Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कॉ . गोविंद पानसरे अखेर गेले … झुंज संपली

Date:

मुंबई -ज्येष्ठ विचारवंत, डाव्या चळवळीचे लढवय्ये नेते अॅड. गोविंदराव पानसरे (८२) यांची गेले पाच दिवस मृत्युशी सुरू असलेली झुंज अखेर शुक्रवारी रात्री अपयशी ठरलीपानसरे यांनी ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.  . आयुष्यभर विवेकाने विचारांची लढाई लढणाऱ्या पानसरे यांच्या निधनामुळे महाराष्ट्राच्या पुरोगामी चळवळीचा खंदा आधारस्तंभ गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. पानसरे यांचे पार्थिव आज, शनिवारी सकाळी १०.३० वाजता कोल्हापुरात नेण्यात येणार असून, दुपारनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
सोमवारी (ता. १६) सकाळी कोल्हापुरातील सागरमाळ परिसरात त्यांच्या घरासमोरच अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात त्यांच्यासह पत्नी उमा पानसरेंही जखमी झाल्या होत्या. हल्लेखोरांनी पानसरेंच्यावर तीन गोळ्या झाडल्या होत्या. उपचारासासाठी पानसरे दाम्पत्याला अॅस्टर आधार हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. गेले चार दिवस सुरु असलेल्या उपचारांना पानसरे चांगला प्रतिसाद देत होते. त्यांच्यावरील अवघड शस्त्रक्रियाही यशस्वी झाल्या होत्या. प्रकृती स्थिर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना मुंबईत हलविण्याचा निर्णय घेतला. सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मुंबईला हलविण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार दुपारी अॅस्टर आधारमधील डॉक्टरांच्या संमतीनंतर त्यांना एअर अॅम्बुलन्सने ब्रीच कॅण्डी हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
रात्री दहाच्या सुमारास पानसरे यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव सुरू झाला. तसेच त्यांच्या हृदयाचे कार्य थांबले. डॉक्टरांनी प्रयत्नांची शर्थ करूनही पानसरे यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर पावणेअकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली, अशी माहिती त्यांच्यावरील उपचारांवर देखरेख करणारे डॉ. तात्याराव लहाने यांनी दिली.

कॉ . गोविंद पानसरे लिखित
‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकातील काही लिखाण आमच्या वाचकांसाठी येथे देत आहोत.

2

शिवाजीला सुद्धाज्ञानेश्वर, तुकाराम, म. गांधी यांच्यासारखं विकृत करायचा कार्यक्रम बराच काळ सुरू आहे. सध्याही चालू आहे. शिवाजी वतने देण्याच्या विरुद्ध हाेता. त्याने आयुष्यभर वतने देण्याचे टाळले. आताचे प्रस्थापित शिवभक्त नवी नवी वतने तयार करीत आहेत. वतनदारांना सांगत आहेत की तुमच्या वतनात तुम्ही हवं ते करा. रयतेला हवं तसं लुटा. खा, प्या, मजा करा. आमचे राज्य चालवायला आम्हाला मदत करा म्हणजे झालं. म्हणजे आम्हीसुद्धा रयतेला लुटू. तुम्ही थोड्या प्रमाणात लुटा. आम्ही मोठ्या प्रमाणात लुटू. तुम्ही हजारांत, क्वचित लाखांत खा. आम्ही कोटींत खाऊ.
शिवाजीच्या काळातील वतने आता नाहीत हे खरे. पण नवी वतने आणि नवे वतनदार वाढताहेत. झेड.पी.ची वतने सर्व जिल्ह्यात आहेत. साखरसम्राट म्हणजे नवे वतनदारच आहेत. वेगवेगळी कार्पाेरेशन्स म्हणजे वतनदाऱ्या आहेत. मोठ्या सहकारी संस्था, म्युनिसिपालट्या, आमदारक्या, खासदारक्या यांना वतनाचे स्वरूप आले आहे आणि या वतनदाऱ्या आता वंशपरंपरेने दिल्या घेतल्या जात आहेत…

रयतेच्या पोरीबाळींवर या नव्या वतनदारांचा डोळा आहे की नाही? बलात्कार होताहेत की नाही? रयतेच्या भाजीच्या देठालासुध्दा हात लावू नका म्हणून शिकवून गेलेल्या शिवाजीच्या महाराष्ट्रात नव्या राजांची, सरदारांची अन् वतनदारांची सरबराई करण्यात रयत रंजीस येते की नाही? आणि हे सारं “शिवाजी महाराज की जय’ म्हणत सुरू असतं. हे अगदीच भयानक. शिवाजी हे सारं पाहायला असता तर? त्यानं काय केलं असतं? तो नाही हे खरं आहे. तो स्वत: येणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे. पण त्याची शिकवण आहे ना? त्याची शिकवण अंगी बाणून नव्या वतनदारांवर प्रहार करणं हेच खरं शिवाजीचं स्मरण करणं होय.
आज शिवाजीच्या नावानं आणि शिवाजीच्या जयघोषात हिंदू-मुसलमान दंगे होत आहेत. या धर्मांधांना सांगायला पाहिजे की शिवाजी धर्मांध नव्हता. हिंदू धर्मावर श्रद्धा ठेवीत होता. पण मुसलमान धर्माचा द्वेष करीत नव्हता. श्रद्धावान होता पण अंधश्रद्ध  नव्हता.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सौर ऊर्जेच्या वापरामुळे विजेच्या दरात कपात करणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मागेल त्याला सौर कृषीपंप योजनेचा विक्रम,गिनीज बुकात नोंद डिसेंबर 5,...

हडपसर गोसावी वस्तीतील साजिद खानला पकडून २५ लाखाचे अंमली पदार्थ हस्तगत

पुणे - मेफेड्रॉन (एम.डी) या अंमली पदार्थाची विक्री करणारा...

भारतीयांच्या प्रेमाने, प्रतिसादाने भारावून गेलो-फ्रेंच नृत्यदिग्दर्शक झुआन ले यांची भावना

पुणे : "समकालीन नृत्य, हिप-हॉप, रोलर-स्केटिंग आणि दृश्यकाव्याचा अभिनव...

तरुणांनी पथनाट्यातून दिला बाल गुन्हेगारी रोखण्याचा संदेश

धनकवडी मधील आदर्श मित्र मंडळाचा शहरातील बाल गुन्हेगारी रोखण्यासाठी...