मुंबई : पेट्रोलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय नव्याने सत्तेत आलेले शिंदे-फडणवीस सरकार घेणार असल्याची मोठी घोषणा नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. बहुमत चाचणीत शिंदे सरकार उत्तीर्ण झाल्यानंतर अभिनंदन प्रस्तावास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं. केंद्रानंतर काही राज्यांनी व्हॅट कमी केला होता, पण महाराष्ट्राने केला नव्हता. आता नवं सरकार लवकारत लवकर तो निर्णय घेईल, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
एकनाथ शिंदेच्या घरावर दगड मारणारा अजून पैदा झाला नाही -भास्करराव आम्ही गद्दार नाही -सत्तेच्या लालसेपोटी गेलो नाही -आम्ही कालही-आजही- आणि उद्याही शिवसैनिक आहोत : बाळासाहेबांच्या विचाराचे ,दिघेसाहेबांच्या विचाराचे शिवसैनिक आहोत . हिंदुत्वाला विरोध करणाऱ्या , सावकारांवर टीका करणाऱ्या,दाऊदशी कनेक्शन असलेल्यांबरोबर कसे काय बसायचे .. ? असे सवाल करत अजितदादांचे माझे अंडरस्टँँडिंग होते पण माझ्या विभागात खूप लोकांचे हस्तक्षेप होत होते. आमच्या रक्तात गद्दारी नाही ,आम्ही उठाव केला होता ,दादा सहन तरी कुठवर करायचं? मी गद्दार नाहीये दादा, अरे तो निधीवाटप नको ,संपला विषय .५० मधला एकही माणूस निवडणुकीत पडू देणार नाही -भाजपा आणि आम्ही असे आता १६५ आहोत पुढच्यावेळी २०० च्या पुढे निवडून आणू अशा वाक्यातून आपल्या भाषणात धुव्वाधार बॅॅटिंग मुख्यमंत्र्यांनी केली .साले .. च्यायला .. असे शब्द त्यांच्या भाषणात येऊ लागले पहिल्यांदा असे शब्द आले तेव्हा ते सॉरी म्हणाले , पण त्यावर जयंत पाटलांनी येऊ द्दाय जे नैसर्गिक तेच येऊ द्यात असे म्हटले आणि मग त्यांनी आपल्या नेहमीच्या बोली शैलीतच भाषण केले .
माझ्या सोबत आलेल्या 50 आमदारांचे पहिले आभार व्यक्त करतो. मला वाटलं नव्हते, की मी मुख्यमंत्री म्हणून या ठिकाणी बसू शकेल, या ऐतिहासिक घटनेची नोंद 33 देशांनी घेतली की आम्ही सत्तेतून मंत्रीपदे दावावर लावत काही मंत्री आणि आमदार सत्ता आणि यंत्रणेच्या विरोधात बाळासाहेबांच्या सैनिकावर विश्वास ठेवला. 50 आमदारांनी मला काहीच न विचारता मला साथ दिली, बाळासाहेबांनी सांगितले होते अन्यायाविरोधात बंड करायचे, मात्र सगळ्यांनी साथ दिली.
आता माघार घेणार नाही
आमचे बाप काढले, आम्हाला शिवीगाळ करण्यात आली मात्र आम्ही चकार शब्द ही काढला नाही. मात्र ज्या शिवसेनेसाठी मी घर सोडले, घरातील माणसांची भेट होत नव्हती, मात्र शिवसेनेसाठी संघटनेसाठी आयुष्याची 35 वर्षे घालवली. मात्र हे एका क्षणात राऊतांनी टीका करताना हे सगळं विसरले.
15 दिवसांचे केले वर्णन
गेले पंधरा-वीस दिवस सातत्याने माझ्यावर विश्वास ठेवून एवढा मोठा निर्णय त्यांनी घेण्याचे धाडस केले. त्यांचे मी मनापासून अभिनंद करतो. धन्यवाद देतो. मला आताही वाटत नाही, विश्वासही बसत नाही, पण आज या सभागृहामध्ये मुख्यमंत्री म्हणून बोलतोय. कारण आजआपण जर पाहिलं, तर या महाराष्ट्रातल्या अनेक घटना आपण पाहिल्या. लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, नगरसेवक असतील. ते विरोधी पक्षाकडून सत्तेकडे जाण्याची वाटचाल करतात. आज ऐतिहासिक नाट्य राज्य, देश आणि इतर ३३ देश पारहतायत. अशी एवढी मोठी घटना घडलीय. सत्तेमध्ये मी नगरसेवक मंत्री होतो.
