पुणे – आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांचा संभाव्य कार्यक्रम “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब)ने जाहीर केला असून याप्रमाणे महाराष्ट्रात ३ टप्प्यात मतदान होण्याची शक्यता असून लोकसभेसाठी पहिला टप्प्यात २८ एप्रिलला मतदान घेण्यात येऊ शकते तर ५ आणि १२ मे मध्ये अनुक्रमे दुसरया व तिसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. या संभाव्य लोकसभा निवडणुकांची घोषणा निवडणूक आयोगाकडून ७ ते १२ मार्च २०१९ दरम्यान होणाची संभावना असून नामनिर्देशन पत्र पहिल्या टप्प्यासाठी १५ एप्रिल २०१९ तर दुसर्या टप्प्यासाठी २१ एप्रिल २०१४ पासून उपलब्ध होऊ शकणार आहे. देशात एकूण ९ टप्प्यात निवडणुका घेण्यात येतील व अंतीम मतदानानंतर २६ अथवा २८ मे २०१९ रोजी मतमोजणी देशभरातील सर्व मतदारसंघातील एकत्रितपणे होऊ शकणार असल्याचे “प्राब’’ने म्हटले आहे. संभाव्य निवडणुक कार्यक्रमानुसार इच्छूकांना लोकसभा निवडणुकांची पूर्वतयारी करण्यासाठी केवळ ८० दिवस उरले आहेत. सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश एका लोकसभा मतदारसंघात असल्याने व्यापकतेनुसार मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी कल्पक व अत्याधुनिकीकरण सुविधांचा वापर करावा लागणार आहे. लोकसभा निवडणुकांची उमेदवारांनी पुर्वतयारी करणे शक्य व्हावे. याकरीता वेळेचे काटेकोरपणे नियोजन करण्याकरीता या संभाव्य निवडणुक कार्यक्रमाचा उपयोग निवडणुक लढविणा-यांना होणार असल्याचे “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब)चे अध्यक्ष चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले. वरील निवडणुक कार्यक्रम संभाव्य म्हणून सुनियोजित करण्यात आला असून यामध्ये निवडणुक आयोगाचा अंतिम कार्यक्रम ग्राह्य धरावा असे आवाहनही संस्थेने केले आहे. “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’ ही राजकीय क्षेत्रातील नामवंत सल्लागार संस्था आहे. राजकीय क्षेत्रात शिक्षण व प्रशिक्षण देणारी पहिली सर्वेक्षण व अॅनालिसेस करून देणारी एकमेव संस्था असून गेली २५ वर्षापासून देशभरात कार्यरत आहे. प्रामुख्याने महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक, गोवा, उत्तरप्रदेश, मणिपूर, केरळ या राज्यांमध्ये निवडणूकांचा प्रदिर्घ अनुभव आहे. नगरपरिषद, महानगरपालिका, जिल्हापरिषद, विधानसभा, लोकसभा, आदी निवडणूकांकरीता मतदारांमध्ये प्रबोधनात्मक उपक्रमाबरोबरच निवडणूक विषयक सर्व सल्ला व सेवा पुरविण्यात येतात. “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब) ही अचूक सर्वेक्षण अंदाज वर्तविणारी एकमेव विश्वसनीय संस्था आहे. कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधिलकी नसून संपूर्णपणे व्यावसायिक व सामाजिकतेची जाण असणारी संस्था आहे. अचूक सर्वेक्षण अंदाज, निवडणूक पुर्वतयारी, प्रचार तंत्र व मंत्र निवडणूक विश्लेषण, निवडणूक रणनिती, निवडणूक आचार संहिता, निवडणूक प्रशिक्षणाबरोबरच सुदृढ लोकशाही निर्माण करण्यासाठी विविध प्रबोधनात्मक उपक्रम राबविले जातात. जनजागृती अभियानाबरोबरच निवडणूक विषयावर विविध स्वरूपाची प्रबोधनात्मक २१ पुस्तके प्रकाशित करण्यात आली आहेत. राजकीय क्षेत्रातील लोकप्रतिनिधीना व मान्यवरांना यश संपादन करण्यासाठी अचूक सर्वेक्षण अंदाज व निवडणूक रणनिती वर्तविण्यात संस्थेने प्राविण्य मिळविले आहे. निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही… सेवा उपलब्ध करून देणारी “पॉलिटिकल रिसर्च अॅण्ड अॅनालिसेस ब्युरो’’(प्राब) ही एकमेव विश्वसनीय संस्था आहे.
