मुंबई :- माध्यमतज्ज्ञ अभिनंदन थोरात यांच्या निधनाने हसतमुख, मनमिळाऊ, उपक्रमशील व्यक्तिमत्व हरपले आहे. त्यांनी राजकीय विश्लेषक आणि माध्यमतज्ज्ञ म्हणून केलेले काम कायम स्मरणात राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
उपमुख्यमंत्री शोकसंदेशात म्हणतात, अभिनंदन थोरात यांनी माध्यम क्षेत्रात विविध प्रयोग करून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. ‘चिंतन एसएमएस सेवा’ सुरू करून राज्यभर जनसंपर्क निर्माण केला होता. त्यांनी सुरू केलेली ‘चिंतन वृत्तसेवा’ सर्वपक्षीय राजकीय नेते, पत्रकार आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांत लोकप्रिय ठरली होती. राजकीय आणि माध्यम क्षेत्र यांच्यातील संपर्क दुवा म्हणून त्यांनी कायमच महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या निधनाने हा दुवा निखळला आहे. त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती मिळावी, असेही त्यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.