पुणे- उद्या दिनांक ६ ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील काही महत्वाच्या राजकीय भूमिकांवर मनसे चे नेते राज ठाकरे यांच्या मुंबईतील कृष्णकुंज या निवास स्थानी जाऊन चर्चा करणार आहेत . आज याबाबत आ. चंद्रकांत पाटील यांनीच हि माहिती माध्यमांना दिली आहे.
मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून भाजपाला शिवसेनेपासून सोडचिठ्ठी मिळाल्यापासून भाजपाचे आगामी निवडणुकीसाठी एकला चलोरे सुरु असले तरी सोबत मनसे येतेय काय ? हा हि विचार काहीसा घोळतो आहेच . पण मनसे चे राज ठाकरे यांनी सुरुवातीपासून सुरु ठेवलेला आणि अंगिकारलेला परप्रांतीयांचा मुद्दा या दोहोतील अडसर बनतो आहे. भाजपा देशातील कोणी कुठेही राहू शकतो व्यवसाय , नौकरी करू शकतो या कॉंग्रेसच्याच विचाराशी ठाम आहे .तर तुमचे राज्य तुम्ही समृध्द करा ना , इथे कशाला उकिरडे करायला येताय ? अशी राज ठाकरेंची भूमिका आजवर राहिली आहे. आता यात एकच मध्य तारा लुक्लुक्तो आहे तो म्हणजे … ८० टक्के भूमिपुत्रांना आपल्या राज्यात नौकरी देताना प्राधान्य दिलेच पाहिजे असा असलेला कायदा राबविणे . आणि याच मुद्द्यावर मनसेची जवळीक भाजपा साधू शकते असे अनेकांना वाटते आहे . आगामी महापालिका निवडणुकीत इतर काही पक्षांप्रमाणेच मनसेकडडेही सर्वच जागांवर उमेदवार लढू शकतील एवढे उमेदवार निश्चित नाही आणि हेच धागे पकडून भाजपा महाराष्ट्रात पुन्हा एकदा स्थानिक मराठी राजकीय पक्षाशी आपली नाळ घट्ट ठेऊ पाहते आहे असा अनेकांचा व्होरा आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर उद्या भाजपचे आ. चंद्रकांत पाटील आणि राज ठाकरे यांची मुंबईतील भेट महत्वाचे पाऊल ठरणार आहे . याबाबत पत्रकार परिषदेत पहा आणि ऐका नेमके काय म्हणाले आ. चंद्रकांत पाटील