लोकसभा निवडणुकांचा संभाव्य निवडणुक कार्यक्रम असा असू शकेल कारण…..
लोकसभा मुदत- 4 जून २०१४ ते ३ जून २०१९ कालावधी आहे. ३ जून २०१९ पर्यंत १७ वी लोकसभा अस्तित्वात येणे अपेक्षित आहे.
११ जानेवारी २०१९ ला अंतिम मतदारयादी जाहीर होणार आहे ही यादीच लोकसभा निवडणुकांसाठी ग्राह्य असणार आहे.
लोकसभा निवडणुकांची महाराष्ट्रात आयोगाकडून तयारी /आवश्यक सुविधांसाठी निविदा प्रक्रिया सुरु.
अर्थसंकल्पीय अधिवेशन व दहावी बारावीच्या परीक्षांचा कालावधीनंतरच निवडणुकांची घोषणा होऊन आचारसंहिता लागू होईल.
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 18 फेब्रुवारीऐवजी 25 फेब्रुवारी 2019 पासून होणार आहे. ते ८ दिवस कामकाज पार पडेल. अंतिम अर्थसंकल्प जूनमध्ये आचारसंहिता संपल्यावर मांडण्याची शक्यता.
गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची लेखी परीक्षा आहे.
शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा आहे.
सीबीएसई बोर्डाच्या 12वी ची परीक्षा 15फेब्रुवारी पासून 3 एप्रिल दरम्यान होणार आहे.
सीबीएसई बोर्डाच्या दहावीची परीक्षा ही 21 फेब्रुवारी ते 29 मार्चपर्यंत असणार आहे.
असे होइल महाराष्ट्रात मतदान…..
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे.
पुणे, नगर, कोल्हापूरमध्ये ५ मे तर मुंबई, ठाणे, रायगडमध्ये १२ मे रोजी मतदान होण्याची शक्यता-
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघांसाठी एप्रिल महिन्यातील अखेरच्या आठवड्यातील रविवार व मे महिन्यातील पहिला व दुसरा रविवार म्हणजे २८ एप्रिल तसेच ५ व १२ मे २०१९ अशा तीन टप्प्यांमध्ये मतदान होण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात विदर्भातील सर्व १० मतदारसंघांतील मतदान घेण्यात येऊ शकते तर मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील १९ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यात मतदान होऊ शकेल. तिसऱ्या आणि अंतिम टप्प्याच्या मतदानात मुंबई-कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील १९ मतदारसंघांचा समावेश असू शकेल.
खालील लोकसभा मतदारसंघात पहिल्या टप्प्यात २८ एप्रिल २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
५) बुलडाणा ६) अकोला ७) अमरावती ८) वर्धा ९) रामटेक १०) नागपूर ११) भंडारा-गोंदिया १२) गडचिरोली-चिमूर १३) चंद्रपूर १४) यवतमाळ-वाशीम
खालील लोकसभा मतदारसंघात दुस-या टप्प्यात ५ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१५) हिंगोली १६) नांदेड १७) परभणी ३३) मावळ ३४) पुणे ३५) बारामती ३६) शिरूर ३७) अहमदनगर ३८) शिर्डी ३९) बीड ४०) उस्मानाबाद ४१) लातूर ४२) सोलापूर ४३) माढा ४४) सांगली ४५) सातारा ४६) रत्नागिरी-सिंधुदुर्ग ४७) कोल्हापूर ४८) हातकणंगले
खालील लोकसभा मतदारसंघात तिस-या टप्प्यात १२ मे २०१९ रोजी मतदान होऊ शकेल-
१) नंदूरबार २) धुळे ३) जळगाव ४) रावेर १८) जालना १९) औरंगाबाद २०) दिंडोरी २१) नाशिक २२) पालघर २३) भिवंडी २४) कल्याण २५) ठाणे २६) मुंबई उत्तर २७) मुंबई वायव्य २८) मुंबई ईशान्य २९) मुंबई उत्तर-मध्य ३०) मुंबई दक्षिण-मध्य ३१) मुंबई दक्षिण ३२) रायगड