माझ्यासोबत इतरही मंत्री होते. स्वतःचे मंत्रिपद दावावर लावून आणि 50 आमदार. एकीकडे बलाढ्य सरकार. सरकारमध्ये समोर बसलेली मोठमोठी माणसे, मंत्री असताना…सत्ता यंत्रणा एकीकडे आणि दुसरीकडे एक कार्यकर्ता, सैनिक. पण तो मात्र बाळासाहेबांचा आणि दिघे साहेबांचा सैनिक. मला अभिमान आहे या पन्नास लोकांचा. यापैकी एकानेही विचारले नाही कुठे चाललोय, कशासाठी चाललोय.
मुख्यमंत्र्यांचा कॉल आला
ज्या दिवशी निघालो, अदल्यादिवशी मी डिस्टर्ब होतो. दुसऱ्यादिवशी मतदान होतो. त्या दिवशी मला जी काही वागणूक मिळाली, त्याचे साक्षीदार आमदार आहेत. मला काय झाले माहिती नाही. बाळासाहेबांनी नेहमी सांगितले होते, अन्याय मागण्यासाठी बंड असे, उठाव असेल. माझे फोन सुरू झाले. लोक येऊ लागले. मुख्यमंत्री महोदयांचे देखील मला फोन होतो. काही लपवू इच्छि नाही. मला विचारले कुठे चालला, माहित नाही. कधी येणार माहिती नाही. यापैकी एकाही आमदारांनी मला मुख्यमंत्री महोदयांना भेटू नये असे म्हटले नाही. हा विस्वास आहे. हा एका दिवसाचा हा कार्यक्रम नाहीय. यामध्ये सुनील प्रभूंना पण माहितीय कसे माझे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला होता.
शहीद झालो तर चालेल
शिवसेना वाचवण्यासाठी लढून शहीद झालो तर चालेल, पण आता माघार नाही…आमदारांना सांगितले होते, तुम्ही चिंता करू नका. ज्या दिवशी तुमचे नुकसान होते, त्या दिवशीय सांगेन. तुमचे भविष्य सुरक्षित करेन. या जगाचा निरोप घेऊन निघून जाईन. एक ग्रामपंचायत सैनिक इकडचा तिकडे जायची हिंमत करत नाही. हे का झाले, कशासाठी झाले हे पाहायला पाहिजे होते.
शिवसेनेसाठी जीवाचे रान केले
एकनाथ शिंदे यांच्या घरावर दगड मारणारा पैदा झाला नाही. मधमशासारखे मोहोळ उठते. 20-25 वर्षे या एकनाथ शिंदेने जीवाचे रान, केले. रक्ताचे पाणी केले. 17 वर्षांचे असताना बाळासाहेबांच्या विचाराने वेडे केले. धर्मवीर आनंद दिघेंची भेट झाली. त्यानंतर वयाच्या 18 व्या वर्षी मी शाखाप्रमुख झालो. मी दिघे साहेबांना सांगितले. त्यांनी खांद्यावर हात टाकला. मी त्यांना सांगितले. सीनियर लोकांना पद द्या. त्यांची एक भाष होती. मला शिवी घातली. मला शिकवतो का…मला शाखाप्रमुख बनवले.
1997 मी नगरसेवक झालो. त्यानंतर काम केले कधीही मागे वळून पाहिले नाही. कुटुंब, घरच्यांचा विचार केला नाही. मी रात्री घरी जायचो. आमचे बाप काढले, कोणी रेडा म्हणाले, कोणी प्रेता काढले. महिला आमदारांना वेश्या म्हणायचे. कुठल्या थराला जायचे. मी शांत असतो. पण जेव्हा अन्याय होतो. त्यावेळी मला शांत राहता येत नाही. माझे काम केसरकरांनी हलके केले. मी आपल्याला सांगतो दादा, बाप काढले. माझे वडील जिवंत आहेत.
