मुंबई- ‘शोले’तील जय आणि विरु च्या दोस्तीच्या आठवणीत खुद्द बिग बी अमिताभ यांनी क्या दिन थे वो भी … असे वाक्य जाणीवपूर्वक नमूद करीत ४० वर्षे झाली तरी आज हि हि दोस्ती प्रचलित आहे ; असे क्वचितच पाहायला मिळते असे आपल्या ब्लॉग वर नमूद केले आहे




1975मध्ये आलेल्या सुपरहिट ‘शोले’ सिनेमाची मुख्य जोडी जय (अमिताभ बच्चन) आणि वीरू (धर्मेंद्र) अलीकडेच ‘आज की रात है जिंदगी’ या टीव्ही शोमध्ये आले होते. बिग बींव्दारा होस्ट करण्यात आलेल्या या शोच्या फिनाले एपिसोडमध्ये धर्मेंद्र आपल्या सनी देओल या थोरल्या मुलासोबत उपस्थित होते.घायल -२ च्या प्रमोशन साठी हे बापलेक आले असले तरी अमिताभ यांनी मात्र यास भावनिक टच दिला .
या सुपरहिट जोडीने स्टेजवर 40 वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘शोले’ सिनेमातील आयकॉनिक सीनला री-क्रिएट केले. धर्मेंद्र यांच्या बाईकवर बिग बी स्वार झाले आणि दोघे ‘ये दोस्ती हम नही तोडेंगे’ गाण्याची झलक पुन्हा सादर करीत त्यांनी धमाल हि केली