16 व्या लोकसभेचा कार्यकाल ३ जून २०१९ रोजी संपत असल्याने त्यापूर्वी निवडणुका होऊन नवे सरकार अस्तित्वात येणे आवश्यक आहे. त्यानुसार केंद्रीय निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीची तयारी करीत आहे. निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताना प्रत्येक राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, राज्याचे क्षेत्रफळ, मतदारसंख्या, नक्षलवादाची समस्या, अशा अनेक पैलूंचा विचार करण्यात येत असतो. लोकसभा निवडणुकांची उमेदवारांनी पुर्वतयारी करणे शक्य व्हावे. याकरीता वेळेचे काटेकोरपणे नियोजन करण्याकरीता या संभाव्य निवडणुक कार्यक्रमाचा उपयोग निवडणुक लढविणा-यांना होऊ शकेल. वरील निवडणुक कार्यक्रम संभाव्य म्हणून सुनियोजित करण्यात आला असून यामध्ये निवडणुक आयोगाचा अंतिम कार्यक्रम ग्राह्य धरावा असे आवाहनही “प्राब”संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
राज्यात लोकसभेच्या 48 जागा-
2014 मधील लोकसभा निवडणुकीत भाजपा – शिवसेना युतीने राज्यातील 48 पैकी 41 जागांवर विजय मिळवला होता. मात्र, पोटनिवडणुकांनंतर 48 पैकी 22 जागा भाजपाकडे आहेत. तर शिवसेना 18, राष्ट्रवादी काँग्रेस 5, काँग्रेस 2 आणि स्वाभिमान पक्षाकडे एक जागा आहे.
शिवसेनेकडून भाजपला झुकवण्याचे प्रयत्न !
२००९ पर्यंत राज्यात शिवसेना १७१ आणि भाजप ११७ जागा लढवत आली होती. मात्र २०१४ मध्ये लोकसभेसाठी युती केल्यानंतर विधानसभेसाठी शिवसेनेने १५१, भाजप ११९ व मित्रपक्ष १८ असा फॉर्म्युला भाजपपुढे ठेवला होता. परंतु तो भाजपने अमान्य केला होता. त्यानंतर मित्रपक्षांना सोडलेल्या १८ जागांपैकी ११ जागा भाजपला, तर ७ जागा मित्रपक्षांना असा शिवसेना १५१, भाजप १३० आणि मित्रपक्ष ७ असा फॉम्युर्ला शिवसेनेने दिला होता. मात्र मित्रपक्षांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा इशारा दिला. तेव्हा भाजपनेही युती तोडली होती. मात्र भाजप स्वबळावर १२२ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष ठरला. तर मोदी लाटेतही शिवसेनेने ६३ आमदार निवडून आणले होते. २०१९ च्या निवडणुकीसाठी भाजप आता युतीचे सूतोवाच करू लागली असली तरी शिवसेना आता भाजपपुढे न झुकता भाजपलाच झुकवण्याकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. सध्या भाजपकडे १२१ तर शिवसेनेकडे ६३ आमदार आहेत. दोघांचेही विद्यमान आमदार १८४ आहेत. ते वगळता १०४ जागा शिल्लक राहतात. त्यापैकी ८५ जागा शिवसेना भाजपकडे मागत आहे. परंतु त्यांची बेरीज १४८ पर्यंत जाते. या जागा भाजप शिवसेनेला देऊ शकत नाही. मात्र, ७५ जागा शिवसेनेला देण्यासाठी भाजप तयार आहे. त्यामुळे १३८ जागांवर शिवसेना युतीसाठी तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजेच भाजपच्या वाट्याला १५० जागा येतील. शिवसेना आणि भाजपमध्ये युती संदर्भात चर्चा सुरू आहे. शिवसेनेने दोन मागण्या भाजपसमोर ठेवल्या आहेत. एक म्हणजे लोकसभेसोबतच विधानसभा निवडणूक घ्यावी आणि दुसरी मागणी म्हणजे १५५ जागा द्याव्या.
