ओडिशानंतर पंजाबही 1 मेपर्यंत लॉक; आता सामुदायिक संसर्ग सुरू : पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचा दावा

Date:

  • 10 दिवसांत बाधित रुग्ण चौपट, आता लॉकडाऊन दोन आठवडे वाढण्याची शक्यता
  • घाबरू नका, अजून अशी स्थिती आलेली नाही : केंद्र सरकार
  • महाराष्ट्राच्या आरोग्यमंत्र्यांनी सामुदायिक संसर्ग नाकारला
  • डब्ल्यूएचअो अहवालात भारतात सामूहिक संसर्गाचा उल्लेख, अजून सामुदायिक प्रसार झालेला नाही   नवी दिल्ली/चंदीगड. पंजाबमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आता सामुदायिक प्रसाराच्या टप्प्यावर आल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी केेला. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा दावा फेटाळून अद्याप देशात ही स्थिती नसल्याचे म्हटले आहे. कॅ. अमरिंदर सिंग म्हणाले, राज्यात २७ रुग्णांची कोणतीच ट्रॅव्हल हिस्ट्री नाही. यातील बहुतांश सामुदायिक प्रसाराचे बळी आहेत. पंजाबमध्ये आतापर्यंत १०१ रुग्ण आढळले अाहेत. मात्र, सिंग यांचा हा दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी फेटाळला. घाबरण्याचे कारण नाही, असे सांगून ती स्थिती आली तर तत्काळ कळवले जाईल, असे ते म्हणाले. कॅ. सिंग यांनी सामुदायिक संसर्गाचा दावा करून पंजाबमध्ये लॉकडाऊन १ मेपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केवळ शेतकऱ्यांना यातून थोडी सूट मिळेल. गुरुवारी ओडिशाने ३० तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवले होते.

    १६ हजार चाचण्या, २% पॉझिटिव्ह

    आरोग्य मंत्रालयानुसार, गुरुवारी कोरोनाच्या १६,००२ चाचण्या झाल्या. यात केवळ २% रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत.

    मोदी आज करणार मुख्यमंत्र्यांशी चर्चा

    देशात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊनचा दुसरा टप्पा सुरू होण्याची शक्यता आहे. किमान हे लॉकडाऊन १४ दिवस आणखी वाढेल, अशी परिस्थिती सध्या आहे. यावर शनिवारी मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्णय घेतील. संसर्गाची स्थिती व विविध सूचनांनुसार हे लॉकडाऊन याच स्वरूपात वाढवले जाईल किंवा त्याचे स्वरूप व काही भागांत सूट देण्याबाबत निर्णय होईल हे ठरवले जाईल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या व्हीसीपूर्वी गृह मंत्रालयाने राज्यांकडून २१ दिवसांच्या लॉकडाऊनवर मत मागवले आहे. नागरिकांना अधिक सेवांसाठी सूट दिली जावी काय, अशी विचारणा करण्यात आली आहे. बिहारसह काही राज्यांनी सूचना पाठवल्या असून ग्रामीण भागांत सूट देण्याबाबत अधिक सूचना आहेत. २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा करताना ऑनलाइन प्लॅटफॉर्म व जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांना यातून सूट दिली गेली होती. याशिवाय आरोग्य, स्वच्छता, पोलिस, माध्यमे आणि बँक कर्मचाऱ्यांनाही सूट देण्यात आली होती.

    मुंबई व महानगर क्षेत्र वगळता उर्वरित महाराष्ट्रात लॉकडाऊन काढून घेण्याचा ठाकरे सरकारचा विचार

    • सूत्रांनुसार, महाराष्ट्रात केवळ मुंबई आणि मुंबई महानगर क्षेत्रातच लॉकडाऊन असावे, असे राज्य सरकारला वाटते. देशात कोरोनाचा कहर सुरू असताना राज्य सरकार मात्र केवळ मुंबई व एमएमआरमध्येच लॉकडाऊनबाबतचे नियम लागू करू इच्छित आहे.
    • तामिळनाडूत वैद्यकीय तज्ञांच्या एका गटाने लॉकडाऊन दोन आठवडे वाढवण्याची शिफारस केली आहे. या आधारे शनिवारी कॅबिनेट बैठकीत निर्णय घेतला जाईल. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावतही लॉकडाऊन वाढवण्याच्या बाजूने आहेत.
    • आसामच्या गुवाहाटीत आवश्यक सेवा देणाऱ्या वाहनांना ऑड-ईव्हन नियम लागू केला जाईल. अत्यावश्यक सेवेचे स्टिकर्स लावलेल्या वाहनांची गर्दी होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

    लॉकडाऊनदरम्यान गर्दी, मिरवणुकांना परवानगी देऊ नका : गृह मंत्रालय

    आगामी सणासुदीचा काळ पाहता केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यांना निर्देश दिले असून लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही सामाजिक किंवा धार्मिक कार्यक्रमांना तसेच मिरवणुकांना परवानगी देऊ नये, असे म्हटले आहे. साेशल मीडियावरील आक्षेपार्ह माहितीवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना आहेत. आगामी काळात बैसाखी, रंगोली, बिहू, विशू असे सण उत्तर भारतात होत आहेत.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...