आरबीआयने ईएमआय पेमेंटमध्ये 3 महिन्यांची सवलत दिली; रेपो रेटमध्ये 0.75% कपात, कर्ज होतील स्वस्त

Date:

मुंबई – लॉकडाऊनमुळे लोकांना अडचणी होऊ नये यासाठी आरबीआयने कर्जाच्या पेमेंटमध्ये दिलासा देण्याचा आणि कर्ज स्वस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. मुदतीच्या कर्जाच्या हप्ता भरतीत तीन महिन्यांची सवलत देण्यात आली आहे. रेपो रेटमध्येही 0.75% कपात केली आहे. यामुळे सर्वप्रकारचे कर्ज स्वस्त होतील. या रेपो दरावरच बँकांना आरबीआयकडून कर्ज मिळते. जर बँकांना स्वस्त कर्ज मिळाले तर ते देखील ग्राहकांसाठीचे दर कमी करतील. यापूर्वी रेपो रेट 5.15% होता, आता तो 4.40% आहे.

आरबीआयचे 5 मोठे निर्णय

> 1. रेपो रेटमध्ये 0.75% कपात

परिणाम : सर्व कर्ज स्वस्त होतील

> 2. मुदतीच्या कर्जाची परतफेड करण्यासाठी तीन महिन्यांची सूट

परिणाम : ग्राहक आणि बँकांना दिलासा मिळले.

3. कार्यरत भांडवलावरील व्याजाची रक्कम तीन महिन्यांकरिता पुढे ढकलली

परिणाम : कंपन्यांना दिलासा मिळेल.

> 4. कॅश रिझर्व्ह रेशोत 1% कपात

परिणाम : बँकांकडे अधिक कॅश असेल.

5. रिझर्व्ह बॅंकेच्या निर्णयामुळे यंत्रणेतील 3.74 लाख कोटींची रोकड वाढेल

ईएमआयमध्ये तीन महिन्यांच्या सवलतीचा अर्थ काय?

ईएमआयमध्ये सूट दिल्याचा अर्थ असा नाही की आपल्याला कधी थकबाकी भरावी लागणार नाही. फक्त तीन महिने पुढे ढकलू शकता. मात्र नंतर पैसे द्यावे लागतील. लॉकडाऊनमुळे ज्यांच्याकडे खरोखरच पैशांची कमतरता आहे, त्यांना कर्ज फेडण्यासाठी थोडा वेळ मिळावा या उद्देशाने हे पाऊल उचलले गेले आहे. तज्ञांचे मत आहे की पगारदार किंवा ज्यांच्याकडे पुरेशी रोख रक्कम आहे त्यांनी वेळेवर ईएमआय भरावा, अन्यथा त्यांच्यावरच ईएमआयचे ओझे वाढेल.

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पहिल्या दिवशीच एकानेही भरला नाही उमेदवारी अर्ज

पुणे- एकीकडे विरोधकांची बलस्थाने असलेले ,किंवा निवडून येऊ शकणारे...

5 लाखांची लाच घेताना जीएसटी अधिकाऱ्याला अटक:सीबीआयने ठोकल्या बेड्या, घरात 18 लाखांची रोकड सापडली

मुंबई-मुंबईच्या सीजीएसटी कार्यालयाचे अधीक्षक एका खाजगी कंपनीच्या संचालकाकडून लाचेची...

ठाकरे गटाला आणखी एक धक्का; घाटकोपरमधील डॉ. अर्चना संजय भालेराव यांचा भाजपामध्ये प्रवेश

मुंबई, दिनांक २३ डिसेंबर २०२५ बृह्ममुंबई महानगरपालिकेच्या निवडणूकीच्या आधी १२६,...