पुणे- पुणे महापालिकेत समाविष्ट होणार असलेल्या २३ गावांच्या विकासासाठी निधीची आकांडतांडव कशासाठी असा सवाल करीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे पुणे शहर आणि जिल्ह्यावर बारकाईने लक्ष आहे ,विरोधकांनी त्याची काळजी करू नये ,जे भाजपचे नेते ओरड करत आहेत त्यांनी , भाजपच्या स्थानिक आमदारांनी या समावेशाचे स्वागत केले आहे याकडे आज राष्ट्रवादी चे खासदार ,अभिनेते डॉ . अमोल कोल्हे यांनी लक्ष वेधले आहे. याशिवाय कात्रज कोंढवा रस्त्याचे रुंदीकरण रखडल्याच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी ‘ हे काम रखडण्या मागे झारीतले शुक्राचार्य कोण आहेत ते ओळखावे असेही मत प्रदर्शित केले .आज सकाळी डॉ. अमोल कोल्हे हे बिबवेवाडी तील सुखसागर नगर 1 येथे कात्रज कोंढवा रोड ते गंगा ओशन सोसायटी पर्यंत ४०० मिमी व्यासाची स्वतंत्र पाण्याची नलिका टाकणे ,तसेच महावीर नगर ते प्रेरणा हॉस्पिटल पर्यंत ३०० मिमी व्यासाची स्वतंत्र नलिका टाकणे, सुखसागर नगर भाग 2 करीता कात्रज कोंढवा रोड ते खंडोबा मंदिर पर्यंत ४०० मिमी पाण्याची एक्स्प्रेस नलिका टाकणे या सह विविध कामाच्या भूमिपूजनासाठी येथे आले होते त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी या बाबी स्पष्ट केल्या . कात्रज ते देहूरोड बायपास वरील नवले ब्रिज येथे सातत्याने होणारे अपघात रोखण्यासाठी आपण विशेष प्रयत्न करणार आहोत हे देखील त्यांनी स्पष्ट केले . नगरसेवक प्रकाश कदम, मगराज शेठ राठी ,प्रतिक कदम,माजी नगरसेविका भारती कदम आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
23 गावांच्या विकासासाठी निधीची आकांडतांडव कशाला ? खासदार डॉ. अमोल कोल्हेंचा सवाल
Date:

