भारत आपल्या प्रचंड मोठ्या कचऱ्याच्या समस्येचे ऊर्जा, अर्थव्यवस्था आणि सक्षमीकरणाच्या इंजिनमध्ये रूपांतर करू शकतो.
हे चित्र डोळ्यासमोर आणा – रोजच्या दिवसाला ७,५०० कचऱ्याच्या गाड्यांची रांग चालत आहे आणि त्यातून दरवर्षी आपण वापरलेला ५० दशलक्ष टन घनकचरा जमा होत आहे. आपण जे फेकतो ते आपल्या देशभरातली ३,१५० डंपसाइट्सच्या विस्तारणाऱ्या समुद्रात जमा होते. आपल्या भूमीवरचा तो डाग आहे. पण हे थांबलेले नाही. यात भरच पडत आहे. कारण २०३० पर्यंत ही संख्या तिप्पट होण्याचा अंदाज असून वार्षिक १६५ दशलक्ष टन कचरा वाढेल. हा कचरा ठेवण्यासाठी आपल्याला अशा लँडफिलची, जमिनीची गरज भासू शकते जी आपल्या स्वप्नांचे अनमोल शहर असलेल्या मुंबईच्या विस्तीर्ण आकाराची असेल. कचऱ्याच्या एक भयंकर शहरामध्येच् रूपांतर होईल.
कचर्याबाबतच्या आपल्या दृष्टिकोनाचा पुनर्विचार
भारतातील केवळ शहरी आणि औद्योगिक सेंद्रिय कचऱ्यामध्येच अंदाजे ५,६९० मेगावॅट ऊर्जा इतकी प्रचंड क्षमता आहे. क्षणभर त्याची कल्पना करा. ही अशी शक्ती आहे जी संपूर्ण वर्षासाठी २,५०० हून अधिक घरांच्या उर्जेची सर्व गरज पूर्ण करू शकते आणि हे सर्व आपण जे टाकून, फेकून दिलेले आहे त्यातून होऊ शकते.
परंतु हे फायदे केवळ पर्यावरणीय नाहीत. आपला कचरा ही आर्थिकदृष्ट्या सोन्याची खाणही बनू शकते. पुनर्वापर उद्योगाद्वारे कचरा व्यवस्थापनाकडे बघण्याचा एक गंभीर, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन दरवर्षी ३०,००० कोटी रुपयांचा खजिना खुला करू शकतो. कचऱ्याकडे फेकून देण्याची टाकाऊ गोष्ट म्हणून पाहण्यापासून न वापरलेल्या संधींचा साठा म्हणून बघण्याची आणि आपला दृष्टीकोन बदलण्याची हीच वेळ आहे.
आपल्या कचऱ्याचे दायित्व
आपण ज्या कचर्याशी झगडत आहोत त्याच्या साठत चाललेल्या ढिगाऱ्याबाबत चिंतन केले तर हे स्पष्ट होते की आता आपण सर्वांनी पुढे जाण्याची वेळ आली आहे. प्रत्येक नागरिक, महामंडळे आणि सरकारी घटकांनी एकमेकांच्या साथीने प्रयत्न केले पाहिजेत आणि या समस्येचा निकराने सामना केला पाहिजे.
गोदरेजमध्ये, आम्ही स्थानिक नगरपालिका आणि नागरिकांशी सहयोग करून अनेक सामुदायिक कचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू केले आहेत. आमचे सर्वांगीण धोरण तीनपदरी आहे – लँडफिल्समधून कचरा वळवणे, एक शाश्वत कचरा व्यवस्थापन व्यवसाय मॉडेल स्थापित करणे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कामाचा गौरव करणे.
तंत्रज्ञानाच्या शक्तीचा उपयोग करून आम्ही पालिकेच्या कचरा व्यवस्थापनात पारदर्शकता आणि जबाबदारी आणली आहे. आता, कंत्राटदार, शहरी स्थानिक संस्था अधिकारी आणि पर्यवेक्षक कचऱ्याच्या उत्पत्तीपासून शेवटपर्यंतच्या प्रवासाचा मागोवा घेऊ शकतात आणि दररोज प्रत्येक स्वच्छता कर्मचाऱ्याच्या सेवेच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करू शकतात. या स्पष्ट दृष्टीकोनामुळे जलद समस्या सोडवण्याची खात्री मिळते, नागरिकांना त्यांच्या कचऱ्याचे विलगीकरण करण्यासाठी प्रोत्साहन मिळते आणि पुनर्वापराच्या शक्यतांचे दरवाजे खुले होतात.