लोकसभेला मताधिक्य मिळवून दिले तरच आमदारकीची उमेदवारी- मुख्यमंत्र्यांचे धोरण
लोकसभा निवडणुकीत प्रत्येक आमदाराने आपापल्या तालुक्यातून किती मताधिक्य मिळवून दिले यावरच पुढील राजकीय गणिते अवलंबून असतील अशी मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे. जो आमदार त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य (लीड) देणार नाही त्यांना आमदारकीची उमेदवारी द्यायचे की नाही ते ठरवले जाईल. एक तर काम करा अन्यथा उमेदवारीची आशा सोडा. येणा-या निवडणुकीत भाजपला 2 कोटी मते मिळाली पाहिजेत. त्यासाठी नियोजन करून समाजातील विविध वर्गांना पक्षाशी जोडून घ्या. असे झाल्यास आपण स्वबळावर बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच व्यक्त केला आहे.
लोकसभेसाठी शिवसेना व भाजप इच्छुक नेते संभ्रमात!
शिवसेनेसोबत युती होणार नाही असे गृहित धरून 2014 साली शिवसेनेने जिंकलेल्या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या अनेक नेत्यांना लोकसभेची तयारी करण्याची सूचना पक्षाने यापूर्वीच दिल्या आहेत. मात्र, शिवसेनेसोबत युती होणार नाही हे खुद्द पक्षाध्यक्ष अमित शहा व मुख्यमंत्र्यांनाच माहित नाही. या पार्श्वभूमीवर लोकसभेची तयारी स्वबळासाठी करायची की युतीसाठी असा संभ्रम अनेक इच्छुकांत आहे.
निवडणुकीपूर्वी भाजपाच्या अंतर्गत सर्वेक्षण – :
आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती केली तरी दोन्ही पक्षांना मिळून 30 ते 34 जागा मिळतील. भाजपाने लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवली तर 15 ते 18 जागाच मिळतील. तर शिवसेनेला पाच ते आठ जागा मिळतील तर काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडीला 22 ते 28 जागा मिळतील असा अंदाज यात वर्तवण्यात आला होता. दरम्यान लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांतील आघाडीसंदर्भात शिवसेनेने घेतलेली ताठर भूमिका, रोजच्या रोज शिवसेनेकडून भाजपच्या केंद्रीय नेतृत्वावर केली जाणारी टोकाची टीका, शिवसेनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नरमाईचा पवित्रा या पार्श्वभूमीवर शिवसेनेची उपयुक्तता आणि या पक्षाची संभाव्य रणनीती यावरही पक्ष खासदारांची मते पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी जाणून घेतली. भाजपच्या सर्व राज्यांमधील खासदारांच्या स्वतंत्र आढावा बैठका घेण्याचे नियोजन केले आहे. जानेवारी अखेरपर्यंत वाट बघू. कारण लोकसभा निवडणुकीची आचारसंहितेची लागू होण्यास अवघे काही दिवस उरले आहेत. त्यामुळे जानेवारीनंतर निर्णय घ्यावा लागेल, अशी रणनीती भाजपने ठरविली आहे. सन २००९च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने ११९ जागा लढविल्या होत्या. त्यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये भाजप ११७ आणि शिवसेना १७१ असे जागांचे वाटप होत असे. नऊ आकडा युतीला लाभदायक असल्याने असे आकडे ठरले होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आणखी दहा-बारा जागा जास्त मागितल्या होत्या . शिवसेनेने याआधी एकदाही न जिंकलेल्या अशा ३५ जागा त्यामध्ये होत्या. त्यातील दहा किंवा बारा जागा द्याव्यात, अशी भाजपची मागणी होती. परंतु त्या जागा देण्यास शिवसेनेच्या नेतृत्वाने नकार दिला आणि त्यामुळे युती तुटली होती. त्या जागा भाजपला दिल्या असत्या तर आज शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता हे सत्य कोणीही नाकारत नाही.परंतु आता परिस्थितीत खूप फरक पडला आहे.
