अजित पवारांना बाहेरची स्थिती माहिती नसल्याने त्यांनी भाजपा यामागे नसावे असे म्हटले असेल
मुंबई-राज्याच्या बाहेर गेलेले नेते परत येतील त्यावेळी ते शिवसेनेला मतदान करतील, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. सरकार अल्पमतात आहे की नाही, हे ठरवण्याचा अधिकार विधानसभेला आहे. विधानसभेत हे सरकार बहुमतात आहे, हे स्पष्ट होईल, असं शरद पवार म्हणाले. बंडखोरांना इथं यावंच लागेल ,विधानसभेच्या प्रांगणात यावंच लागेल,सूरत आणि आसामला जी व्यवस्था करणारी लोक दिसली ती अजित पवारांच्या परिचयाचे आहेत असं मला वाटत नाहीत. पण ते माझ्या परिचयाचे आहेत.आज जे हिंदुत्वाचा मुद्दा उपस्थित करत आहेत, त्यांना अडीच वर्षांपूर्वी हे समजलं नव्हतं का, असं शरद पवार म्हणाले.
अडीच वर्ष महाविकास आघाडीनं उत्तम कारभार केला, अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. करोना संकटाच्या काळात आरोग्य खात्यानं चांगलं काम केलं, असं असताना महाविकास आघाडीचा प्रयोग फसलाय असं म्हणतात हे राजकीय अज्ञान आहे, असं शरद पवार म्हणाले,त्यांनी राज्यातील सत्ता संघर्षावर आता थेट भाष्य केलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाला कुणाचा पाठिंबा आहे हे शरद पवारांनी त्यांच्या खास शैलीत उघड केलं आहे. अजित पवारांनी यामागे भाजप नाही असे म्हटल्याचे त्यांना सांगताच , अजित पवारांना याबाबत बाहेरची स्थिती ठाऊक नाही त्यामुळे त्यांनी तसे विधान केले असावे असे म्हटलेय. .प्रसार माध्यमांमध्ये आलेल्या गोष्टी खऱ्या आहेत. सरकार बहुमतात आहे हे सिद्ध होईल, ठाकरे सरकार कार्यकाळ पूर्ण करेल,असं शरद पवार म्हणाले. तिथं गेले त्या नेत्यांचं मत आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस सोबत नको,त्यामुळं संजय राऊत असं म्हणाले. आसाममधून बसून नको , इथं येऊन बोला असं कालचं उद्धव ठाकरेंनी सांगितल्याचं शरद पवार म्हणाले. गुप्तचर यंत्रणांचं यश अपयश आता चर्चा करण्याची वेळ नाही, असं शरद पवार म्हणाले.एकनाथ शिंदे यांचा व्हिडिओ टेलिव्हिजनवर पाहिला आहे. त्यामध्ये ते राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे असं म्हणाले. शरद पवारांनी थेट देशातील राष्ट्रीय पक्षांची यादी वाचून दाखवली. सीपीएम, सीपीआय, काँग्रेस, राष्ट्रवादी यांचा पाठिबा त्यांना नाही, तर आहेत कोण हे सांगायची गरज नाही.