मला एकदा उद्धव साहेबांनी फोन केला होता. आईला सांगितले. आई बोलली. आई साधीय. तिने सांगितले..माझ्या बाळाला सांभाळा. तिच्यासाठी मी बाळचय. माझे वडील कष्ट करून पुढे आणले. मी घरी जायचो आई-वडील झोपलेले असायचे. पंधरा दिवसांनी भेट व्हायची. हेच श्रीकांत सोबत झाले. त्याला बाप म्हणून वेळ देऊ शकलो नाही. मी शिवसेनेला कुटुंब मानले. माझी दोन वेळे मेली. त्यावेळेस मला आधार दिला आनंद दिघे साहेबांनी.
मुख्यमंत्री झाले भावूक
माझी तेव्हाची परिस्थिती कशासाठी जगायचे अशी होत. माझे आता काही राहिले नाही. आनंद दिघे माझ्याकडे एकदा-दोनदा पाचवेळा आले. त्यांना मी नाही उभा राहू शकत असे सांगितले. त्यांनी मला एकदा रात्री बोलावले. एकनाथ तू नाही म्हणू नकोस. तुझ्या डोळ्यातले अश्रू पुसावे लागतील. अन् दुसऱ्याच्या डोळ्यात येऊ नये यासाठी प्रयत्न करावा लागेल. बाळासाहेब, दिघे साहेब माझे दैवत होते. त्यांनी मला सभागृह नेता बनवले.
मी अनेक लेडीज बार बंद केले
जितेंद्र आव्हाड दुसऱ्या पक्षात होते, तेव्हा त्यांना माहित होते, एकनाथ शिंदे वेड्यासारखा कामाला लागलाय. माझ्या पाठिशी दिघे साहेब होते. काही भीती नव्हते. त्यावेळेस लेडीज बारचा सुळसुळाट होता. पोलिसांना खूप प्रयत्न केला. मी सोळा लेडीज बार स्वतः तोडणारा हा एकनाथ शिंदे आहे. माझ्यावर शंभर पेक्षा जास्तीच्या केसेस आहेत. हायकोर्टात माझ्याविरोधात पिटीशन दाखल झालो. त्यावेळेस मुंबईत गँगवॉर सुरू होतं. त्यावेळी ठरलं या एकनाथ शिंदेला ठार करायचा. त्यावेळी दिघे साहेबांनी काही अधिकाऱअयांना बोलावले. एकनाथला काही झाले तर. काही खैर नाही. मी आंदोलन केली. शिवसेना वाढवली. माझ्यासोबत जिवाला जीव देणारे कार्यकर्ते होते. ते कशाचीही पर्वा करायचे नाहीत. असे करताना धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा मृत्यू झाला. त्यावेळेस मी साफ कोलमडून गेलो. मात्र, ही कोलमडून जाण्याची वेळ नाही.
एक दिवसांचे हे बंड नाही
अडीच वर्षांत आम्हाला जे अनुभव आला त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला. अडीच वर्षांत एकदाही सावरकरांबाबत आम्हाला बोलता आले नाही. काँग्रेसने सावरकरांचा अपमान केला तेव्हाही आम्हाला काँग्रेसचा विरोधात भूमिका घेता आली नाही, कारण आम्ही सत्तेत एकत्र होतो हे सगळं साचलेल्या गोष्टींमुळे आमदार एकत्र येत त्यांनी अन्यायाविरोधात बंड करत न्याय मिळवण्यासाठी एकत्र आले. आम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा अजेंडा घेतला आहे, माझ्यासह 50 आमदारांचा मतदारसंघाच्या विकासाचा अजेंडा घेऊन एकत्र आले आहे. माझ्या विभागात सगळेच जण हस्तक्षेप करत होते, म्हणून मला अजित पवारांनी हस्तक्षेप केल्याचे वाईट वाटले नाही.
