मुंबई- जलयुक्त शिवाराची चौकशी सरकारने आधीच जाहीर केली होती. आज फक्त चौकशी समितीचे सोपस्कर सरकारने जीआर च्या माध्यमातून पूर्ण केले. देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार या महत्वाकांक्षी योजनेच्या मार्फत राज्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला होता अन्य राज्यांनीही आदर्श घ्यावा अशी ही योजना होती परंतु आकसाने व सुडाने लावलेल्या चौकशीचा देवेंद्रजी यांचा काही संबंध नाही. अखेरीच या चौकशीतून योग्य तेच बाहेर येईल असे विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात या कामाचे नियोजन आणि कार्यवाही होते. मंत्रालयात अथवा मुख्यमंत्र्यांचा याचा दुरान्वये संबंध नाही तथापि या योजनेचे अपयश दाखविण्याचा केविलवाणा प्रयत्न महाविकास सरकारकडून होत आहे, त्यामुळे या प्रकारच्या चौकशीचा काडीमात्र फरक भाजपवर किंवा आमचे नेते देवेंद्र यांच्यावर होणार नाही . त्यांचे काम राज्याने पाच वर्षे पहिलेले आहे. जलयुक्त योजनेचा आदर्श इतर राज्यांनी घेतला आहे त्यामुळे चौकशीत योग्य ते बाहेर येईल असेही दरेकर यांनी सांगितले.