नवी दिल्ली- भाजपने पहिली निवडणूक 1984 मध्ये लढली होती. तेव्हा पक्षाने जम्मू-काश्मीरमध्ये कलम-370 रद्द करण्याचे आश्वासन दिले होते. 5 वर्षानंतर 1989 मध्ये आयोध्येत राम मंदिर बांधण्याचे आणि यूनिफॉर्म सिव्हील कोडदेखील भाजपच्या आश्वासनाच्या यादीत आले. जम्मू-काश्मीरमध्ये कलम-370 मागच्यावर्षी ऑगस्टमध्ये रद्द करण्यात आली आणि राम मंदिर बांधण्याचा मार्गही आता मोकळा झाला आहे.
भाजपने आपल्याया राष्ट्रीय मुद्दा असलेल्या या दोन गोष्टी पूर्ण केल्या, तरीदेखील भाजपला चार राज्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेच्या युतीला विजय मिळाला, पण शिवसेनेनं वेगळा मार्ग निवडत काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत मिळून महाविकासआघाडी स्थापन केली. हरियाणामध्ये भाजपला सत्ता मिळाली खरी, पण ती अर्धवट. हरियाणात भाजपला जजपासोबत युती करुन सत्ता स्थापन करावी लागली.
नोव्हेंबरमध्ये राम मंदिरावर सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला. तरीदेखील भाजपला झारखंडमध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपला पराभव मिळाला. दिल्लीमध्ये मतदानाच्या तीन दिवस आधी सरकारने राम मंदिर ट्रस्टची स्थापन करण्याची घोषणा केली होती, पण दिल्लीतही भाजपलासत्ता मिळाली नाही.
2019 मध्ये 303 जागा मिळवल्या
मे 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपने कलम 370 रद्द करणे आणि यूनिफॉर्म सिव्हील कोड लागू करण्याचे आश्वासन दिले होते. त्याच घोषणापत्रात राम मंदिराचा मुद्दाही होता. तसेचय पहिल्यांदा जम्मू-काश्मीरमधून कलम 35ए रद्द करण्यासंबंधी आश्वासनदेखील होते. त्या आश्वासनांच्या जोरावर भाजपने लोकसभा निवडणुकीत 303 जागा मिळवल्या.
महाराष्ट्रात शिवसेनेनं भाजपला सत्ता स्थापन करू दिली नाही, हरियाणामध्ये जजपासोबत युती करावी लागली. 2019 मध्ये भाजपची सरकार स्थापन झाली. त्यानंतर तीन महीन्याच्या आत सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केले. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये राम मंदिरावर सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊन, मंदिराच्या बाजुने निकाल दिला. कलम 370 रद्द केल्यानंतर महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुका झाल्या.
महाराष्ट्रात थोडक्यात सत्तेने हुलकावणी दिली
महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेनं सोबत निवडणूक जिंकली. पण, निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरुन झालेल्या वादानंतर शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केली.
हरियाणात थोडक्यात सत्ता आली
भाजपने हरियाणामध्ये 40 जागा जिंकल्या होत्या, पण सत्तेसाठी 46 ची गरज होती. त्यानंत भाजपने जजपासोबत युती बनवून सत्ता स्थापन केली.
झारखंडमध्ये पराभवाचा सामना करावा लागला
राम मंदिराच्या निर्णयानंतर झारखंडमध्ये निवडणुका झाल्या. येथे भाजपने 370 आणि राम मंदिराचा उल्लेख केला. तरीदेखील भाजपचा पराभव झाला आणि झामुमोच्या नेतृत्वात आघाडी सरकारने सत्ता स्थापन केली.
दिल्लीत पराभव
दिल्ली निवडणुकीच्या तीन दिवस आधी सरकारने राम मंदिर ट्रस्ट स्थापन केल्याची घोषणा केली. तरीदेखील भाजपला दिल्लीत सत्ता स्थापन करता आली नाही.