पुणे :
भारती विद्यापीठाच्या ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड आंत्रप्रुनरशीप डेव्हलपमेंट’ (आय.एम.ई.डी.) च्या वतीने मानव संसाधन विकासामधील उत्तम संस्थात्मक योगदान याविषयी परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. परिसंवादाचे उद्घाटन व्ही. जे. राव (एमआयएनडीए इंडस्ट्रिज लि.चे अध्यक्ष) यांच्या हस्ते झाले. व्यवस्थापन शास्त्र शाखेचे अधिष्ठाता डॉ. सचिन वेर्णेकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
अमित शर्मा (फिलिप्स इंडिया लिमिटेड, संचालक), बॉबी कुरीयाकोसे (संचालक, फोर्ब्स मार्शल ग्रुप, एचआर विभाग), नरेश कुमार पिनीशेटी (दीपक फर्टीलायझर अॅण्ड पेट्रोकेमिकल्स लि.), करण बक्षी (टीब्को सॉफ्टवेअर लि.) प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
एचआर व्यवस्थापकाला संघटनात्मक वाढ आणि विकास साधून उत्तम निर्णय घेणे आवश्यक असते या विषयी या परिसंवादात मार्गदर्शन करण्यात आले. एमबीए अभ्यासक्रमाच्या एच. आर. विभागाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आणि बीसीए अभ्यासक्रमाच्या तिसर्या वर्षाच्या विद्यार्थी परिसंवादात सहभागी झाले होते.
प्रा.मकरंद पोळ (‘सीआरटी’चे प्रमुख), डॉ. नीलम लाल (एच आर विभागाच्या प्रमुख), प्रवीण माने, डेक्स्टर वूडवर्ड आणि प्रभात कुमार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.