आमच्या सार्वजनिक खाजगी लोकसहभागाच्या मॉडेलला यश मिळाले आहे. २०१६ मधील आमच्या सुरुवातीच्या पथदर्शी प्रकल्पापासून आम्ही १३,००० टन घनकचरा लँडफिल्समधून यशस्वीरित्या वळवला आहे. या उपक्रमाने वैज्ञानिक कचरा व्यवस्थापनाच्या पायाभूत सुविधांना प्रोत्साहन दिले, कचरा वर्गीकरणाबाबत नागरिकांचे प्रबोधन केले आणि स्वच्छता कामगारांना सुरक्षा आणि सन्मान प्रदान केला.
कचरा व्यवस्थापन पूर्णपणे स्वीकारण्यासाठी आणि त्याच्या अंतर्भूत संधींचा फायदा घेण्यासाठी आपण या त्रिस्तरीय सहभाग मॉडेलचा स्वीकार केला पाहिजे. कचरा विलगीकरणाबद्दल प्रत्येकन प्रत्येक नागरिकाला शिक्षित करण्यासाठी खाजगी क्षेत्र सरकारसोबत सहकार्य करू शकते आणि कचरा व्यवस्थापन पायाभूत सुविधा निर्माण करण्यात मदत करू शकते. त्याचवेळी स्थानिक अधिकारी मंडळे घराघरात कचरा वेगळा करण्याच्या आवश्यकतेसाठी नियमांची अंमलबजावणी करू शकतात.
स्त्रोत वेगळे करणे हा शाश्वत कचरा व्यवस्थापन परिसंस्थेचा अत्यावश्यक पाया आहे. विघटनशील आणि नॉन-बायोडिग्रेडेबल कचरा वेगळे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कचरा पुनर्वापर संसाधने खर्च केली जातात, ही समस्या स्त्रोत विलगीकरणाद्वारे सहजतेने सोडवली जाते. समाज आणि स्वच्छता कामगारांचा समावेश असलेली एक सुव्यवस्थित जागरूकता मोहीम हे ध्येय गाठू शकते. नागरिक आणि रहिवासी संघटनांनी वैज्ञानिक कचरा वर्गीकरण, संकलन आणि विल्हेवाटीचा पाया बनू शकेल अशी ही प्रणाली अंतर्गत पातळीवर राबवविणे आवश्यक आहे.
भारतात अंदाजे १.५ दशलक्ष कचरा गोळा करणारे कर्मचारी आहेत. सर्व प्रकारच्या पुनर्वापरयोग्य कचऱ्यापैकी ८०% कचरा गोळा करणारे हे खरेखुरे हीरो आहेत. यापैकी बहुतेक कामगार मोजक्याच संरक्षण आणि सुरक्षिततेसह असंघटितपणे काम करतात. त्यांच्या कौशल्य विकासामध्ये गुंतवणूक करणे हा सर्वांगीण कचरा व्यवस्थापनाचा एक महत्त्वाचा पैलू आहे. मूलभूत संरक्षणात्मक सुविधा पुरवून त्यांच्या सामाजिक-आर्थिक अधिकारांबद्दल जागरूकता वाढवून, त्यांना मूलभूत ओळखपत्रे मिळविण्यासाठी सक्षम करून आणि सरकारी धोरणांमध्ये प्रवेश सुलभ करून आपण आपल्या पुनर्वापर प्रणालीला लक्षणीयरीत्या मजबूत करू शकतो.
शेवटी, कचऱ्याच्या अफाट विस्ताराचा सामना करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. पारदर्शकता, मजबूत पुनर्वापर प्रणाली स्थापित करणे आणि आपण निर्माण करत असलेला कचरा आणि स्त्रोत वेगळे करण्याचे महत्त्व याबद्दल व्यक्तींना शिक्षित करणे यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. आपल्या कचऱ्याचे संपत्तीत रूपांतर करण्याची वेळ आली आहे.
,