पदाच्या लालसेपोटी गेलो नाही
भास्करराव आम्ही गद्दार नाही. तुम्ही म्हटले म्हणून नाही सांगत मी. तुम्हाला मी म्हणालो. वैयक्तिक काही स्वार्थ नव्हता. सुरुवातीला मला मुख्यमंत्री करणार होते, ही वस्तुस्थिती आहे. आपल्या सगळ्या आमदारांना हे माहिती होते. अजित दादांनी आणि कोणी सांगितले, की एकनाथ शिंदे नको. मी कधीही कुठल्याही पदाची लालसा केलेली नव्हती. एकदा अजित दादा बोलता बोलता बोलून गेले. हो इथेपण अपघातच झाला आहे. आमचा विरोध असल्याचा कारण नाही. मी कधीही विचारलो नाही. मी सगळे विसरून गेलो. मला त्या पदाचा मोह नव्हता. काही अपेक्षाही केली नाही. सत्तेच्या मोहापायी, पदाच्या लालसेपोटी गेलो नाही. हा निर्णय घेतला यामागचे कारण ज्या पद्धतीने जे सुरू होते. निवडून झालेल्या आमदारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला होता. ते मला सांगायचे आपली नैसर्गिक युती भाजपसोबत आहे. आपण हे का करतोय. आपण यात दुरुस्ती करा. आपण हे बदलावे. पाच वेळा हा प्रयत्न केला. केसरकर त्याला साक्षीदार आहेत. परंतु आम्हाला यश मिळाले नाही. हे करत असताना जी अडीच वर्षे गेली त्यात मोठा अनुभव आला. आज सावरकरांवर बोलू शकत नाही. ज्या दाऊदने बॉम्बस्फोट त्यांच्याशी याचे कनेक्शन. संभाजीनगर बाळासाहेबांनी केले. आम्ही कालही शिवसैनिक होतो. आजही शिवसैनिक आहोत. उद्याही शिवसैनिक आहोत. बाळासाहेब, दिघे साहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत.
हे राज्य सर्व धर्मियांचे
आम्ही हिंदुत्ववादी मात्र इतर धर्मियांना हे त्यांचे राज्य वाटेल असे काम आम्ही करणार आहे. भाजपच्या हिंदुत्ववादी अजेंडा आणि आमचा देखील तोच मागे गेलेले लोक हिंदुत्ववादी पक्षात आलो आहोत. 50 आमदारांमधील एकही आमदार पडणार नाही, मात्र आम्ही दोघे मिळून 2024 मध्ये 200 च्यावर आमदार निवडून आणू असे म्हणत, काँग्रेससोबत आम्ही सत्ता स्थापण करणार नाही, ज्या दिवशी असे होईल त्या दिवशी माझी दुकान बंद करेल असे बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
भाजप सत्तेसाठी हपापलेली नाही
भाजप सत्तेसाठी हापापले्ली आहे, असे अनेक लोक म्हणत होते, मात्र भाजपचे 115 आमदार असताना, 50 आमदारांच्या गटाला त्यांनी मुख्यमंत्री केले यातून त्यांनी दाखवून दिले, की भाजपला सत्तेची गरज नाही, तर त्यांना हिंदुत्वासाठी सत्ता हवी होती.
राष्ट्रवादीने 100 टार्गेट ठेवले
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवसेनेच्या आमदारांच्या मतदारसंघात जात पुढील आमदार आपल्या पक्षाचा होईल असे सांगत होते. त्यांनी 100 उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते, तसे टार्गेटच त्यांनी कार्यकर्त्यांना दिले होते. म्हणून शिवसेनेचे कार्यकर्ते आणि आमदार सैरभैर झाले होते. आम्ही 50 लोक दंबग नेते आहोत, स्वत:चे आमच्याकडे अनेक कार्यकर्ते आहेत, मात्र आम्ही रक्तपात होऊ देऊ नाही, मात्र सहनशिलतेचे अंत होऊ देउ नका असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे. सर्व सामान्य कार्यकर्त्याला मोठे करणार आहोत, सत्तेत असताना कार्यकर्त्यांना आपण मदत केली पाहिजे, त्याशिवाय 200 उमेदवार निवडून येणार नाही त्यासाठी आम्ही सर्वांना मदत करणार. अजित पवार 40 वर्षांचे शिवसैनिक असल्यासारखे बोलत होते.
