Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

शासनाकडे ऑनलाईन माहिती अधिकारांतर्गत किती अर्ज प्राप्त झाले याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट

Date:

FB_IMG_1428325958984

पुणे-

शासनाकडे ऑनलाईन माहिती अधिकारांतर्गत किती अर्ज प्राप्त झाले याबाबतची माहिती नसल्याचे स्पष्ट झाले आहे असा दावा माहिती अधिकार क्षेत्रातील जाणकार कार्यकर्ते आणि सुराज्य संघर्ष समितीचे अध्यक्ष विजय कुंभार यांनी केला आहे त्यामुळे ऑनलाईन माहिती अधिकाराची सुविधा केवळ नावापुरतीच उरल्याचे चित्र आहे
त्यांनी यासंदर्भात प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे कि , ऑनलाईन आरटीआय सुरू झाल्यानंतर मी शासनाकडे ऑनलाईन  माहिती अधिकारांतर्गत  शासनाच्या सर्व विभागांकडे मिळून एकूण किती अर्ज प्राप्त झाले ? . माहिती अधिकार अधिनियमातील  कलम ६ (१) अंतर्गत अर्जांच्या फी पोटी एकूण  किती रक्कम जमा झाली ? . आणि दारिद्र्य रेषेखालील किती अर्ज प्राप्त झाले ?. याबाबतची माहिती मागीतली होती. मला शासनाकडून ‘Please refer to your RTI application no.ITDEP/R/2015/60065.The information which you have requested is not available in Govt. records.‘ असे उत्तर मिळाले.

 नुकतेच मी मुख्यमंत्र्याना एका पत्राद्वारे मंत्रालयातून गैरव्यवहारांना खतपाणी मिळत असल्यानेच ऑनलाईन आरटीआय ची दुरवस्था होत असल्याबद्दल लिहिले होते. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात प्रथम केलेल्या महत्वाच्या कामांमध्ये ऑनलाईन आरटीआयचा समावेश होता. तशी त्यासंदर्भातील यंत्रणा गेली काही वर्षे तयार होती . परंतु नोकरशाहीच्या दुराग्रहामुळे तसेच भ्रष्टाचाराला मंत्रालयातूनच खतपाणी मिळत असल्याने ती सुरू करण्यात आली नव्हती.मुख्यंमंत्र्यांच्या आग्रहाने ती सुरू करण्यात आली. परंतु नोकरशाही  ती व्यवस्थित चालणार नाही याची पूर्णपणे काळजी घेत आहे.त्याचाच अनुभव सदर उत्तराने आला आहे.

 मंत्रालय स्तरावर अनेक विभागांमध्ये ऑनलाईन माहिती अधिकाराचे अर्ज स्विकारले जात नाहीत . स्विकारलेल्या अर्जांना वेळेत उत्तरे दिली जात नाहीत.अनेकदा फी स्विकारली जाते परंतु अर्ज स्विकारला जात नाही.याला कारणे अनेक आहेत, त्यामध्ये मंत्रालयातील फार कमी लोकांना इंटरनेटचा व संगणकाच्या इतर सुविधांचा वापर करता येतो .बाकीचे सर्व अधिकारी व कर्मचारी संगणकाचा वापर केवळ टाईपरायटर म्हणूनच करतात या बाबीचा समावेश आहे. परंतु सर्वात जास्त महत्वाची बाब म्हणजे  माहिती अधिकाराबाबत शासकीय अधिका-यांच्या मनात असलेली भिती हेच यामागचे खरे कारण आहे. भितीचीही दोन प्रमुख कारणे आहेत त्यातील पहिले भ्रष्टाचार – गैरव्यवहार हे असले तरी आपली अकार्यक्षमता उघड होण्याची भिती हेही कारण त्यामागे आहे.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बेरोजगारांना रोजगार मिळो आणि महिला अत्याचार कमी व्होवो”

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची पांडुरंगाकडे प्रार्थना. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन...

वारीच्या सोहळ्यात चोरट्यांच्या टोळ्या पकडून ४३ लाखाचा ऐवज हस्तगत

पुणे- श्री. संत ज्ञानेश्वर महाराज व श्री. संत तुकाराम...

सूक्ष्म सिंचन घटकाकरिता अर्ज करण्याचे आवाहन

पुणे, दि. 23: राष्ट्रीय कृषी विकास योजना- प्रती थेंब...