पुणे : नव्या लेखकांनी साहित्यापेक्षा टीव्ही मालिका लिहिण्याला जास्त प्राधान्य दिल्यामुळे मराठी भाषेत
चांगले साहित्यक उरलेले नाहीत अशी खंत प्रसिद्ध लेखक पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त
केली. आपल्या या भाषेला अजून समृद्ध करण्यासाठी नवीन लेखकांनी कस लावायला हवा, असे मत
त्यांनी व्यक्त केले.
डी.एस. कुलकर्णी फौंडेशनतर्फे घरकुल लॉंन्स येथे दि. २ ते ५ एप्रिलपर्यंत डीएसके गप्पांचे आयोजन करण्यात
आले आहे. दि. २ एप्रिल रोजी या गप्पांमध्येप्रा. मिलिंद जोशी यांनी विश्वास पाटील यांची
मुलाखत घेतली. ‘पानिपत’ या कादंबरीच्या मागचा इतिहास आणि प्रेरणा तसेच त्यातून मनाला चटका देणारे
अनुभव यावेळी त्यांनी रसिक प्रेक्षकांसमोर दिलखुलासपणे मांडले. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या
विचारपेक्षा मला अजून खूप साहित्यकृतींवर लेखन करायचे आहे असे ते म्हणाले.
डीएसके उद्योगसमूहाचे श्री. डी.एस. कुलकर्णी आणि डी.एस. कुलकर्णी फौंडेशनचे कार्याध्यक्ष श्याम भुर्के
यावेळी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, निसर्गानेच मला इतिहासाच्या जवळ नेल्यामुळे माझ्याकडून उत्तमोत्तम कादंब-यांचे लेखन
होऊ शकले. ‘पानिपत’ हा मराठ्यांच्या पराक्रमाचा आरसा आहे. याबद्दल आपल्याला अभिमान असायला
हवा. काही वर्षांपासून मराठी चित्रपट सातासमुद्रापलीकडे जात असताना मराठी साहित्य मात्र बांधावरच सीमित राहिले आहे