मुंबई-आज राज ठाकरेंचा वापर भाजपने राजकारणासाठी करून घेतला आहे, आणि हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. भोंग्याचा वाद हा धर्मिक आहे. नवहिंदुत्ववाद्यामुळे हिंदु धर्मातील सप्ताह आणि धर्मिक कार्यक्रम रद्द करावे लागलेत असा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी केला आहे. मनसेच्या खांद्यावर बंदुक ठेवत भाजपने हिंदुत्वाचा गळा घोटला आहे. असा आरोपही राऊतांनी केला. हिंदुंसाठी आजचा काळा दिवस आहे. आज शिर्डी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये काकड आरती झाली नाही. मंदिरातील काकड आरती वर्षांन वर्षे भोंग्याद्वारे पंचक्रोशीत ऐकली जाते..यामुळे अनेक भक्तांचा हिरमोड झाला असेही राऊत म्हणाले.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सकाळी देखील पत्रकारांशी संवाद साधला होता. सकाळी बोलताना त्यांनी मनसेने समान नागरी कायद्याबद्दल बोलणे टाळावे, असे म्हटले होते.राज ठाकरेंच्या माध्यमातून भाजप हिंदू-हिंदूत भांडण लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मनसेचे या आधीपासूनच मराठी मराठीमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता हिंदु धर्मात वाद पेटवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
मशिदीचे निम्मत करत मंदिरांना टार्गेट केले – राऊत
भारतीय जनता पक्षाने मनसेला पुढे आणत या प्रकरणी राज्यात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. मंदिरावर आज भोंगे न लागल्याने लाखो हिंदू बांधवाची गैरसोय झाली. मशिदीवरील भोंग्याचे निमित्त करून मंदिरावरील भोंगे उतरवण्याचे काम भाजप आणि त्यांचे उपवस्त्र असलेल्या मनसेने केले आहे.
हजारो मशिदीत आज अजान झालीच नाही, असे राज ठाकरे म्हणाले असेही खासदार संजय राऊतांनी म्हटले आहे. नियम सगळ्यांसाठी आहे, आणि याचा सर्वाधिक फटका कुणाला बसला असेल तर तो हिंदू धर्मिंयांना असे संजय राऊतांनी म्हटले आहे.