प्रवेशद्वार येथेविसावली. नागरीकांचा
प्रतिसाद, हेच या पदयात्रेचेवैशिष्ट्य म्हणता येईल. नागरीक घराबाहेर येऊन निम्हण यांच्याशी हात मिळवत
होते. या पदयात्रेत ज्ञानेश्वर मोझे, हबीब मुल्ला, शंकर राठोड, रुपेश सोरटे, कैलास पवार, नंदा सरोदे, कांता
चव्हाण, सूर्यकांत घाडगे, आदिनाथ कळसाईत, बळीराम भोसले, राजपाल घलोत आदी सहभागी झालेहोते.
तत्पूर्वी, बुधवारी सायंकाळी भरपावसात पदयात्रा काढून खडकी बाजार येथील मतदारांशी संपर्क
साधला. खडकी नवा बाजार येथील काँग्रेस कार्यालयाचेउद्घाटन करून निम्हण यांनी आपल्या पदयात्रेला
प्रारंभ केला. पावसाच्या सरी कोसळत होत्याच. पावसामुळेसर्वत्र चिखलामुळेदलदल निर्माण झालेली होती.
अशाही वातावरणात निम्हण यांची हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पदयात्रा सुरुच होती. नवा खडकी बाजार
येथून सुरुझालेली ही पदयात्रा विठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज मार्गेइदशाह चौक, धोबी गल्ली,
गवळीवाडा, दर्गा वसाहत, गाडी अड्डा, कर्मचारी वसाहत, कमेला चाळ, महादेववाडी इथेआली. इथे डॉ. बाबासाहेब
आंबे़डकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ही पदयात्रा गंधकुटी बुद्ध विहार मार्गेराजीव गांधीनगर येथे
आली. त्यानंतर ती काँग्रेस कार्यालयाजवळ विसावली. या पदयात्रेत विनायक निम्हण यांनाच विजयी करा,
काँग्रेसला मत म्हणजेविकासाला मत, अशा घोषणा देत शेकडो पुरुष व महिला कार्यकर्तेसहभागी झालेहोते.