मुंबईच्या राजभवनात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी अजित पवार एकटेच याठिकाणी दिसले. तर भाजपचे अनेक नेते येथे उपस्थित होते. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्राला एक स्थिर सरकार देण्याची गरज होती, यासाठी मी अजित पवारांचे अभिनंदन करतो आणि त्याबीचे आभार मानतो की, त्यांनी हा निर्णय घेतला. राज्यपालांकडे आम्ही सरकारच निर्मितीचा दावा केला आणि त्यानंतर राज्यपालांनी नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करून आम्हाला शपथ घेण्यासाठी आमंत्रण दिले. आमच्या मित्रपक्षाने मी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा आभारी आहे कि, त्यांनी आम्हाला पुन्हा जनतेची सेवा करण्याची संधी दिली. सध्या शेतकऱ्यांची समस्या सर्वात मोठी आहे. महाराष्ट्राच्या हिताकरिता हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. राज्यपाल आम्हाला वेळ देतील त्यावेळेत आम्ही आमचे बहुमत सिद्ध करू. त्यानंतर योग्यवेळी मंत्रिमंडळाची स्थापनाही होईल.”
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार म्हणाले, “आजपर्यंत कोणताही पक्ष सरकार स्थापन करू शकला नाही, महाराष्ट्राला शेतकरी प्रश्नांसह अनेक अडचणींचा सामना करावा लागला, म्हणून आम्ही एक स्थिर सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.”