गेल्या सव्वा वर्षांच्या दरम्यान घरगुती कलहाच्या तीन हजारांपेक्षा जास्त प्रकरणे दाखल
पुणे- लॉकडाऊन दरम्यान घरांमध्ये राहणाऱ्या पतीचा लॉकडाऊनमुळे यापूर्वीच्या तुलनेत पत्नींकडून छळ होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहे.कौटुंबिक वादात या छळाची प्रकरणे वाढल्याची माहिती पुणे पोलिसांच्या भरोसा सेल ने दिली आहे .भरोसा सेलच्या महिला सहाय्य कक्षाच्या म्हणण्यानुसार , या काळात पूर्वीपेक्षा जास्त संख्येने पुरुष हि तक्रार करण्यास पुढे आले.लॉकडाऊनच्या एका पहिल्या वर्षात एकूण २०७४ जणांनी पुण्याच्या भरोसा सेलमध्ये कौटुंबिक वादाची तक्रार दाखल केली होती. यामध्ये पुरुषांची संख्या 791 होती, तर महिलांची संख्या १२८३ होती. लॉकडाऊनच्या दुसऱ्या म्हणजे २०२१ या वर्षातील पहिल्या चार महिन्यात ९९५ तक्रार अर्ज आले ,त्यांत ७२९ स्त्रिया आणि २६६ पुरुषांचा समावेश आहे. एकूणच मागील काळातील आकडेवारी पाहता पूर्वीच्या तुलनेत आता पुरुष देखील आपल्या सौभाग्यवती च्या विरोधात तक्रार करण्यास पुढे येताना वाढल्याचे दिसत आहे
गेल्या सव्वा वर्षांच्या दरम्यान घरगुती कलहाच्या तीन हजारांपेक्षा जास्त केस दाखल झाल्या आहेत. यामध्ये जास्तीत जास्त केस मारहाण, शारीरिक आणि मानसिक छळाच्या आहेत. काही तक्रारींमध्ये हा दावाही करण्यात आला आहे की, त्यांच्या पत्नी भांडणे करुन मुलांना घेऊन आपल्या माहेरी गेलेल्या आहेत आणि आता त्या परत सासरी येण्यास नकार देत आहेत .
घरात राहिल्यामुळे लोकांमध्ये वाढत आहे मानसिक तणाव
महिला सहाय्य कक्षाच्या म्हणण्यानुसार ,24 तास बंद खोलीत राहत असल्यामुळे लोकांमध्ये मानसिक तणाव वाढत आहे. पती-पत्नी, छोट्या-छोट्या गोष्टींमुळे भाडत आहेत. आम्ही अशा लोकांना येथे बोलावून किंवा मग ऑनलाइन माध्यमातून त्यांची काउंसिलिंग करुन समजूत घालण्याचा प्रयत्न करतो.
पुण्यात 2 वर्षांपूर्वी स्थापन झाले भरोसा सेल
पुण्याच्या भरोसा सेलची स्थापना 9 जानेवारी 2019 ला झाली होती. याचा हेतू लहान मुले, वयस्कर आणि महिलांना शक्य ती मदत करणे आहे. सेलसंबंधीत पोलिस कर्मचारी घरगुती हिंसा, कलहासंबंधीत प्रकरणांमध्ये महिला किंवा पुरुषांची काउंसिलिंगही करतात.सेलचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली भरोसा सेल चे काम सध्या सुरु आहे.