पुणे- ‘स्मार्ट सिटी ‘तून देश बदलणार नाही. आणि स्मार्ट सिटी तून देशाला भविष्य नाही … स्मार्ट सिटी कशाला? खेडी स्मार्ट करा … फुगलेली शहरे म्हणजे विनाशाकडे वाटचाल … अशी सूचना करणारे पत्र आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना देवूनही त्यांनी स्मार्ट सिटी चा बिगुल वाजवीलाच असे स्पष्ट प्रतिपादन करीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी ‘स्मार्ट सिटी ‘ प्रकल्पाबाबत नाखुशी आणि विरोध प्रगट केला आहे .खेड्यातच तरुणांना रोजगार निर्माण करून दिला पाहिजे. खेडी स्वावलंबी व्हायला हवीत असेही ते म्हणाले .. ..
पहा, आणि ऐका .. नेमके –प्रत्यक्ष अण्णा हजारे काय म्हणाले …