भाजपची निवडणूक तयारी-
मतदार नोंदणी मोहिमेत राज्यात ३६ लाख नव्याने मतदारांची नोंदणी
लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाने पुढील दोन महिन्यांत अनेक कार्यक्रम ठरविले आहेत.
11 व 12 जानेवारीला दिल्लीत खासदार, आमदार आणि पक्षाच्या पदाधिकार्यांचे संमेलन
दोन महिन्यांतील निवडणूक तयारीची सांगता 2 मार्चला राज्यभर रॅली काढून होणार
सीएमचषकमधून 42 लाख तरुणांची नोंदणी
दोन कोटी मते मिळविण्याचे लक्ष्य
2014 च्या निवडणुकीत पक्षाला दीड कोटी मते (122 जागा)मिळाली होती
राज्यात मतांचा टक्का वाढविण्यासाठी आणि अतिरिक्त 50 लाख मते मिळविण्यासाठी विविध समाजघटकांना सोबत जोडण्याचा कानमंत्र
मतदान केंद्र(बुथ) निहाय १० कार्यकर्ते नोंदणी व प्रशिक्षण पूर्ण
लोकसभा व विधानसभा निहाय राजकीय व सामाजिकदृष्ट्या सर्वेक्षण
विविध स्पर्धा, उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची मतदारांपर्यंत पोहोचविण्याची मोहीम
भाजपकडून लोकसभा व विधानसभा निवडणूक प्रचार संकल्पना/साधने तयारी पूर्ण
भाजपच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.
राष्ट्रवादी निवडणूक तयारी-
राज्यभर राष्ट्रवादीने हल्लाबोलच्या माध्यमातून भाजपा सरकार विरोधी अभियान राबविले होते.
९ जानेवारीपासून राष्ट्रवादीची राज्यभर ‘परिवर्तन यात्रा’
विजयी संकल्प मेळाव्याचे राज्यभरात आयोजन केले होते.
मतदान केंद्र(बुथ) निहाय कार्यकर्ते (बुथ एजंट) निवड/नोंदणी अभियान
नागरिकांच्या माध्यमातून निवडणूक जाहीरनामा संकल्पना
केंद्र सरकारच्या विरोधात काही मुद्यांवर आंदोलने व निदर्शने केली
राष्ट्रवादीच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.
काँग्रेस निवडणूक तयारी-
काँग्रेसकडून राज्यभरात जनसंघर्ष यात्रेचे आयोजन केले होते
कार्यकर्त्यांच्या खचलेल्या मन:स्थितीला उभारी देण्याकरिता संकल्प मेळावे घेतले होते.
मतदान केंद्र(बुथ) निहाय कार्यकर्ते (बुथ एजंट) निवड/नोंदणी अभियान
केंद्र व राज्य सरकारच्या विरोधात विविध मुद्दे वरून वेळोवेळी आंदोलने व निदर्शने केली होती.
काँग्रेसच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.
शिवसेनेची निवडणूक तयारी-
वेळोवेळी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करण्याच्या आमदार/खासदारांना फक्त सूचना
जिल्हाध्यक्ष/संपर्क प्रमुखांकडून मतदारसंघातील राजकीय आढावा व त्या आधारे रणनीती
लोकांमधून निवडून न आलेल्या लोकप्रतिनिधीच्या संकल्पनेतून पक्षबांधणी व योजना
मतदान केंद्र(बुथ) निहाय बुथ एजंट नोंदणी अभियान
केंद्र व राज्य सरकारमधील सहभाग आणि विरोधी टीकात्मक भूमिका/प्रचार रणनीतीवर खल सुरूच
शिवसेनेच्या निवडणूक तयारीतील अभाव जाणून घेण्यासाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.
