तब्बल ९ दिवसांनी भाजपची उघड एंट्री…
राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल
आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टात १२ जुलैला असताना राज्यपाल काय निर्णय घेणार याबाबत उत्सुकता
शह आणि काटशह, डावपेचाचे राजकारण
मुंबई-आज दिल्लीवारी नंतर रात्री विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना सरकारच्या बहुमत चाचणीसाठी पत्र दिलं आहे.त्यावर राज्यपाल यावर निर्णय घेतील. दरम्यान राज्यपालांनी ३० तारखेला अधिवेशन बोलावल्याचं खोटं पत्र सोशल मीडियात व्हायरल झालं होतं. त्यासंदर्भात राजभवनने स्पष्टीकरण देत हे पत्र खोट असल्याचं सांगितलं.काही वेळापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी सरकारच्या बहुमताच्या चाचणीसाठी मागणीचे पत्र दिले आहे. त्यावर राज्यपाल आता निर्णय घेणार आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं आहे. सरकारला लवकरच आपलं बहुमत सिद्ध करावं लागणार आहे.
यासंदर्भात बोलताना विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, “महाविकास आघाडी सरकारमधील शिवसेनेच्या ३९ आमदारांनी आपला पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे सध्या सरकार अल्पमतात चालू आहे म्हणून आम्ही राज्यपालांकडे सरकारच्या बहुमत चाचणीची मागणी केली आहे. यासंदर्भातील पत्र आम्ही राज्यपालांना दिलं आहे.” असं ते म्हणाले.
राज्याच्या सत्तासंघर्षात तब्बल ९ दिवसांनी भाजपने उघड एंट्री केली आहे. दरम्यान बंड केलेल्या आमदारांच्या निलंबनाच्या कारवाईवरील सुनावणी सुप्रीम कोर्टाने १२ जुलै पर्यंत लांबवली आहे. आता राज्यपालांच्या निर्णयाकडेही लक्ष लागले आहे.