पुणे : फिल्म अँड टेलिव्हिजन इंस्टिट्यूट तथा ‘एफटीआयआय‘च्या अध्यक्षपदी चौहान यांच्या निवडीच्या निषेधार्थ येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाबाबत एक पावूल मागे घेत केलेल्या आवाहनानुसार दखल केंद्र सरकारने घेतली आहे आंदोलक विद्यार्थ्यांना सरकारने चर्चेसाठी निमंत्रित केले आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे हे उपोषण तब्बल 108 दिवस चालू होते. चर्चेच्या निर्णयानंतर काल (रविवार) उपोषण सोडण्यात आले. परंतु, आंदोलन चौहान यांच्याबद्दल निर्णय होईपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचे विद्यार्थ्यांनी स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात चर्चेसाठी निमंत्रित करीत असल्याचे पत्र केंद्रीय माहिती आणि प्रसारण खात्याच्या सहसचिवांनी दिले. याबाबत 29 सप्टेंबरला मुंबईत ही चर्चा होणार आहे.
एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे … उद्या सरकारशी चर्चा
Date:

