मुंबई-जितेंद्र आव्हाड यांच्यावरील कारवाई सूड भावनेने झाली नाही. या प्रकरणात महिलेने तक्रार दिली. त्यात तथ्य आहे अथवा नाही याचा तपास केला जाईल. या प्रकरणात कोणताही राजकीय दबाव पोलिसांवर नाही, अशी स्पष्टोक्ती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली. ते माध्यमांशी मुंबईत बोलत होते.मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राजीनामा दिला की, नाही याची माहिती मला नाही. पण त्या महिलेने गुन्हा दाखल केलेला आहे. पण यात पोलिस नियमानुसार गुन्ह्याची चौकशी, पडताळणी करतील. गुन्ह्यात तथ्य असेल नसेल पोलिस कारवाई करतील.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचे सरकार कुठल्याही स्थितीत राजकीय सूड भावनेतून कारवाई केली नाही. करणारही नाही. हे सरकार आमचे सरकार नियमानुसार चालते. नियमाने आणि लोकशाहीने चालणारे आमचे सरकार आहे.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लोकशाही मार्गाने आंदोलन करणे ठिक पण कुठल्याही स्थितीत कायदा हातात घेतला तर खपवून घेतले जाणार नाही. या राज्यात कायद्याने, शांततेने सलोख्याने राहतात, कुठलीही कारवाई सूड भावनेपोटी आम्ही करणार नाही. पोलिसांववर राजकीय दबाव नाही, आणि तो येणारही नाही.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, या प्रकरणात कोणतेही षडयंत्र रचलेले नाही. जितेंद्र आव्हाड हे आमदार आहेत. कालच आम्ही एकत्र कार्यक्रमाला होता. त्यामुळे यामध्ये कुठल्याही प्रकारचा पोलिसांवर दबाव नाही. पोलिस योग्य ती चौकशी करतील. प्रकरणात तथ्य असेल अथवा तथ्य नसेल त्यानुसार पोलिस योग्य तो तपास करून पुढील निर्णय घेईल.