पुणे :
‘मोदी सरकारने निवडून आल्यावर अल्पसंख्यकांबाबत बाळगलेला दृष्टीकोन चुकीचा असून, चर्च वरील हल्ले, ननवरील हल्ले, मदर तेरेसांविषयी उद्गार यातून हा दृष्टीकोन व्यक्त होत आहे, अशी टीका ‘राष्ट्रवादी काँग्रेस’च्या खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी आज केली.
आज त्या ख्रिश्चन समुदायाच्या पुण्यात निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या. त्यानंतर पत्रकाद्वारे त्यांनी आपल्या या विषयावरच्या भावना व्यक्त केल्या.
मोदी सरकार सत्तेत आल्यावर जातीयवादी शक्तींना बळ मिळाले आहे. पंतप्रधान मोदींचा मूक पाठिंबा या शक्तींना असल्याचे चित्र दिसत आहे हे दुर्देवी आहे. अल्पसंख्यकांच्या विकासाबात सरकारकडून ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण होताना दिसत नाहीत. सर्वधर्म समभाव हे लोकशाहीतील महत्त्वपूर्ण मूल्य असून, त्याकडे हे सरकार दुर्लक्ष करीत आहे, हे चुकीचे आहे, असे खासदार अॅड. वंदना चव्हाण यांनी म्हटले आहे.