पंतप्रधानांकडून मदतीचे आश्वासन
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आम्हाला आश्वासन दिले आहे की, महाराष्ट्राच्या विकासासाठी कधीही काही कमी पडू देणार नाही. सर्व सामान्य माणूस मुख्यमंत्री होऊ शकत नाही का, हे सर्वसामान्य माणसांचे सरकार आहे. मोदींनाही सर्वांनी हिनवले मात्र हिनवणारी पार्टी संपत चालली आहे. लोक मोदी विरोधात कुणी बोलले तर जनता त्यांना संपवते. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. तर यानंतर त्यांनी मोदी आणि अमित शहा यांचे कौतुक केले आहे.
सत्तेतल्या शिवसैनिकाला काय मिळाले
सांगलीचा माणूस बघा. ते त्रस्त आहेतच. एक आमच्या माणसाला मोक्का लावला. तडीपारी केली. मारणारा माणूस वेगळा. पोलिसांना सांगितले. बाबा हा कार्यकर्ता निर्दोष आहे. उलट त्याला सांगितले असते, तो निर्दोष आहे. तो जिल्हा प्रमुख आहे ना…त्याचेनाव काय…आनंदराव..असा ओक्साबोक्शी रडत होता. सत्तेतल्या शिवसैनिकाला काय मिळाले. काहीच नाही मिळाले. ते माझ्याकडे येऊन रडायचे.
मी शिवसैनिक हेच माझे कुटुंब समजले. माझ्या आयुष्यामध्ये जेव्हा वाईट प्रसंग आला, माझी दोन्ही मुलं माझ्या डोळ्यासमोर गेली. त्यावेळेस मला आनंद दिघे यांनी आधार दिला. माझे कुटुंब उद्धस्त झाले होते. मी म्हटले की, आता कशासाठी आणि कोणासाठी जगायचे. मी ठरवले की, आता फक्त माझी पत्नी, आई-वडील आणि मुलगा श्रीकांत यांच्यासाठीच जगायचं, माझे आता काहीही राहिलेले नाही. कारण माझ्या कुटुंबाला माझी आवश्यकता आहे, असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधिमंडळ सभागृहात भावूक झाले.
शिवसेना वाढवण्यासाठी मी कधीही मागे पाहिले नाही, मी कधीही कुटुंबाचा विचार केला नाही, मी रात्री घरी जायचो तेव्हा माझे आई-वडील झोपलेले असायचे. मी जेव्हा उठायचो तेव्हा ते कामाला गेलेले असायचे. महिना-पंधरा दिवसांनी त्यांना मी भेटत होतो. तिच परिस्थिती माझा मुलगा श्रीकांत बरोबर झाली. श्रीकांत डॉक्टर झाला पण मी त्याला वेळ देऊ शकत नाही, मी रात्री घरी यायचो आणि तो सकाळी हॉस्पिटलला जायचा. एक बाप म्हणून मी त्याला कधीही वेळ देऊ शकलो नाही, मी संघटनेला वेळ दिला ही वस्तुस्थिती आहे, असेही शिंदे म्हणाले.
कुटुंबापेक्षा संघटनेला वेळ दिला
पुढे ते म्हणाले की, मी शांत राहतो पण जेव्हा अन्याय होते, तेव्हा मात्र मला शांत राहता येत नाही. यांनी (शिवसेना) माझे बाप काढले. माझा बाप अजून जिवंत आहे. माझे वडील खूप कष्ट करून पुढे आले. त्यांच्यामुळेच मी याठिकाणी पोहोचलो. मी 17 वर्षांचा होता बाळासाहेबांच्या विचाराने मला वेडे केले. त्यानंतर मी प्रभावित झालो आणि शिवसैनिक झालो. वयाच्या 18 वर्षी मी शिवसेनेचा शाखाप्रमुख झालो. माझ्यापेक्षा खूप वरिष्ठ लोक होते पण आनंदराव दिघे यांनी मला शाखाप्रमुख बनवले. 1997 मध्ये मी नगरसेवक झालो. मी पदाची कधीही लालसा केलेली नाही, मी कुटुंबापेक्षा शिवसेनेला जास्त वेळ दिला.