भाजप-शिवसेना युतीबाबत मान्यवरांनी व्यक्त केलेल्या भूमिका-
युतीसाठी शिवसेनेच्या प्रतिसादाची वाट पाहणार, पण झुकणार नाही- भाजप अध्यक्ष अमित शाह
काहीतरी गमावून शिवसेनेसोबत युती नाही/महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या सर्व 48 जागांवर लढण्याची भाजपची तयारी-भाजप अध्यक्ष अमित शाह
आपण स्वबळावर बहुमताने पुन्हा सत्तेत येऊ शकतो- मुख्यमंत्री
शिवसेनेसोबत युती करण्याचे आपले प्रयत्न सुरू मात्र, युती झाली नाही, तर स्वबळावर लढण्याची आपली तयारी – मुख्यमंत्री
शिवसेनेचा युती करण्याचा विचार नाहीच- खासदार संजय राऊत
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे युतीचा प्रश्नच उद््भवत नाही- खासदार संजय राऊत
युतीसाठी मने जुळली, फक्त त्यासाठीची चर्चा अद्याप बाकी- अर्थमंत्री मुनगंटीवार
लोकसभेच्या जागांची बोलणी करतानाच विधानसभेचेही जागावाटप व्हावे यादृष्टीने प्रयत्न सुरू असून लोकसभेच्या जागा वाटपाचा विषय एक कप भर चहाच्या मिटींगमध्ये संपेल-मुनगंटीवार
विविध पक्ष व नेत्यांनी युतीबाबत व्यक्त केलेल्या भूमिका अधिक माहितीसाठी प्राब संस्थेशी संपर्क करा.
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी चर्चा
काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडीवर सहमती मात्र काही जागांचा घोळ कायम
जागावाटपाची राज्यस्तरीय चर्चा आता संपली असून पुढील अंतिम निर्णय आता दिल्लीत होणार
आघाडीचा घटक पक्षांनाही सामावून घेण्याचा प्रयत्न;घटक पक्षांनाही जागा सोडणार
काँग्रेसचा २००९ च्या सूत्रानुसार जागा वाटपावर भर आहे. मात्र राष्ट्रवादीने २०१४ मधल्या वाढलेल्या ताकदीच्या अनुषंगाने जोर लावला आहे. घटकपक्षांना जागा सोडण्याची दोन्हीही पक्षांची तयारी आहे.
घटकपक्षांना जागा सोडण्याची काँग्रेस-राष्ट्रवादीची तयारी –
बहुजन विकास आघाडीला-पालघर लोकसभा मतदारसंघ
समाजवादी पार्टीला-भिवंडी लोकसभा मतदारसंघ
स्वाभिमानी शेतकरी संघटनेला-हातकणंगले लोकसभा मतदारसंघ
भारिप बहुजन महासंघाला-अकोला लोकसभा मतदारसंघ
आरपीआय गवई गटाच्या राजेंद्र गवईं यांना एक लोकसभा मतदारसंघ देण्याची भूमिका
नारायण राणेंच्या स्वाभिमान पक्षाला- सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ (राणेंना छुपी मदत करण्याची भूमिका/भाजपच्या कोट्यातून राज्यसभेवर गेलेल्या राणें यांची प्रसंगी भाजपशी पंगा घेण्याची तयारी)
महा-आघाडीबाबत प्रमुख घटक पक्षांची मागणी व भूमिका-
एमआयएमची व भारिप बहुजन महासंघाची बहुजन वंचित आघाडी स्थापन
राष्ट्रवादीशी आघाडीस असहमत; कॉंग्रेसबरोबर आघाडीची तयारी ११ जागांची भारिपची मागणी;एमआयएमची साथ सोडण्याची कॉंग्रेसची अट अमान्य
एक जागा नव्हे किमान ६ हव्यात नाहीतर स्वबळावर लढणार- खासदार राजू शेट्टीं (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
शिवसेनेशी युती केली तर खासदारकीचा राजीनामा/ स्वबळावर लढणार- खासदार नारायण राणे (स्वाभिमान पक्ष)
कॉंग्रेसने योग्य जागा द्याव्यात अन्यथा इतरांशी आघाडी/बहुजन वंचित आघाडीतही जाण्याची तयारी- राजेंद्र गवईं (आरपीआय गवई गट)
मुंबईतून निवडणूक लढविणार- केंद्रीयमंत्री आठवले (आरपीआय आठवले गट)
बारामतीतून अथवा कोठूनही निवडणूक लढविणार- मंत्री महादेव जानकर (रासप)
हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार- राज्य कृषीमंत्री सदाभाऊ खोत(रयत क्रांती संघटना)