जनलोकपाल आंदोलनाला आज ९ वर्षे झाली…ह्या आंदोलनात माझा मी पणा गळाला….बहुधा स्वातंत्र्याच्या लढ्यात त्या जन्मी सहभाग असेल वा नसेल, १९४२ च्या चले जाव चा थरार अनुभवायला मिळाला नसेल,जयप्रकाश नारायण यांच्या संपूर्ण क्रांतीच्या आंदोलनावेळी मी खूप लहान होतो – मात्र या सगळ्याची कसर भरुन निघाली ती अण्णा हजारे यांच्या १६ ऑगस्ट २०११ च्या जनलोकपाल विधेयका साठीच्या जन आंदोलनात….
बालगंधर्व चौकात मला मिळाले शेखर मुंदडा,दीपक भराडिया,कृष्णा यादव,गणेश बाकले,संजय ठाकूर,बद्रीनारायण सोमाणी,सदाशिव कुलथे,रामेश्वर शेवाळे,हेंद्रे काका,प्रिया पवार यांच्यासारखे असंख्य स्नेही ( सर्वांची नावे घेणे अशक्यच) – विवेक वेलणकर,विनिता देशमुख,,जुगल राठी,तृप्ती देसाई हे स्नेही अग्रभागी होतेच / अनेक संस्था संघटना आणि सामान्य माणसांच्या सहभागाने खरेतर सगळेच FACELESS झालो होतो / इथे होता फक्त तिरंग्याचा अभिमान आणि माझ्या देशातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी आसुसलेल्या व सर्वस्व अर्पण करण्यास तयार असलेल्या हजारोहजार अगदी सामान्य भारतीयांचा हुंकार…इथे अनुभवायला मिळाला तो मी पणाचा (अहं भावाचा ) त्याग,अण्णा वगळता ना कोणाचा जयजयकार,ना जात,ना धर्म,ना फोटोत चमकण्याची धडपड,ना रेटारेटी,ना दंगाधोपा – फक्त देशासाठी रस्त्यावर उतरलेल्या सामान्य नागरिकांच्या शक्तीचा अद्वितीय आविष्कार होता….
एक धगधगते यज्ञकुंड,ज्यात माझी समिधा पडावी यासाठी तडफडणारे सर्व वयोगटातील नागरिक
प्रत्येक आंदोलन,उपोषण,मोर्चा,कॅंडल मार्च,धरणे,बाईक रॅली आणि अगदी आनंदोत्सव सुद्धा उत्स्फूर्त,डोळ्यातील अश्रू ही नैसर्गिकच = १६ ऑगस्ट ला सुरु झालेले आंदोलन २०१२ मधे दिल्लीतील नृशंस निर्भया प्रकरणात टिपेले पोहोचले आणि पुणेकरांना पुणेकरांनी स्वातंत्र्यसमरात दिलेल्या योगदानाची जणु चुणुकच अनुभवायला मिळाली….
माझ्या संघर्षपूर्ण सामाजिक राजकीय प्रवासात शेकडो आंदोलने उभारली पण ह्या आंदोलनात सहभागी होवून अग्रेसर होण्याची संधी मला लाभली हे माझे भाग्यच / किंबहुना अश्या चळवळींनी माझे जगणे समृद्ध केले…
संदीप खर्डेकर
पुणे. मो – ९८५०९९९९९५