त्यादिवशी काय घडले?
22 वर्षांपूर्वी म्हणजेच 2 जून 2000 रोजी शिंदे यांच्या आयुष्यात असे वळण आले की, त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला. सातारा येथे झालेल्या बोट अपघातात त्यांचा धाकटा मुलगा दीपेश आणि मुलगी सुभद्रा त्यांच्या डोळ्यासमोर बुडाले होते. त्यावेळी दीपेश 11 तर सुभद्रा 7 वर्षांची होती. बोटिंग करत असताना हा अपघात झाला होता. दोन मुलांच्या मृत्यूनंतर शिंदे इतके तुटले की, त्यांनी राजकारणातून निवृत्ती जाहीर केली. मुलांच्या मृत्यूनंतर एकनाथ शिंदे यांनी स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतले. ते कोणालाही भेटले नाही, बोलले नाही. त्यानंतर त्यांचे राजकीय गुरू, शिवसेनेचे प्रबळ नेते आनंद दिघे यांनी त्यांना पुन्हा राजकारणात आणले.
हे मोठे कलाकार
सगळ्यात मोठे कलाकार हे आहेत…सगळे झोपल्यावर जायचो…उठण्यापूर्वी यायचो. एवढ्या खालच्या लेवलला जाऊन आरोप केले. चहावाला, टपरीवाला, भाजीवाला…आम्ही ती पातळी सोडली नाही. आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही. आमच्या मागे कुठलिही राजकीय पार्श्वभूमी नसताना हा इतिहास घडला की नाही. हे सरकार सर्वांसाठीय. टपरीवाला, भाजीवाला. तुम्ही असं हिणवताय का व्यवसाय करणं काय गुन्हा आहे….मोदी साहेबांनाही असेच हिणवले. म्हणजे ती पार्टी संपत चाललीय की नाही. मोदी साहेबांनी आपल्या देशाचा मानसन्नान पूर्ण विश्वात पसरवलीय का नाही. बाळासाहेबांचे काय म्हणणे होते. बाळासाहेब आणि हिंदुत्वाचा अजेंडा काय चालवतोय.
संजय राऊतांवर जोरदार टीका
40 रेडे पाठवले. मात्र, आई कामाख्या देवी म्हणाली जो बोलला तो रेडा नको. आम्ही बंडखोर, गद्दार नाही. आमच्या रक्तात बंडखोरी नाही. पंधरा वर्षे . कधी काय-काय करतील माहिती नाय. राज्यभेचे दोन उमेदवार होते. दोन्ही निवडून येणार होते. थोरात साहबे म्हणाले 42 देतो.
कामाख्या देवीनं आता कोणाचा बळी घेतला
कामाख्या देवीनं आता कोणाचा बळी घेतला…मी म्हणालो दोन्ही खासदार निवडून येण्याचे गणित होते. सगळी फिल्डिंग लावली. राऊत साहेब आणि संजय पवार. दुसऱ्यावेळी दुसऱ्या दिवशी विधान परिषद निवडणूक होती. त्या आधी संजय पवारांना तीन मते मी बाहेरून आणली. कारण ते मार्किचंग दिले होतं वेगळे. तर त्याच्या नंतर विधान परिषदेमध्ये दोन्ही शिवसेनेचे निवडून यायचे ठरवले. माझ्या ध्यानी मनी रक्तात येणार नाही…तर मी सांगितले दोन्ही निवडून आले पाहिजेत.आम्ही जाताना दोन्ही निवडून आले…मी कुठे चाललोय मला माहिती नाही. काही प्लॅनिंग नाही. बोलत बोलत निघालो. बॉँड्रीच्या बाहेर तिकडे गेलो. लपवायचे काय त्यामध्ये. तुमच्याकडे टॉवर लोकेशन सगळे आहे. आयजीला सांगितले नाकाबंदी केली तिकडे. मला पण माहितीय नाकाबंदीतून कसे निघायचे असते ते…ते खासगीमध्ये सागेन…तुम्ही पण तसे करेन. भुजबळ साहेब वेश बदलून गेले होते.