गोदरेज इंटेरिओने केलेल्या ‘मेक स्पेस फॉर लाइफ’ या सर्वेक्षणानुसार ६९ टक्के पुरुषांना कामाच्या तणावामुळे कुटुंबाला जास्त वेळ देता येत नाही असे वाटते, तर असे वाटणाऱ्या स्त्रियांचे प्रमाण त्यांच्या तुलनेत कमी म्हणजेच ५४ टक्के आहे
मुंबई – काम आणि रोजचं आयुष्य यांचा समतोल साधताना सातपैकी पाच (७६ टक्के) नोकरदार/व्यावसायिक पुरुषांना आपल्या पद्धतीने जगता येत नाही असे वाटते, तर असे वाटणाऱ्या नोकरदार/व्यावसायिक स्त्रियांचे प्रमाण सातपैकी तीन (५४ टक्के) असल्याचे गोदरेज इंटेरिओने नुकत्याच केलेल्या ‘मेक स्पेस फॉर लाइफ’ सर्वेक्षणात दिसून आले आहे. कामाचा ताण, तंत्रज्ञान, रोजचा दिनक्रम यामध्ये स्वतःसाठी, कौटुंबिक नात्यांसाठी तसेच आपली आवड जोपासण्यासाठी कमी वेळ आणि संधी मिळतात असे भारतीयांना वाटते.
गेल्या काही वर्षांत पुरुषांना लहान मुलांचे पालनकर्ते आणि कुटुंबासाठी अर्थार्जन करणारी व्यक्ती अशी दुहेरी भूमिका निभवावी लागत आहे. या सर्वेक्षणामध्ये बऱ्याच पुरुषांनी मुलांची काळजी कशी घेण्यात आणि घरातील काम समजून घेण्यात वेळ जात असल्याचे मान्य केले. दुसरीकडे स्त्रिया पुरुषांच्या तुलनेत अधिक चांगल्याप्रकारे आयुष्य आणि कामाचा समतोल साधत असल्याचे दिसून आले आहे.
या सर्वेक्षणाविषयी गोदरेज इंटेरिओचे मुख्य ऑपरेटिंग अधिकारी अनिल एस माथुर म्हणाले, ‘विशेष म्हणजे, स्त्रिया आणि पुरुषांसाठी एचआरची धोरणे सारखीच असली, तरी स्त्रिया काम आणि आयुष्याचा समतोल जास्त चांगल्या प्रकारे हाताळतात. सर्वेक्षणानुसार कामाचा ताण, तंत्रज्ञान, रोजचा दिनक्रम यामध्ये स्वतःसाठी, कौटुंबिक नात्यांसाठी तसेच आपली आवड जोपासण्यासाठी स्त्रियांच्या तुलनेत कमी वेळ आणि संधी मिळतात, असे पुरुषांना वाटते. स्त्रिया कायमच घराचा सांभाळ करत आल्या आहेत. घरातल्या प्रत्येक व्यक्तीसाठी त्या विविध जबाबदाऱ्या पार पाडत असतात. त्यांनी व्यवस्थापनाचे जीवनकौशल्य आत्मसात केले आहे. एक ब्रँड या नात्याने गोदरेज इंटेरिओ वैयक्तिक आयुष्याच्या सर्व पैलूंच्या महत्त्वाविषयी जागरूक आहे आणि म्हणूनच त्यांना वेळ काढण्यासाठी आणि आयुष्य जगण्यासाठी प्रोत्साहन देतो. आमच्या नाविन्यपूर्ण फर्निचर डिझाइन्सद्वारे आम्हाला ग्राहकांचे आयुष्य सोपे करायचे आहे आणि त्यांना आठवण करून द्यायची आहे, की आयुष्याचा कितीही तणाव असला, तरी आपण कुटुंब, आवड, मित्रपरिवार यांच्यासाठी घरी वेळ काढला पाहिजे.’
नोंद घेण्यासारखी बाब म्हणजे या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे, की कामाचा तणाव आपल्याला कुटुंबाला वेळ देण्यापासून दूर ठएवतो असे ६९ टक्के पुरुषांना वाटते तर स्त्रियांमध्ये हे प्रमाण ५४ टक्के आहे. एकतृतीयांश (३१ टक्के) पुरुष दावा करतात, की व्यग्र व्यावसायिक जीवनामुळे त्यांना त्यांचे छंद जोपासता येत नाहीत.
त्याशिवाय या सर्वेक्षणासाठी प्रतिसाद देणाऱ्यांपैकी ६४ टक्के जणांना आपण कामाच्या तणावामुळे कुटुंबाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही असे वाटते, तर ६८.२ टक्के जणांना काम व आयुष्याचा समतोल साधताना आपल्या पद्धतीने आयुष्य जगणे शक्य होत नाही असे वाटते. ५६.७ टक्के जणांनी आपला काम व आयुष्याचा समतोल अतिशय वाईट आहे असेही सांगितले.
हे सर्वेक्षण १३ शहरांतील १३०० भारतीयांच्या सहभागातून तयार करण्यात आले. या १३ शहरांमध्ये चंदीगढ, मुंबई, जयपूर, पटना, कोईम्बतूर, पुणे, लखनौ, हैद्राबाद, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बेंगळुरू आणि अहमदाबाद यांचा समावेश होता.