आख्खा भारत देश राहणार फक्त १०० स्मार्ट सिटी मध्ये….?

Date:

पुणे- पाणी नाही ? रोजगार नाही ? पोट भरायला चला शहरात … हीच संकल्पना आता देशातील सरकार राबवू पाहते आहे ? स्मार्ट सिटी हा त्याचाच प्रकार आहे ? असला तर… देशभरातील  खेड्यांचे होणार तरी काय ?  यामुळे आख्खा भारत देश राहणार… आणि विभागणार  फक्त १०० स्मार्ट सिटी मध्ये ? … आणि खेडी –गावे होणार इतिहासात जमा … ? शहरात आलेली खेड्यातील माणसे एक तर..  करणार गुलामी- चाकरी अन्यथा होणार गुंड ? असे नानाविध प्रश्न आता सतावू लागणार आहेत .

स्मार्ट सिटी म्हणजे होणार तरी काय? काय आहे हे गाजर? आणि सर्वसामान्यांना खरोखर होणार आहे काय, त्याचा फायदा ? असे अनेक प्रश्न आता उभे राहत आहेत . देशातील जनतेला आहे तिथे सुविधा पूरवा .. गाव सोडायला भाग पाडू नका .. हा विचार आता उरणार आहे कि नाही ? कि साऱ्या या १०० महानगरात देश एकवटणार आहे ? खेडी नामशेष होणार आहेत ? अशा प्रश्नांनी आता … अगोदरच जगण्यासाठी ..  हैराण असलेले गावकरी आणखी हैराण होणार आहेत .

सन्माननीय नरेंद्र मोदी गुजरातचे .. जे आता देशाचे  सर्वाधिक बहुमत असलेले असे ते खमके पंतप्रधान आहेत … समजा  स्मार्ट सिटी हे जरी  त्यांचे  पूर्ण न होणारे स्वप्न असेल … तरी खेडी आणि तेथील साधारण माणूस अस्वस्थ होणार आहे …. खेड्यातील जागेला आता किती भाव मिळणार आणि  शहरातील जागेची किंमत किती वाढणार ? हे सारे प्रश्नच प्रश्न , नव्या स्मार्ट सिटी योजनेमुळे उपस्थित होणार आहेत .

बरे; स्मार्ट सिटी करणार -म्हणजे योजना राबविणार … योजना राबविणार म्हणजे … अनेकांना … (होय प्रथम उद्योजकांना) कामे मिळणार … आणि आधीच असुरक्षित असलेला कामगार .. पोटासाठी त्यांच्याकडे( त्या उद्योजकांकडे ) अजून वेगाने धावत जाणार ? म्हणजे भांडवलशाही आणि गुलामी हे चित्र कायमच राहणार ? देशातील सरकारे गरिबांना , गुलामीच्या चक्रातून कधी बाहेर काढणार ? याची काही योजना नाही काय ? आज देशातील ९५ टक्के कामगार असुरक्षित आहे ;साऱ्या कामगार  चळवळी आजतागायत संपुष्टात आल्या आहेत … मुठ्भरांकडे हजारो कोटींची संपत्ती … आणि कोट्यावधी जनता … रोज पोटासाठी वाट्टेल त्या संघर्षात … हि अवस्था बदलणार आहे ? बदलण्यासाठी मोदी सरकार काही पावले उचलीत आहे ? आर्थिक विषमता … नष्ट करण्याएवजी, जातीय दरी वाढवून, आर्थिक विषमतेला फाटा देवून पुन्हा देश भांडवलदारांच्या हाती एकवटतो आहे … असे कोणी म्हटले तर…  वावगे ठरेल ? प्रश्नच प्रश्न … सरकार कोणतेही येवू द्यात प्रश्नांमध्ये कमी होत नाही , वाढतच आहेत … पण आता काय ? किमान ५ वर्षे भाजपचे सरकार आहे … मोदींचे सरकार आहे .. त्यांचे काम – आणि त्यांच्या योजना – याबद्दल प्रश्न -संशय उपस्थित करून करून काही फायदा नाही … पाहू यात नेमके हे सरकार करते तरी काय ?

देव…  नाही हो –५ वर्षे आता हेच आम जनतेचे भवितव्य ठरविणार आहेत .. हो , एवढे म्हणा नक्की , देवा  … या सरकारकडून  तरी सामान्य माणसाचे जीवन सुसह्य करणारे काम होवू देत … खरोखर १०० शहरे नाहीत तर हा देशच स्मार्ट होवू देत ….

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कर्वेनगर दुर्घटनेतील जखमी रुग्णाची महापौर मंजूषा नागपूरे यांनी दीनानाथ रुग्णालयात घेतली भेट

पुणे :कर्वेनगर येथील मेघराज सोसायटीसमोर झाडांच्या वाढलेल्या फांद्या कापण्यासाठी...

नदीपात्र खराब करणारांवर तातडीने कडक कारवाई करा – महापौर मंजुषा नागपुरे

पुणे- पुण्याच्या नदीपात्रात कचरा , राडारोडा टाकून अगर अन्य...

तिसऱ्या तिमाहीत भारत फोर्ज ला संरक्षण क्षेत्रातील १,८७८ कोटी रूपयांच्‍या ऑर्डर्स

भारत फोर्जकडून आर्थिक वर्ष २०२६ च्‍या तिसऱ्या तिमाहीत प्रबळ...

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतरही प्रशासनाकडून दिरंगाई ही खूप क्लेशदायी -आ.हेमंत रासने

शहराच्या मध्यवर्ती भागातील भुयारी मार्गांचा डीपीआर तात्काळ करा! -आ.हेमंत...